शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बिनविरोध’च्या तक्रारीत तथ्य आढळल्यास नव्याने निवडणूक?; ६९ प्रकरणांची चौकशी, ‘नोटा’चे काय?
2
पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन; ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ६ जानेवारी २०२६ : आजचा दिवस आनंदाचा! आर्थिक लाभ संभवतात
4
‘बिनविरोध’वर गंडांतर; चेंडू आता हायकोर्टात, मनसेने दाखल केली याचिका, चौकशी करण्याची मागणी
5
काँग्रेसने ७० वर्षे शहरी विकासाकडे दुर्लक्ष केल्यानेच दुर्दशा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
6
शरद पवार पक्ष पुढे नेणार, की पुतण्यासोबत जाणार? मनपा निवडणुकीनंतर आगे आगे देखो होता है क्या!
7
ठाणे पालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार, ११० उमेदवार निवडून येतील: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
8
आम्ही काय केले? विचारणाऱ्यांनी आरसा पाहायला हवा; नाव न घेता अजितदादांना फडणवीसांचा सूचक इशारा
9
भाजपवर टीका नाही, पालिका अन् तेथील स्थानिक प्रश्नांबद्दल बोललो; अजित पवारांचे स्पष्टीकरण
10
‘मायावी’ महामुंबईसाठी राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांचे ‘जाळे’; भाजप-शिंदेसेनेचा जाहीरनामा कधी?
11
सत्ता अबाधित ठेवायला पक्ष, घर फोडत आहेत, आमच्या कामांचे श्रेय तुम्ही का घेता?: उद्धव ठाकरे
12
सत्ताधाऱ्यांच्या काळात ठाणे शहराची ओळख बदलली; संजय राऊतांची महायुतीवर टीका
13
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मनमानीला अखेर चाप; निवडणुकीला स्थगिती, हायकोर्टाचे ताशेरे
14
उमर खालीद, शरजिल इमामला दिलासा नाहीच, सुप्रीम कोर्टाने जामीन फेटाळाला; अन्य ५ जणांना जामीन
15
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला; एकाला अटक, हेतूची चौकशी सुरू
16
ऐन निवडणुकीत मनसेला मुंबईत मोठा धक्का; माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपाच्या वाटेवर
17
Video: विलासरावांच्या आठवणी लातूर शहरातून पुसल्या जातील; रवींद्र चव्हाणांच्या विधानानं वाद
18
मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश; रक्ताने पत्र लिहून इच्छामरणाची मागणी
19
खुला प्रवर्ग कुणासाठी राखीव नाही, सरकारी नोकरीत निवड मेरिटवर व्हावी; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
20
उल्हासनगरमध्ये अर्धे उमेदवार कोट्यधीश! ९३ कोटींचे मालक भाजपाकडे तर ५७ कोटींचे धनी शिंदेसेनेकडे
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिने पत्र पडून : नागरिकांचे मात्र हाल सुरू ‘आधार यंत्र’ आणायला प्रशासनाला नाही वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:26 IST

नाशिक : नागरिकाला आधार कार्डासाठी सक्ती केली जात असताना केंद्रांच्या अपुऱ्या संख्येमुळे नागरिकांना दिवसभर एकीकडे रांगा लावाव्या लागत असताना जळगाव जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेले ३५ आधार यंत्रे नाशिक जिल्ह्याला देण्याची तयारी यूआयडीने दर्शवूनही जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गेल्या तीन महिन्यांपासून आधार यंत्रे जळगावी पडून असल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देअधिकारी, कर्मचाºयांना वेळ नसल्याचे कारणअंगठे व माहिती गायब झाल्याने नागरिक हवालदिल

नाशिक : शासनाकडून प्रत्येक नागरिकाला आधार कार्डासाठी सक्ती केली जात असताना आधार केंद्रांच्या अपुऱ्या संख्येमुळे नागरिकांना दिवसभर एकीकडे रांगा लावाव्या लागत असताना जळगाव जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेले ३५ आधार यंत्रे नाशिक जिल्ह्याला देण्याची तयारी यूआयडीने दर्शवूनही जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गेल्या तीन महिन्यांपासून आधार यंत्रे जळगावी पडून असल्याचे वृत्त आहे. आधार यंत्र आणण्यासाठी अधिकारी, कर्मचाºयांना वेळ नसल्याचे त्यामागे कारण दिले जात आहे.काही वर्षांपूर्वी नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या खासगी कंपन्यांच्या आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड काढले. परंतु गेल्या वर्षी आधार अपडेशन करण्याच्या प्रक्रियेत शासनाने सर्व खासगी कंपन्यांकडून आधारचे काम काढून घेत शासनाकडूनच आधार यंत्र पुरविण्याचे ठरविले. यात हजारो नागरिकांनी यापूर्वी आधार काढूनही त्यांचे अंगठे व माहिती गायब झाल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.शासनाने निश्चित केलेले आधार केंद्रांची संख्या जिल्ह्यात जेमतेम १२२ इतकी असून, दिवसाकाठी फक्त ३० ते ३५ लोकांचीच आधारची नोंदणी होत असल्याने नागरिकांना थेट दोन, दोन महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. दुसरीकडे केंद्र व राज्य सरकार तसेच निमशासकीय व खासगी कंपन्यांनीही आता प्रत्येकाला आधार कार्ड सक्तीचे व अनिवार्य केले असल्यामुळे आधार यंत्रांच्या अपुºया संख्येमुळे आधारची गरज असलेल्या नागरिकांची आर्थिक पिळवणूकही होत असल्याच्या तक्रारी आहेत.अशा परिस्थितीत जळगाव जिल्ह्याला दिल्लीच्या यूआयडीने पुरविलेले आधार यंत्रे अतिरिक्त ठरले आहेत. नाशिक जिल्ह्याची असलेल्या मागणीचा विचार करता ३५ यंत्रे जळगावने नाशिकला देण्याची तयारी दर्शविली असून, तसे पत्रही नाशिक जिल्हा प्रशासनाला तीन महिन्यांपूर्वी पाठविले आहे.