शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडमध्ये पाणी ‘कुलपबंद’ ठेवण्याची वेळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 18:52 IST

मनमाड: परिसरात यंदा अल्प पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणारे वागदर्डी धरण न भरल्याने ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. २३ दिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठयमुळे पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ महिलांवर आली असून येथील श्रावस्तीनगर भागात राहणा-या नागरिकांच्या छतावरच्या टाकीतील पाण्याची चोरी झाल्यामुळे मनमाडकरांवर आता पाणी सुध्दा कुलुपंबद ठेवण्याची वेळ आली आहे.

पाणीटंचाई पाचवीला पुजलेल्या मनमाड शहरात पाण्याअभावी भीषण दुष्काळी परिस्थीती निर्माण झाली आहे. यंदा शहर व परिसरात दमदार पाऊस न झाल्यामुळे भुगर्भातील पाण्याची पातळी खाली गेली असून नागरिकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणा-या वागदर्डी धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने या वर्षी धरणात पाणी आलेच नाही. संपूर्ण वर्षभर मनमाडकरांची तहान पालखेडच्या रोटेशनने भागवली. दुष्काळी परिस्थितीमुळे परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याच्या उपलब्धतेअभावी पाणीपुरवठ्याच्या दिवसांमध्ये वाढ होत असून तो कालावधी आता २३ दिवसांवर पोहचला आहे. पालिकेकडून देण्यात आलेले पाणी पुढील पाणी येईपर्यंत पुरवावे लागते. येथील श्रावस्तीनगर भागात राहणारे विलास अहिरे यांनी छतावर साठवून ठेवलेल्या पाचशे लिटर पाण्यापैकी जवळपास तीनशे लिटर पाणी चोरी गेल्याची बाब निदर्शनास आली. अहिरे यांच्या घराला बाहेरून जिना असल्यामुळे अज्ञात चोरट्यांनी छतावर जाऊन पाणी लंपास केले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थितीमधे पाणी चोरीच्या या घटनेमुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार अर्ज दिला असल्याचे अहिरे यांनी सांगीतले. पाणी चोरीच्या या घटनेमुळे नागरिकांना पाणी कुलूपबंद ठेवण्याची वेळ आली आहे. शहरातील काही नागरिकांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून आपापल्या पाण्याच्या टाक्यांना कुलूप लावून पाणी साठवले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई