शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख विद्यार्थ्यांना सुट्टीतही मिळणार आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 23:52 IST

नाशिक : दुष्काळग्रस्त आणि टंचाईसदृश गावांमधील विद्यार्थ्यांना शालेय सुट्टीतही पोषण आहार पुरविण्यात येणार असून, त्याचा लाभ जिल्ह्यातील बारा तालुक्यांमधील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांना होणार आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार अडीच हजार शाळांमधील विद्यार्थी पात्र ठरले आहेत. याबाबतच्या सूचना गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील बारा तालुक्यांसाठी उपाययोजना : दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांसाठी नियोजन

नाशिक : दुष्काळग्रस्त आणि टंचाईसदृश गावांमधील विद्यार्थ्यांना शालेय सुट्टीतही पोषण आहार पुरविण्यात येणार असून, त्याचा लाभ जिल्ह्यातील बारा तालुक्यांमधील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांना होणार आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार अडीच हजार शाळांमधील विद्यार्थी पात्र ठरले आहेत. याबाबतच्या सूचना गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे गाव-खेड्यातील नागरिकांपुढे पाणी आणि अन्नाचा मोठा प्रश्न आहे. निदान विद्यार्थ्यांच्या अन्नाचा प्रश्न मिटविण्यासाठी शाळेला सुटी असतानादेखील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, नांदगाव आणि सिन्नर या दुष्काळी भागातील शाळांमधील विद्यार्थी तसेच देवळा, इगतपुरी, नाशिक आणि चांदवड या टंचाईसदृश तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना शाालेय पोषण आहार पुरविला जाणार आहे. कळवण, दिंडोरी, निफाड आणि येवला या तालुक्यांमधील काही गणांमधील गावे दुष्काळी असल्याने त्यांनादेखील पोषण आहार पुरविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.या योजनेत आठ तालुक्यांमधील शंभर टक्के विद्यार्थ्यांना आहारासाठी पात्र ठरविण्यात आले आहे, तर उर्वरित कळवण, दिंडोरी, निफाड आणि येवला येथील काहीच शाळांमधील विद्यार्थी लाभार्थी ठरणार आहेत. बागलाणमधील ३८० शाळांमधील (४४,२७७), मालेगाव ४१८ शाळांमधील (७८,४४९), नांदगाव येथील २८५ शाळांमधील (३६,९४१), सिन्नरमधील २६५ शाळांचे (३८,७४०), देवळा तालुक्यातील १५२ शाळांमधील (१८,८६३), इगतपुरी तालुक्यातील २६७ शाळांचे (३१,३७०), नाशिक तालुक्यातील १३५ शाळांमधील (२०,९३३), चांदवडमधील २४० शाळांचे (२९,४३१), कळवणमधील ११५ शाळांचे (१२,५५७), दिंडोरी तालुक्यातील ५० शाळांमधील (७७७९), निफाड तालुक्यातील १८१ शाळांमधील (२९,१८८) तर येवला येथील २४१ शाळांमधील (२३,०३२ विद्यार्थ्यांना) शालेय पोषण आहाराचा लाभ मिळणार आहे.इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र धरण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांना सुटीत शालेय पोषण आहार देण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. शाळेच्या जवळ असणाऱ्या कोणत्याही एका शिक्षकाला शाळेत येऊन मुलांना खिचडी देण्याची जबाबदारी देण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. किती मुलांना खिचडी देण्यात आली याची नोंददेखील घेण्यात येणार आहे. सुटीच्या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांबरोबरच इतर मुले आले तरी त्यांनादेखील खिचडी देण्यात यावी, असेदेखील सुचविण्यात आले आहे.अतिरिक्त तांदळाची तरतूदनाशिक जिल्ह्यात दुष्काळग्रस्त टंचाईसदृश भागातील शाळांमध्ये पात्रविद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देण्याकरिता अतिरिक्त तांदूळ नियतन मंजूर करण्यात आले आहे. सदर तांदूळ नियतन उचल करून तत्काळ शाळांनावाटप करण्यात यावे, तसेच तांदूळ व्यपगत झाल्यास व दुष्काळात तांदूळअपुरा पडल्यास प्रशासकीय कारवाईचा इशारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे.