शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

पावसाळ्यात पाणी विकत घेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 19:14 IST

नाशिक : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागासाठी जीवनदान ठरलेली वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे ठप्प झाली आहे.

नाशिक : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागासाठी जीवनदान ठरलेली वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे ठप्प झाली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात वावीसह योजनेत समाविष्ट असलेल्या गावांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. वावीसह परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने पाण्याचे कोणतेही स्त्रोत उपलब्ध नसल्याने पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.सुमारे पाच वर्षांपूर्वी गोदावरी उजवा कालव्याजवळ कोळगावमाळ येथे तलाव करुन वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. या योजनेमुळे वावी व परिसरातील गावांचा टॅँकर बंद झाला होता. मात्र योजना झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे व्यत्यय येऊन पाणीपुरवठा खंडीत होण्याचा प्रकार घडत असतो. पाणीयोजनेला लागलेले समस्यांचे ग्रहण कायम असल्याने योजनेतील गावांना टंचाईचा सामना करण्याची वेळ येते.गेल्या आठ दिवसांपूर्वी कोळगावमाळ येथील तलावावर विद्युत जलपंपाचे स्टार्टर नादुरुस्त झाले होते. ते दुरुस्त केल्यानंतर त्याच दिवशी विद्युत जलपंप जळाला आहे. पाणीउपसा करणारे दोन्ही विद्युत जलपंप जळाल्याने वावी येथील जलकुंभात पाणी आले नाही. तलाव पाण्याने पूर्णपणे भरलेला असतांना केवळ तांत्रिक कारणामुळे वावीसह कहांडळवाडी, दुशिंगपूर, सायाळे, मलढोण, मिठसागरे, शहा या गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.पावसाळा सुरु होऊन दोन महिने झाले असतांना वावीसह परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्याने सर्व कूपनलिका कोरड्या पडल्या आहे. विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे पाण्याचा कोणताही स्त्रोत उपलब्ध नसल्याने योजनेतील हजारों ग्रामस्थांना टंचाईची झळ सहन करावी लागत आहे. खासगी टॅँकरकडून पाणी विकत घेण्याची वेळ वावीसह परिसरातील ग्रामस्थांवर आली आहे.पाणीपुरवठा समितीने ग्रामस्थांची गैरसोय विचारात घेऊन तातडीने तांत्रिक अडचणी दूर करुन पाणीपुरवठा करण्याची मागणी वावीसह योजने समाविष्ट असलेल्या ग्रामस्थांनी केली आहे.