नाशिक : जुन्या पंडित कॉलनीमधील एकेरी वाहतुकीचा नियम अंमलात आणण्याचा पोलिसांचा खटाटोप अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे. या नियमाच्या अंमलबजावणीसाठी टिळकवाडी सिग्नलवर लावलेले बॅरिकेड हे वाहनचालकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे. तरण तलावाकडे जाणारे वाहनचालक या बॅरिकेडपुढे जाऊन वाहने उभी करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बॅरिकेड असून अडचण, नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे.टिळकवाडी सिग्नलवरून पुढे तरण तलाव सिग्नल अथवा कॅनडा कॉर्नर आणि सीबीएसच्या दिशेने मार्गक्रमण करण्यास शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून बंदी घालण्यात आली. हा उपाय जुन्या पंडित कॉलनीत निर्माण होणा-या वाहतूक कोंडीच्या समस्येवर पोलिसांनी शोधून काढला आहे. रस्त्यावर उभ्या राहणा-या चारचाकी वाहनांमुळे दुहेरी वाहतुकीसाठी हा रस्ता कमी पडत असताना पोलिसांनी अवैधरीत्या पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्याऐवजी एकेरी वाहतूक सुरू केली; मात्र एकूणच रोगापेक्षा आता इलाज भयंकर झाल्याच्या प्रतिक्रिया संतप्त नागरिकांकडून उमटत आहेत.
टिळकवाडी सिग्नल : पोलिसांचा खटाटोप;अपघातांना निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 21:49 IST
तरण तलावाकडे जाणारे वाहनचालक या बॅरिकेडपुढे जाऊन वाहने उभी करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बॅरिकेड असून अडचण, नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे.
टिळकवाडी सिग्नल : पोलिसांचा खटाटोप;अपघातांना निमंत्रण
ठळक मुद्देजुन्या पंडित कॉलनीच्या वळणावर पोलिसांकडून बॅरिकेड लावण्यात आलेले नाहीरोगापेक्षा आता इलाज भयंकर झाल्याच्या प्रतिक्रियाबॅरिकेड असून अडचण, नसून खोळंबा अशी स्थिती