शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

शेतजमिनी भांडवलदारांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:24 IST

केंद्रातील व राज्यातील मनुवादी विचारसरणी असलेल्या सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. वेगवेगळ्या प्रकल्पांच्या नावाखाली शेतकरी उद््ध्वस्थ करून त्यांच्या शेतजमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा घाट या सरकारने घातला असल्याची घनाघाती टीका सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टीचे नेते किशोर ढमाले यांनी केली आहे.

नाशिक : केंद्रातील व राज्यातील मनुवादी विचारसरणी असलेल्या सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. वेगवेगळ्या प्रकल्पांच्या नावाखाली शेतकरी उद््ध्वस्थ करून त्यांच्या शेतजमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा घाट या सरकारने घातला असल्याची घनाघाती टीका सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टीचे नेते किशोर ढमाले यांनी केली आहे. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे ४६वे पुष्प गुंफताना ‘बळीराजा, परंपरा आणि वास्तव’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र किसान सभेचे अध्यक्ष किसन गुज्जर व नानूबाई सूर्यवंशी उपस्थित होते. यावेळी बोलताना ढमाले म्हणाले, केंद्रात व राज्यात मनुवादी विचारसरणीचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील व देशातील शेतकरी संकटात आला आहे. शेतक ºयांची मूळ सिंधू संस्कृती ही कृषी आधारित आणि महिला प्रधान होती. परंतु पुरुष प्रधान आर्यांनी सिंधू संस्कृ तीवर अतिक्रमण करून येथील कृषी संस्कृतीच मोडीत काढण्याचे प्रयत्न केला.  प्रास्ताविक राजू गावले यांनी केले. सूत्रसंचालन सचिन मालेगावकर यांनी केले. अभिजित गोसावी यांनी आभार मानले.शेतकरीविरोधी धोरणदेशात आर्यांचे पाईक आणि मनुवादी विचारसणीचे सरकार देशात सत्तेत आल्याने शेतकरीविरोधी धोरण राबविले जात असून, शेतकºयांच्या सुपीक जमिनींवर मुंबई- दिल्ली कॉरिडॉर, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन यांसारखे प्रकल्प उभारून शेतकºयांना देशोधडीला लावण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच औद्योगिकीकरणाच्या नावाखाली शेतकºयांच्या जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा घाटला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.