शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

मनमाडमध्ये पाणी ‘कुलपबंद’ ठेवण्याची वेळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 18:52 IST

मनमाड: परिसरात यंदा अल्प पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणारे वागदर्डी धरण न भरल्याने ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. २३ दिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठयमुळे पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ महिलांवर आली असून येथील श्रावस्तीनगर भागात राहणा-या नागरिकांच्या छतावरच्या टाकीतील पाण्याची चोरी झाल्यामुळे मनमाडकरांवर आता पाणी सुध्दा कुलुपंबद ठेवण्याची वेळ आली आहे.

पाणीटंचाई पाचवीला पुजलेल्या मनमाड शहरात पाण्याअभावी भीषण दुष्काळी परिस्थीती निर्माण झाली आहे. यंदा शहर व परिसरात दमदार पाऊस न झाल्यामुळे भुगर्भातील पाण्याची पातळी खाली गेली असून नागरिकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणा-या वागदर्डी धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने या वर्षी धरणात पाणी आलेच नाही. संपूर्ण वर्षभर मनमाडकरांची तहान पालखेडच्या रोटेशनने भागवली. दुष्काळी परिस्थितीमुळे परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याच्या उपलब्धतेअभावी पाणीपुरवठ्याच्या दिवसांमध्ये वाढ होत असून तो कालावधी आता २३ दिवसांवर पोहचला आहे. पालिकेकडून देण्यात आलेले पाणी पुढील पाणी येईपर्यंत पुरवावे लागते. येथील श्रावस्तीनगर भागात राहणारे विलास अहिरे यांनी छतावर साठवून ठेवलेल्या पाचशे लिटर पाण्यापैकी जवळपास तीनशे लिटर पाणी चोरी गेल्याची बाब निदर्शनास आली. अहिरे यांच्या घराला बाहेरून जिना असल्यामुळे अज्ञात चोरट्यांनी छतावर जाऊन पाणी लंपास केले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थितीमधे पाणी चोरीच्या या घटनेमुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार अर्ज दिला असल्याचे अहिरे यांनी सांगीतले. पाणी चोरीच्या या घटनेमुळे नागरिकांना पाणी कुलूपबंद ठेवण्याची वेळ आली आहे. शहरातील काही नागरिकांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून आपापल्या पाण्याच्या टाक्यांना कुलूप लावून पाणी साठवले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई