शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

रब्बी पेरणीसाठी पुन्हा हात पसरण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 00:28 IST

सिन्नर : खरिपात केलेला खर्च तर अंगलट आलाच. शिवाय आता रब्बी पेरणीसाठी कुणाकडे हात पसरायचा, असा प्रश्न परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पडला आहे. परतीचा पाऊस नको तेवढा लांबल्याने रब्बीचा पेराही लांबला आहे.

ठळक मुद्देशेतकरी आर्थिक अडचणीत : रब्बीचा पेरा लांबला

सिन्नर : खरिपात केलेला खर्च तर अंगलट आलाच. शिवाय आता रब्बी पेरणीसाठी कुणाकडे हात पसरायचा, असा प्रश्न परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पडला आहे. परतीचा पाऊस नको तेवढा लांबल्याने रब्बीचा पेराही लांबला आहे.अवर्षणग्रस्त तालुका अशी ओळख असलेल्या सिन्नर तालुक्यात गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला. गेल्यावर्षीपेक्षाही यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पिकांसाठी मोठा खर्च केला होता. पीके सोंगणीला आल्यानंतर आणि काही शेतकºयांनी सोंगणी करु न पीक खळ्यात आणल्यानंतर परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला, आणि सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यामुळे खरीपाचे उत्पन्न मिळणे बाजूलाच मात्र खरीपासाठी केलेला खर्चही वाया गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे.परतीच्या पावसाने सोयाबीन, तूर पिकांसह शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र शेतीत घातलेला खर्चही फिटत नसल्याने शेतकरी आणखी अडचणीत आला आहे.पेरणीनंतर वेळोवळी पाऊस पडत गेल्याने पिके जोमात होती. पेरणी, महागडी औषधे फवारणी यासाठी शेतकºयांनी मोठा खर्च केला. मात्र परतीच्या पावसाने सोयाबीन वाहून गेले तर तूरीचेही मोठे नुकसान झाले. बाजरी, मका आदि पीके पाण्यात गेल्याचे चित्र काही ठिकाणी आहे. अतिपावसामुळे अनेक पीके शेतात सडून गेली आहेत.मशागतीसाठी उन्हा तान्हात काबाडकष्ट केले. उसनवारीने खरेदी केलेले बी-बियाणे, खतांसाठी रांगा लावल्या. परंतू पावसाने खरिपाची पिके पाण्यात गेली. अशा संकटात शेतकरी पुरते हताश झाल्याचे चित्र आहे.भुईमुगाला शेंगांचे प्रमाण अत्यल्पसिन्नर तालुक्यात चांगल्या पावसामुळे भुईमुगाचे पीक जोमात आले. मात्र केवळ पाला वाढला. भुईमुगाला अत्यल्प शेंगा आहेत. तर काही ठिकाणी भुईमुगाला शेंगाच लागल्या नाही. पाहिजे त्या प्रमाणात भुईमुगाचे उत्पादन न झाल्याने शेतकरी नाराज आहे.सिन्नर तालुक्यात परतीच्या पावसामुळे पीकांचे झालेले नुकसान.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस