शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

कांदा फेकला उकीरड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 01:02 IST

पाटोदा : खरीप हंगाम भांडवल तसेच घरखर्चासाठी चार पैसे मिळतील या आशेवर चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्यास कवडीमोल दर मिळत आहे. उत्पादन खर्चापेक्षा कितीतरी पटीने तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच गेल्या काही दिवसात वातावरणातील बदलामुळे तसेच पावसामुळे साठवून ठेवलेल्या कांद्यास पाणी लागल्याने चाळीतील हजारो क्विंटल कांदा सडून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव तो उकीरडयावर फेकून द्यावा लागत आहे. शासनाने हमी भावाने कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे

पाटोदा : खरीप हंगाम भांडवल तसेच घरखर्चासाठी चार पैसे मिळतील या आशेवर चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्यास कवडीमोल दर मिळत आहे. उत्पादन खर्चापेक्षा कितीतरी पटीने तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच गेल्या काही दिवसात वातावरणातील बदलामुळे तसेच पावसामुळे साठवून ठेवलेल्या कांद्यास पाणी लागल्याने चाळीतील हजारो क्विंटल कांदा सडून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव तो उकीरडयावर फेकून द्यावा लागत आहे. शासनाने हमी भावाने कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या येवला तालुक्यात शेतकरी नगदी पिक म्हणून कांदा पिक मोठया प्रमाणात घेतात. मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. पोळ कांदा व कांदा रोपे शेतातच सडले. त्यामुळे चाळीत साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्यास पंधरा हजार रु पयांपर्यंत दर मिळाला त्यामुळे अनेक शेतकºयांना मोठा फायदा झाला. आॅक्टोबर महिन्यातील या पावसाने शेतातील विहिरींना तसेच बोअरवेल्स आणि साठवण तलाव भरल्यामुळे शेतीसाठी मोठया प्रमाणात पाणी उपलब्ध झाले. या पाण्याच्या भरोशावर शेतकरी वर्गाने नोव्हेंबर तसेच डिसेंबर महिन्यात शेतात हजारो हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड केल. त्यासाठी एकरी सुमारे साठ ते सत्तर हजार रु पये खर्च केला. मात्र फेब्रुवारी महिन्यात आलेल्या बेमोसमी पावसाने उत्पादक शेतकºयांचा घात केला. या पावसाचे पाणी पोग्यात गेल्याने साठवण क्षमता शेतात असतानाच कमी झाली. त्यामुळे अनेक शेतकºयांनी कांदा साठवून न ठेवता विक्र ी करण्यास सुरु वात केली. त्यात कोरोना महामारीने लॉकडाऊनची भर पडली. त्यामुळे शेतकºयांना कांदा बाजारपेठेत विक्र ी करण्याची संधी मिळाली नाही. परिणामी कांदा साठवून ठेवण्याशिवाय शेतकºयांपुढे पर्याय नव्हता. शेतकरी वर्गाने कांद्याची टिकवण क्षमता टिकवून ठेवणाºया विविध प्रकारची औषधे तसेच पावंडर टाकून कांदा साठवून ठेवला.कांदा दरात घसरणअभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात सप्ताह भरात कांद्याच्या भावात दीडशे रु पयांनी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. शनिवारी(दि.१८ )३८६ ट्रॅक्टर्स द्वारे १० हजार क्विंटल कांद्याची आवक होऊन भाव किमान ३०० ते कमाल ९२० रु पये तर सरासरी ७०० रूपये मिळाला. दरम्यान,उशीरा झालेली कांदा लागवड तसेच वातावरणातील बदलाचा फटका यंदा साठवलेल्या कांद्यावर झाला असून चाळीतील कांदा सडू लागल्याने शेतकºयांनी कांदा मोठया प्रमाणावर विक्र ीसाठी आणण्यास सुरु वात केली आहे.-------------------------------खत म्हणून वापरउन्हाळ कांद्याची लागवड साधारणपणे नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत केली जाते. मात्र मागील वर्षी उन्हाळ कांद्यास मिळालेला दर पहाता शेतकरी वर्गाने मार्च अखेर पर्यंत कांदा लागवड केली. उत्पादित झालेला कांदा चाळीत साठवून ठेवला मात्र हा कांदा अल्पावधीत सडून गेला. त्यामुळे सडलेला कांदा शेतकºयांना उकीरड्यावर फेकून द्यावा लागत असून त्याचा खत म्हणून वापर करावा लागत आहे.------------------------------खरीप हंगामासाठी बी बियाणे तसेच रासायनिक खतांसाठी भांडवल म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडू लागला आहे. जो कांदा चांगला आहे त्यालाही कवडीमोल भाव मिळत आहे. केलेल्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने नुकसान सहन करावे लागत आहे. सडलेला कांदा उकिरड्यावर फेकून देण्याशिवाय पर्याय नाही. भाव मिळत नसल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे. शासनाने शेतकºयांचा खरेदी करून दिलासा द्यावा.- राजेंद्र पोकळे, शेतकरी पाटोदा

टॅग्स :Nashikनाशिक