शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

 कष्टकऱ्यांवर पायी घरी परतण्याची वेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 00:23 IST

येवला : पोटा-पाण्यासाठी हजारो किलोमीटरवरून गाव सोडून आलेले अनेक कष्टकरी कामगार आणि शेतमजूर कोरोनाच्या भीतीने पुन्हा आपल्या गावांकडे रवाना होताना दिसत आहेत. संचारबंदी, सार्वजनिक वाहन सुविधा उपलब्ध नसताना कष्टकऱ्यांचा घराकडे जाण्याचा हा प्रवास कसा होणार याची काहीच माहिती नसली तरी, आपले कुटुंब, सहकाºयांसह अनेक कष्टकरी आता गावाकडे परतत असल्याचे चित्र आहे. काहींनी तर पायी चालत घर गाठण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

ठळक मुद्देयेवला। मजुरांअभावी शेती अडचणीत; माणुसकीचा फुटतोय पाझर

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : पोटा-पाण्यासाठी हजारो किलोमीटरवरून गाव सोडून आलेले अनेक कष्टकरी कामगार आणि शेतमजूर कोरोनाच्या भीतीने पुन्हा आपल्या गावांकडे रवाना होताना दिसत आहेत. संचारबंदी, सार्वजनिक वाहन सुविधा उपलब्ध नसताना कष्टकऱ्यांचा घराकडे जाण्याचा हा प्रवास कसा होणार याची काहीच माहिती नसली तरी, आपले कुटुंब, सहकाºयांसह अनेक कष्टकरी आता गावाकडे परतत असल्याचे चित्र आहे. काहींनी तर पायी चालत घर गाठण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने उपाययोजना म्हणून केलेल्या लॉकडाउन व संचारबंदीने शहरासह तालुक्यात रोजगारानिमित्त आलेली अनेक कुटुंब, कष्टकरी मजूर, शेतमजूर अडचणीत सापडले आहेत. कष्टकरीवर्गाचे मोठे हाल होत आहेत.विशेष म्हणजे शासन वा शासकीय यंत्रणा यांच्याकडे याबाबत उपाययोजना नसली तरी स्थानिक पातळीवर काही सामाजिक कार्यकर्ते या मंडळींना पोटापाण्यासाठी शिधा देऊन मदत करत आहे ही आशादायक बाब आहे.माणुसकीचा पाझरजिल्हाबंदीसाठी येवला-कोपरगाव महामार्गावरील पिंपळगाव जलाल टोलनाक्यावर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. बाहेरील वाहन तपासताना त्यातील माणसांचीही चौकशी केली जाते. एक ट्रक अहमदनगरकडून मध्य प्रदेशातील तीस-पस्तीस कामगारांना येवल्याकडे घेऊन येत होता. नाकाबंदीवरील पोलिसांना पाहून ट्रकचालकाने सर्वमजुरांना अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरच उतरून दिले. ही बाब येवला नाकाबंदीवरील सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे व पोलीस नाईक राकेश होलगडे यांना लक्षात येताच, त्यांनी येवला शहरात सदर ट्रक थांबवून ठेवला. सुमारे १३ किलोमीटर अंतर पायी चालत आलेल्या मजुरांच्या जथ्याला ट्रकमध्ये पुन्हा बसवून दिले. या दरम्यान, नगरसेवक रजिवानभाई शेख यांनी, या मजुरांच्या खाण्यापिण्याची सोय करून पुढील प्रवासासाठी रोख पैसेही दिले. पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या या माणुसकीने मजूर गहिवरले.शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कोपरगाव (जि. अहमदनगर) येथून राजस्थानकडे पायी निघालेल्या १२ कामगारांना काही कार्यकर्त्यांनी अन्नाची पाकिटे दिली. येवला-कोपरगाव महामार्गावर एन्झोकेम शाळेजवळ राजस्थानी कारागिरांचा जथ्था दिसत होता. चौकशी केली असता, काम नाही त्यामुळे पैसेही नाहीत. उपासमार होत असल्याने पायीच घराकडे निघाल्याचे त्यांनी सांगितले.मजुरांअभावी शेती अडचणीतसरकारने २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यामुळे पीक कापणीला आले असतानाही मजूर मिळेनात. येवल्यात गहू, हरभरा, मका, कांदा आदी पिके काढणीला आली आहेत. मजुरीसाठी आलेल्या बाहेरील शेतमजुरांनी घरचा रस्ता धरल्याने व स्थानिक मजूरही घराबाहेर पडत नसल्याने शेतातील पिके काही उभी तर काही पडून आहेत. मजुरांअभावी शेती अडचणीत सापडली असून, त्यात अवकाळीचीही भर पडत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य