शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

 कष्टकऱ्यांवर पायी घरी परतण्याची वेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 00:23 IST

येवला : पोटा-पाण्यासाठी हजारो किलोमीटरवरून गाव सोडून आलेले अनेक कष्टकरी कामगार आणि शेतमजूर कोरोनाच्या भीतीने पुन्हा आपल्या गावांकडे रवाना होताना दिसत आहेत. संचारबंदी, सार्वजनिक वाहन सुविधा उपलब्ध नसताना कष्टकऱ्यांचा घराकडे जाण्याचा हा प्रवास कसा होणार याची काहीच माहिती नसली तरी, आपले कुटुंब, सहकाºयांसह अनेक कष्टकरी आता गावाकडे परतत असल्याचे चित्र आहे. काहींनी तर पायी चालत घर गाठण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

ठळक मुद्देयेवला। मजुरांअभावी शेती अडचणीत; माणुसकीचा फुटतोय पाझर

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : पोटा-पाण्यासाठी हजारो किलोमीटरवरून गाव सोडून आलेले अनेक कष्टकरी कामगार आणि शेतमजूर कोरोनाच्या भीतीने पुन्हा आपल्या गावांकडे रवाना होताना दिसत आहेत. संचारबंदी, सार्वजनिक वाहन सुविधा उपलब्ध नसताना कष्टकऱ्यांचा घराकडे जाण्याचा हा प्रवास कसा होणार याची काहीच माहिती नसली तरी, आपले कुटुंब, सहकाºयांसह अनेक कष्टकरी आता गावाकडे परतत असल्याचे चित्र आहे. काहींनी तर पायी चालत घर गाठण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने उपाययोजना म्हणून केलेल्या लॉकडाउन व संचारबंदीने शहरासह तालुक्यात रोजगारानिमित्त आलेली अनेक कुटुंब, कष्टकरी मजूर, शेतमजूर अडचणीत सापडले आहेत. कष्टकरीवर्गाचे मोठे हाल होत आहेत.विशेष म्हणजे शासन वा शासकीय यंत्रणा यांच्याकडे याबाबत उपाययोजना नसली तरी स्थानिक पातळीवर काही सामाजिक कार्यकर्ते या मंडळींना पोटापाण्यासाठी शिधा देऊन मदत करत आहे ही आशादायक बाब आहे.माणुसकीचा पाझरजिल्हाबंदीसाठी येवला-कोपरगाव महामार्गावरील पिंपळगाव जलाल टोलनाक्यावर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. बाहेरील वाहन तपासताना त्यातील माणसांचीही चौकशी केली जाते. एक ट्रक अहमदनगरकडून मध्य प्रदेशातील तीस-पस्तीस कामगारांना येवल्याकडे घेऊन येत होता. नाकाबंदीवरील पोलिसांना पाहून ट्रकचालकाने सर्वमजुरांना अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरच उतरून दिले. ही बाब येवला नाकाबंदीवरील सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे व पोलीस नाईक राकेश होलगडे यांना लक्षात येताच, त्यांनी येवला शहरात सदर ट्रक थांबवून ठेवला. सुमारे १३ किलोमीटर अंतर पायी चालत आलेल्या मजुरांच्या जथ्याला ट्रकमध्ये पुन्हा बसवून दिले. या दरम्यान, नगरसेवक रजिवानभाई शेख यांनी, या मजुरांच्या खाण्यापिण्याची सोय करून पुढील प्रवासासाठी रोख पैसेही दिले. पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या या माणुसकीने मजूर गहिवरले.शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कोपरगाव (जि. अहमदनगर) येथून राजस्थानकडे पायी निघालेल्या १२ कामगारांना काही कार्यकर्त्यांनी अन्नाची पाकिटे दिली. येवला-कोपरगाव महामार्गावर एन्झोकेम शाळेजवळ राजस्थानी कारागिरांचा जथ्था दिसत होता. चौकशी केली असता, काम नाही त्यामुळे पैसेही नाहीत. उपासमार होत असल्याने पायीच घराकडे निघाल्याचे त्यांनी सांगितले.मजुरांअभावी शेती अडचणीतसरकारने २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यामुळे पीक कापणीला आले असतानाही मजूर मिळेनात. येवल्यात गहू, हरभरा, मका, कांदा आदी पिके काढणीला आली आहेत. मजुरीसाठी आलेल्या बाहेरील शेतमजुरांनी घरचा रस्ता धरल्याने व स्थानिक मजूरही घराबाहेर पडत नसल्याने शेतातील पिके काही उभी तर काही पडून आहेत. मजुरांअभावी शेती अडचणीत सापडली असून, त्यात अवकाळीचीही भर पडत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य