शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
3
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
4
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
5
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
6
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
7
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
8
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
9
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
10
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
11
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
12
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
13
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
14
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
15
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
16
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
17
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
18
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
19
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
20
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!

 कष्टकऱ्यांवर पायी घरी परतण्याची वेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 00:23 IST

येवला : पोटा-पाण्यासाठी हजारो किलोमीटरवरून गाव सोडून आलेले अनेक कष्टकरी कामगार आणि शेतमजूर कोरोनाच्या भीतीने पुन्हा आपल्या गावांकडे रवाना होताना दिसत आहेत. संचारबंदी, सार्वजनिक वाहन सुविधा उपलब्ध नसताना कष्टकऱ्यांचा घराकडे जाण्याचा हा प्रवास कसा होणार याची काहीच माहिती नसली तरी, आपले कुटुंब, सहकाºयांसह अनेक कष्टकरी आता गावाकडे परतत असल्याचे चित्र आहे. काहींनी तर पायी चालत घर गाठण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

ठळक मुद्देयेवला। मजुरांअभावी शेती अडचणीत; माणुसकीचा फुटतोय पाझर

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : पोटा-पाण्यासाठी हजारो किलोमीटरवरून गाव सोडून आलेले अनेक कष्टकरी कामगार आणि शेतमजूर कोरोनाच्या भीतीने पुन्हा आपल्या गावांकडे रवाना होताना दिसत आहेत. संचारबंदी, सार्वजनिक वाहन सुविधा उपलब्ध नसताना कष्टकऱ्यांचा घराकडे जाण्याचा हा प्रवास कसा होणार याची काहीच माहिती नसली तरी, आपले कुटुंब, सहकाºयांसह अनेक कष्टकरी आता गावाकडे परतत असल्याचे चित्र आहे. काहींनी तर पायी चालत घर गाठण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने उपाययोजना म्हणून केलेल्या लॉकडाउन व संचारबंदीने शहरासह तालुक्यात रोजगारानिमित्त आलेली अनेक कुटुंब, कष्टकरी मजूर, शेतमजूर अडचणीत सापडले आहेत. कष्टकरीवर्गाचे मोठे हाल होत आहेत.विशेष म्हणजे शासन वा शासकीय यंत्रणा यांच्याकडे याबाबत उपाययोजना नसली तरी स्थानिक पातळीवर काही सामाजिक कार्यकर्ते या मंडळींना पोटापाण्यासाठी शिधा देऊन मदत करत आहे ही आशादायक बाब आहे.माणुसकीचा पाझरजिल्हाबंदीसाठी येवला-कोपरगाव महामार्गावरील पिंपळगाव जलाल टोलनाक्यावर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. बाहेरील वाहन तपासताना त्यातील माणसांचीही चौकशी केली जाते. एक ट्रक अहमदनगरकडून मध्य प्रदेशातील तीस-पस्तीस कामगारांना येवल्याकडे घेऊन येत होता. नाकाबंदीवरील पोलिसांना पाहून ट्रकचालकाने सर्वमजुरांना अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरच उतरून दिले. ही बाब येवला नाकाबंदीवरील सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे व पोलीस नाईक राकेश होलगडे यांना लक्षात येताच, त्यांनी येवला शहरात सदर ट्रक थांबवून ठेवला. सुमारे १३ किलोमीटर अंतर पायी चालत आलेल्या मजुरांच्या जथ्याला ट्रकमध्ये पुन्हा बसवून दिले. या दरम्यान, नगरसेवक रजिवानभाई शेख यांनी, या मजुरांच्या खाण्यापिण्याची सोय करून पुढील प्रवासासाठी रोख पैसेही दिले. पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या या माणुसकीने मजूर गहिवरले.शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कोपरगाव (जि. अहमदनगर) येथून राजस्थानकडे पायी निघालेल्या १२ कामगारांना काही कार्यकर्त्यांनी अन्नाची पाकिटे दिली. येवला-कोपरगाव महामार्गावर एन्झोकेम शाळेजवळ राजस्थानी कारागिरांचा जथ्था दिसत होता. चौकशी केली असता, काम नाही त्यामुळे पैसेही नाहीत. उपासमार होत असल्याने पायीच घराकडे निघाल्याचे त्यांनी सांगितले.मजुरांअभावी शेती अडचणीतसरकारने २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यामुळे पीक कापणीला आले असतानाही मजूर मिळेनात. येवल्यात गहू, हरभरा, मका, कांदा आदी पिके काढणीला आली आहेत. मजुरीसाठी आलेल्या बाहेरील शेतमजुरांनी घरचा रस्ता धरल्याने व स्थानिक मजूरही घराबाहेर पडत नसल्याने शेतातील पिके काही उभी तर काही पडून आहेत. मजुरांअभावी शेती अडचणीत सापडली असून, त्यात अवकाळीचीही भर पडत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य