शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

पावसाळ्यात पाणी विकत घेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 19:14 IST

नाशिक : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागासाठी जीवनदान ठरलेली वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे ठप्प झाली आहे.

नाशिक : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागासाठी जीवनदान ठरलेली वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे ठप्प झाली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात वावीसह योजनेत समाविष्ट असलेल्या गावांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. वावीसह परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने पाण्याचे कोणतेही स्त्रोत उपलब्ध नसल्याने पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.सुमारे पाच वर्षांपूर्वी गोदावरी उजवा कालव्याजवळ कोळगावमाळ येथे तलाव करुन वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. या योजनेमुळे वावी व परिसरातील गावांचा टॅँकर बंद झाला होता. मात्र योजना झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे व्यत्यय येऊन पाणीपुरवठा खंडीत होण्याचा प्रकार घडत असतो. पाणीयोजनेला लागलेले समस्यांचे ग्रहण कायम असल्याने योजनेतील गावांना टंचाईचा सामना करण्याची वेळ येते.गेल्या आठ दिवसांपूर्वी कोळगावमाळ येथील तलावावर विद्युत जलपंपाचे स्टार्टर नादुरुस्त झाले होते. ते दुरुस्त केल्यानंतर त्याच दिवशी विद्युत जलपंप जळाला आहे. पाणीउपसा करणारे दोन्ही विद्युत जलपंप जळाल्याने वावी येथील जलकुंभात पाणी आले नाही. तलाव पाण्याने पूर्णपणे भरलेला असतांना केवळ तांत्रिक कारणामुळे वावीसह कहांडळवाडी, दुशिंगपूर, सायाळे, मलढोण, मिठसागरे, शहा या गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.पावसाळा सुरु होऊन दोन महिने झाले असतांना वावीसह परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्याने सर्व कूपनलिका कोरड्या पडल्या आहे. विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे पाण्याचा कोणताही स्त्रोत उपलब्ध नसल्याने योजनेतील हजारों ग्रामस्थांना टंचाईची झळ सहन करावी लागत आहे. खासगी टॅँकरकडून पाणी विकत घेण्याची वेळ वावीसह परिसरातील ग्रामस्थांवर आली आहे.पाणीपुरवठा समितीने ग्रामस्थांची गैरसोय विचारात घेऊन तातडीने तांत्रिक अडचणी दूर करुन पाणीपुरवठा करण्याची मागणी वावीसह योजने समाविष्ट असलेल्या ग्रामस्थांनी केली आहे.