शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...! 
2
बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
3
अलास्काला ६, तर इंडोनेशियाला ६.२ तीव्रतेच्या भूकंपाचे झटके; 400 वर घरे उद्ध्वस्त, 7000 हून अधिक विस्थापित 
4
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
5
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
6
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
7
WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
8
लवकरच येतोय ICICI च्या जॉइंट व्हेंचरचा आयपीओ, केव्हा लॉन्च होणार? जाणून घ्या सविस्तर
9
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
10
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
11
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
12
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
13
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
14
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
15
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
16
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
17
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
18
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
19
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
20
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
Daily Top 2Weekly Top 5

तीन तलाक समर्थक ‘३५अ’ लादताना गप्प का ; शाहनवाज हुसेन यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 20:07 IST

जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० सोबतच लादण्यात आलेल्या ‘३५ अ’मुळे महिलांचा हा हक्क हिरावून शरियतमध्ये हस्तक्षेप होत असताना कोणीही आवाज उठवला नाही. मात्र केंद्रातील मोदी सरकारने मुस्लीम महिलांवरील अन्यायकारक तीन तलाकविरोधी कायदा केल्याने मुस्लीम शरियतमध्ये हस्तक्षेप होत असल्याची ओरड करण्यात आली. अशी ओरड करणारे जम्मू-काश्मीरमध्ये ३५ अ लादले जात असताना गप्प का होते, असा सवाल माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता शाहनवाज हुसेन यांनी केला आहे.

नाशिक : महिलांना वारसा हक्काने आई-वडिलांच्या मालमत्तेचा अधिकार सर्वप्रथम इस्लाम धर्मानेच दिला आहे. परंतु, जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० सोबतच लादण्यात आलेल्या ‘३५ अ’मुळे महिलांचा हा हक्क हिरावून शरियतमध्ये हस्तक्षेप होत असताना कोणीही आवाज उठवला नाही. मात्र केंद्रातील मोदी सरकारने मुस्लीम महिलांवरील अन्यायकारक तीन तलाकविरोधी कायदा केल्याने मुस्लीम शरियतमध्ये हस्तक्षेप होत असल्याची ओरड करण्यात आली. अशी ओरड करणारे जम्मू-काश्मीरमध्ये ३५ अ लादले जात असताना गप्प का होते, असा सवाल माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता शाहनवाज हुसेन यांनी केला आहे.नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय एकता अभियानांतर्गत रावसाहेब थोरात सभागृहात सोमवारी (दि.३०) शाहनवाज हुसेन यांनी ‘एक देश- एक संविधान’ विषयावर बोलताना काश्मीर कलम ३७० /३५ अ रद्द करण्यामागील पार्श्वभूमी उपस्थितांसमोर उलगडून सांगितली. ते म्हणाले, काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत देशातील जनतेने तीन तलाक आणि कलम ३७० व ३५ अ रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. जगभरातील १९ देशांमध्ये तीन तलाकवर बंदी असताना देशातील काही मोजक्या लोकांमुळे मुस्लीम महिलांवर अन्याय सुरू होता. त्यामुळे सरकारने या अन्यायाविरोधात कायदा केला. त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये ३५ अ मुळे महिलांवर अन्याय होत असताना कलम ३७० मुळे सरकारच्या कोणत्याही योजना काश्मिरी जनतपर्यंत पोहोचत नसल्याने सरकारने हे पाऊल उचलून सरदार पटेल यांचे अखंड भारताचे स्वप्न पूर्ण केले. आता पाकव्याप्त काश्मीरही भारतात आणल्यशिवाय सरकार शांत बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले.  

सीमेपलीकडील लोकांचे अस्तित्व धोक्यात शाहनवाज हुसेन यांनी पाकिस्तान आाणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीकेची झोड उठविली. तसेच देशाची विभागणी होत असताना ज्यांना भारताविषयी प्रेम होते ते माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, इंद्रकुमार गुजराल व लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखे नेते देशाच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचले. परंतु, ज्यांनी सीमेपर्यंत येऊन सीमा ओलांडली नाही त्यांना आता पाकिस्तानात कोणतेही अधिकार उरलेले नसून त्यांचे अस्तित्वही धोक्यात आल्याचे शाहनवाज हुसेन यांनी यावेळी नमूद के ले.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरNashikनाशिकBJPभाजपाPoliticsराजकारण