शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

तीन लाख विद्यार्थ्यांना सुट्टीतही मिळणार आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 23:52 IST

नाशिक : दुष्काळग्रस्त आणि टंचाईसदृश गावांमधील विद्यार्थ्यांना शालेय सुट्टीतही पोषण आहार पुरविण्यात येणार असून, त्याचा लाभ जिल्ह्यातील बारा तालुक्यांमधील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांना होणार आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार अडीच हजार शाळांमधील विद्यार्थी पात्र ठरले आहेत. याबाबतच्या सूचना गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील बारा तालुक्यांसाठी उपाययोजना : दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांसाठी नियोजन

नाशिक : दुष्काळग्रस्त आणि टंचाईसदृश गावांमधील विद्यार्थ्यांना शालेय सुट्टीतही पोषण आहार पुरविण्यात येणार असून, त्याचा लाभ जिल्ह्यातील बारा तालुक्यांमधील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांना होणार आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार अडीच हजार शाळांमधील विद्यार्थी पात्र ठरले आहेत. याबाबतच्या सूचना गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे गाव-खेड्यातील नागरिकांपुढे पाणी आणि अन्नाचा मोठा प्रश्न आहे. निदान विद्यार्थ्यांच्या अन्नाचा प्रश्न मिटविण्यासाठी शाळेला सुटी असतानादेखील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, नांदगाव आणि सिन्नर या दुष्काळी भागातील शाळांमधील विद्यार्थी तसेच देवळा, इगतपुरी, नाशिक आणि चांदवड या टंचाईसदृश तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना शाालेय पोषण आहार पुरविला जाणार आहे. कळवण, दिंडोरी, निफाड आणि येवला या तालुक्यांमधील काही गणांमधील गावे दुष्काळी असल्याने त्यांनादेखील पोषण आहार पुरविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.या योजनेत आठ तालुक्यांमधील शंभर टक्के विद्यार्थ्यांना आहारासाठी पात्र ठरविण्यात आले आहे, तर उर्वरित कळवण, दिंडोरी, निफाड आणि येवला येथील काहीच शाळांमधील विद्यार्थी लाभार्थी ठरणार आहेत. बागलाणमधील ३८० शाळांमधील (४४,२७७), मालेगाव ४१८ शाळांमधील (७८,४४९), नांदगाव येथील २८५ शाळांमधील (३६,९४१), सिन्नरमधील २६५ शाळांचे (३८,७४०), देवळा तालुक्यातील १५२ शाळांमधील (१८,८६३), इगतपुरी तालुक्यातील २६७ शाळांचे (३१,३७०), नाशिक तालुक्यातील १३५ शाळांमधील (२०,९३३), चांदवडमधील २४० शाळांचे (२९,४३१), कळवणमधील ११५ शाळांचे (१२,५५७), दिंडोरी तालुक्यातील ५० शाळांमधील (७७७९), निफाड तालुक्यातील १८१ शाळांमधील (२९,१८८) तर येवला येथील २४१ शाळांमधील (२३,०३२ विद्यार्थ्यांना) शालेय पोषण आहाराचा लाभ मिळणार आहे.इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र धरण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांना सुटीत शालेय पोषण आहार देण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. शाळेच्या जवळ असणाऱ्या कोणत्याही एका शिक्षकाला शाळेत येऊन मुलांना खिचडी देण्याची जबाबदारी देण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. किती मुलांना खिचडी देण्यात आली याची नोंददेखील घेण्यात येणार आहे. सुटीच्या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांबरोबरच इतर मुले आले तरी त्यांनादेखील खिचडी देण्यात यावी, असेदेखील सुचविण्यात आले आहे.अतिरिक्त तांदळाची तरतूदनाशिक जिल्ह्यात दुष्काळग्रस्त टंचाईसदृश भागातील शाळांमध्ये पात्रविद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देण्याकरिता अतिरिक्त तांदूळ नियतन मंजूर करण्यात आले आहे. सदर तांदूळ नियतन उचल करून तत्काळ शाळांनावाटप करण्यात यावे, तसेच तांदूळ व्यपगत झाल्यास व दुष्काळात तांदूळअपुरा पडल्यास प्रशासकीय कारवाईचा इशारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे.