शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

तीन लाख विद्यार्थ्यांना सुट्टीतही मिळणार आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 23:52 IST

नाशिक : दुष्काळग्रस्त आणि टंचाईसदृश गावांमधील विद्यार्थ्यांना शालेय सुट्टीतही पोषण आहार पुरविण्यात येणार असून, त्याचा लाभ जिल्ह्यातील बारा तालुक्यांमधील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांना होणार आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार अडीच हजार शाळांमधील विद्यार्थी पात्र ठरले आहेत. याबाबतच्या सूचना गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील बारा तालुक्यांसाठी उपाययोजना : दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांसाठी नियोजन

नाशिक : दुष्काळग्रस्त आणि टंचाईसदृश गावांमधील विद्यार्थ्यांना शालेय सुट्टीतही पोषण आहार पुरविण्यात येणार असून, त्याचा लाभ जिल्ह्यातील बारा तालुक्यांमधील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांना होणार आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार अडीच हजार शाळांमधील विद्यार्थी पात्र ठरले आहेत. याबाबतच्या सूचना गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे गाव-खेड्यातील नागरिकांपुढे पाणी आणि अन्नाचा मोठा प्रश्न आहे. निदान विद्यार्थ्यांच्या अन्नाचा प्रश्न मिटविण्यासाठी शाळेला सुटी असतानादेखील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, नांदगाव आणि सिन्नर या दुष्काळी भागातील शाळांमधील विद्यार्थी तसेच देवळा, इगतपुरी, नाशिक आणि चांदवड या टंचाईसदृश तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना शाालेय पोषण आहार पुरविला जाणार आहे. कळवण, दिंडोरी, निफाड आणि येवला या तालुक्यांमधील काही गणांमधील गावे दुष्काळी असल्याने त्यांनादेखील पोषण आहार पुरविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.या योजनेत आठ तालुक्यांमधील शंभर टक्के विद्यार्थ्यांना आहारासाठी पात्र ठरविण्यात आले आहे, तर उर्वरित कळवण, दिंडोरी, निफाड आणि येवला येथील काहीच शाळांमधील विद्यार्थी लाभार्थी ठरणार आहेत. बागलाणमधील ३८० शाळांमधील (४४,२७७), मालेगाव ४१८ शाळांमधील (७८,४४९), नांदगाव येथील २८५ शाळांमधील (३६,९४१), सिन्नरमधील २६५ शाळांचे (३८,७४०), देवळा तालुक्यातील १५२ शाळांमधील (१८,८६३), इगतपुरी तालुक्यातील २६७ शाळांचे (३१,३७०), नाशिक तालुक्यातील १३५ शाळांमधील (२०,९३३), चांदवडमधील २४० शाळांचे (२९,४३१), कळवणमधील ११५ शाळांचे (१२,५५७), दिंडोरी तालुक्यातील ५० शाळांमधील (७७७९), निफाड तालुक्यातील १८१ शाळांमधील (२९,१८८) तर येवला येथील २४१ शाळांमधील (२३,०३२ विद्यार्थ्यांना) शालेय पोषण आहाराचा लाभ मिळणार आहे.इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र धरण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांना सुटीत शालेय पोषण आहार देण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. शाळेच्या जवळ असणाऱ्या कोणत्याही एका शिक्षकाला शाळेत येऊन मुलांना खिचडी देण्याची जबाबदारी देण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. किती मुलांना खिचडी देण्यात आली याची नोंददेखील घेण्यात येणार आहे. सुटीच्या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांबरोबरच इतर मुले आले तरी त्यांनादेखील खिचडी देण्यात यावी, असेदेखील सुचविण्यात आले आहे.अतिरिक्त तांदळाची तरतूदनाशिक जिल्ह्यात दुष्काळग्रस्त टंचाईसदृश भागातील शाळांमध्ये पात्रविद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देण्याकरिता अतिरिक्त तांदूळ नियतन मंजूर करण्यात आले आहे. सदर तांदूळ नियतन उचल करून तत्काळ शाळांनावाटप करण्यात यावे, तसेच तांदूळ व्यपगत झाल्यास व दुष्काळात तांदूळअपुरा पडल्यास प्रशासकीय कारवाईचा इशारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे.