शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

पाणीटंचाईमुळे कांदा रोपे विकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 22:41 IST

येवला तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावूनही ग्रामीण भागात मात्र पाणीटंचाई पाचवीलाच पूजलेली असल्याचे चित्र दिसून येत आहे. राजापूर परिसरातील जलस्रोतांनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांवर कांदा रोपे विकण्याची वेळ आली आहे. सध्या रोपाला चांगला दर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा रोपे विक्र ीला पसंती दिली आहे. एका पायलीचे रोप ३५ ते ४० हजार रु पयांपर्यंत विकले जात आहे.

ठळक मुद्देचिंता : जलस्रोतांनी तळ गाठल्याने पिके करपू लागली

राजापूर : येवला तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावूनही ग्रामीण भागात मात्र पाणीटंचाई पाचवीलाच पूजलेली असल्याचे चित्र दिसून येत आहे. राजापूर परिसरातील जलस्रोतांनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांवर कांदा रोपे विकण्याची वेळ आली आहे. सध्या रोपाला चांगला दर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा रोपे विक्र ीला पसंती दिली आहे. एका पायलीचे रोप ३५ ते ४० हजार रु पयांपर्यंत विकले जात आहे.राजापूर येथे विहिरीचे पाणी कमी पडल्याने पुन्हा एकदा दुष्काळाचे सावट उभे राहण्याचे चिन्ह गडद झाले आहे. यावर्षी काही प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकºयांनी मका, कांदा, गहू, हरभरा पिके केली, मात्र जलस्रोत अचानक आटल्याने तसेच एकाएकी विहिरी उपसायला लागल्याने शेतकरी धास्तावला आहे. गहू, रांगडा कांदा सध्या शेतात आहे, परंतु सध्या विहिरी आटल्याने शेतकºयांची मोठ्या प्रमाणात चिंता वाढली आहे.गव्हासाठी तीन ते चार ते वेळेस पाणी भरण्याची गरज आहे, परंतु सध्या विहिरींनी तळ गाठल्याने कांदा रोपे विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. पाण्याअभावी पीक जगविणे अवघड झाले आहे. उन्हाळ कांद्याच्या रोपाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने शेतकरी वर्ग कांद्याऐवजी आता रोपे विक्र ी करीत आहेत. यामुळे राजापूर येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर संकटात आहे. तर इतर तालुक्यात उन्हाळ कांद्याचे रोप मिळत नसल्याने बाहेरचे तालुक्यातील शेतकरी दररोज राजापूर व परिसरात रोपांसाठी फिरत आहेत. अव्वाच्या सव्वा किमती देत रोपे घेऊन लागवडीसाठी घेऊन जात आहेत. त्यामुळे राजापूर येथील शेतकºयांनी उन्हाळ कांद्याची रोपे विक्र ीला जोर दिला आहे.पिके वाचविण्यासाठी धडपडयावर्षी कांद्याला मोठ्या प्रमाणात बाजार असल्याने शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात खर्च केलेला असतानाही कांदा पीक घेणे अवघड झाले असल्याने महागडी औषधे फवारणी करून पिके वाचविण्यासाठी धडपड करीत आहे. मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती, तर यावर्षी काही प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकºयांनी खरीप व रब्बीच्या पिकांची पेरणी केली, परंतु किती पाऊस झाला तरी राजापूर व परिसरात पुन्हा पाणीटंचाई सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा