शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडमध्ये पाणी ‘कुलपबंद’ ठेवण्याची वेळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 18:52 IST

मनमाड: परिसरात यंदा अल्प पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणारे वागदर्डी धरण न भरल्याने ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. २३ दिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठयमुळे पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ महिलांवर आली असून येथील श्रावस्तीनगर भागात राहणा-या नागरिकांच्या छतावरच्या टाकीतील पाण्याची चोरी झाल्यामुळे मनमाडकरांवर आता पाणी सुध्दा कुलुपंबद ठेवण्याची वेळ आली आहे.

पाणीटंचाई पाचवीला पुजलेल्या मनमाड शहरात पाण्याअभावी भीषण दुष्काळी परिस्थीती निर्माण झाली आहे. यंदा शहर व परिसरात दमदार पाऊस न झाल्यामुळे भुगर्भातील पाण्याची पातळी खाली गेली असून नागरिकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणा-या वागदर्डी धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने या वर्षी धरणात पाणी आलेच नाही. संपूर्ण वर्षभर मनमाडकरांची तहान पालखेडच्या रोटेशनने भागवली. दुष्काळी परिस्थितीमुळे परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याच्या उपलब्धतेअभावी पाणीपुरवठ्याच्या दिवसांमध्ये वाढ होत असून तो कालावधी आता २३ दिवसांवर पोहचला आहे. पालिकेकडून देण्यात आलेले पाणी पुढील पाणी येईपर्यंत पुरवावे लागते. येथील श्रावस्तीनगर भागात राहणारे विलास अहिरे यांनी छतावर साठवून ठेवलेल्या पाचशे लिटर पाण्यापैकी जवळपास तीनशे लिटर पाणी चोरी गेल्याची बाब निदर्शनास आली. अहिरे यांच्या घराला बाहेरून जिना असल्यामुळे अज्ञात चोरट्यांनी छतावर जाऊन पाणी लंपास केले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थितीमधे पाणी चोरीच्या या घटनेमुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार अर्ज दिला असल्याचे अहिरे यांनी सांगीतले. पाणी चोरीच्या या घटनेमुळे नागरिकांना पाणी कुलूपबंद ठेवण्याची वेळ आली आहे. शहरातील काही नागरिकांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून आपापल्या पाण्याच्या टाक्यांना कुलूप लावून पाणी साठवले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई