शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाणीटंचाईमुळे कांदा रोपे विकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 22:41 IST

येवला तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावूनही ग्रामीण भागात मात्र पाणीटंचाई पाचवीलाच पूजलेली असल्याचे चित्र दिसून येत आहे. राजापूर परिसरातील जलस्रोतांनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांवर कांदा रोपे विकण्याची वेळ आली आहे. सध्या रोपाला चांगला दर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा रोपे विक्र ीला पसंती दिली आहे. एका पायलीचे रोप ३५ ते ४० हजार रु पयांपर्यंत विकले जात आहे.

ठळक मुद्देचिंता : जलस्रोतांनी तळ गाठल्याने पिके करपू लागली

राजापूर : येवला तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावूनही ग्रामीण भागात मात्र पाणीटंचाई पाचवीलाच पूजलेली असल्याचे चित्र दिसून येत आहे. राजापूर परिसरातील जलस्रोतांनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांवर कांदा रोपे विकण्याची वेळ आली आहे. सध्या रोपाला चांगला दर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा रोपे विक्र ीला पसंती दिली आहे. एका पायलीचे रोप ३५ ते ४० हजार रु पयांपर्यंत विकले जात आहे.राजापूर येथे विहिरीचे पाणी कमी पडल्याने पुन्हा एकदा दुष्काळाचे सावट उभे राहण्याचे चिन्ह गडद झाले आहे. यावर्षी काही प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकºयांनी मका, कांदा, गहू, हरभरा पिके केली, मात्र जलस्रोत अचानक आटल्याने तसेच एकाएकी विहिरी उपसायला लागल्याने शेतकरी धास्तावला आहे. गहू, रांगडा कांदा सध्या शेतात आहे, परंतु सध्या विहिरी आटल्याने शेतकºयांची मोठ्या प्रमाणात चिंता वाढली आहे.गव्हासाठी तीन ते चार ते वेळेस पाणी भरण्याची गरज आहे, परंतु सध्या विहिरींनी तळ गाठल्याने कांदा रोपे विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. पाण्याअभावी पीक जगविणे अवघड झाले आहे. उन्हाळ कांद्याच्या रोपाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने शेतकरी वर्ग कांद्याऐवजी आता रोपे विक्र ी करीत आहेत. यामुळे राजापूर येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर संकटात आहे. तर इतर तालुक्यात उन्हाळ कांद्याचे रोप मिळत नसल्याने बाहेरचे तालुक्यातील शेतकरी दररोज राजापूर व परिसरात रोपांसाठी फिरत आहेत. अव्वाच्या सव्वा किमती देत रोपे घेऊन लागवडीसाठी घेऊन जात आहेत. त्यामुळे राजापूर येथील शेतकºयांनी उन्हाळ कांद्याची रोपे विक्र ीला जोर दिला आहे.पिके वाचविण्यासाठी धडपडयावर्षी कांद्याला मोठ्या प्रमाणात बाजार असल्याने शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात खर्च केलेला असतानाही कांदा पीक घेणे अवघड झाले असल्याने महागडी औषधे फवारणी करून पिके वाचविण्यासाठी धडपड करीत आहे. मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती, तर यावर्षी काही प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकºयांनी खरीप व रब्बीच्या पिकांची पेरणी केली, परंतु किती पाऊस झाला तरी राजापूर व परिसरात पुन्हा पाणीटंचाई सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा