शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

रब्बी पेरणीसाठी पुन्हा हात पसरण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 00:28 IST

सिन्नर : खरिपात केलेला खर्च तर अंगलट आलाच. शिवाय आता रब्बी पेरणीसाठी कुणाकडे हात पसरायचा, असा प्रश्न परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पडला आहे. परतीचा पाऊस नको तेवढा लांबल्याने रब्बीचा पेराही लांबला आहे.

ठळक मुद्देशेतकरी आर्थिक अडचणीत : रब्बीचा पेरा लांबला

सिन्नर : खरिपात केलेला खर्च तर अंगलट आलाच. शिवाय आता रब्बी पेरणीसाठी कुणाकडे हात पसरायचा, असा प्रश्न परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पडला आहे. परतीचा पाऊस नको तेवढा लांबल्याने रब्बीचा पेराही लांबला आहे.अवर्षणग्रस्त तालुका अशी ओळख असलेल्या सिन्नर तालुक्यात गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला. गेल्यावर्षीपेक्षाही यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पिकांसाठी मोठा खर्च केला होता. पीके सोंगणीला आल्यानंतर आणि काही शेतकºयांनी सोंगणी करु न पीक खळ्यात आणल्यानंतर परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला, आणि सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यामुळे खरीपाचे उत्पन्न मिळणे बाजूलाच मात्र खरीपासाठी केलेला खर्चही वाया गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे.परतीच्या पावसाने सोयाबीन, तूर पिकांसह शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र शेतीत घातलेला खर्चही फिटत नसल्याने शेतकरी आणखी अडचणीत आला आहे.पेरणीनंतर वेळोवळी पाऊस पडत गेल्याने पिके जोमात होती. पेरणी, महागडी औषधे फवारणी यासाठी शेतकºयांनी मोठा खर्च केला. मात्र परतीच्या पावसाने सोयाबीन वाहून गेले तर तूरीचेही मोठे नुकसान झाले. बाजरी, मका आदि पीके पाण्यात गेल्याचे चित्र काही ठिकाणी आहे. अतिपावसामुळे अनेक पीके शेतात सडून गेली आहेत.मशागतीसाठी उन्हा तान्हात काबाडकष्ट केले. उसनवारीने खरेदी केलेले बी-बियाणे, खतांसाठी रांगा लावल्या. परंतू पावसाने खरिपाची पिके पाण्यात गेली. अशा संकटात शेतकरी पुरते हताश झाल्याचे चित्र आहे.भुईमुगाला शेंगांचे प्रमाण अत्यल्पसिन्नर तालुक्यात चांगल्या पावसामुळे भुईमुगाचे पीक जोमात आले. मात्र केवळ पाला वाढला. भुईमुगाला अत्यल्प शेंगा आहेत. तर काही ठिकाणी भुईमुगाला शेंगाच लागल्या नाही. पाहिजे त्या प्रमाणात भुईमुगाचे उत्पादन न झाल्याने शेतकरी नाराज आहे.सिन्नर तालुक्यात परतीच्या पावसामुळे पीकांचे झालेले नुकसान.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस