शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

तीन तलाक समर्थक ‘३५अ’ लादताना गप्प का ; शाहनवाज हुसेन यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 20:07 IST

जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० सोबतच लादण्यात आलेल्या ‘३५ अ’मुळे महिलांचा हा हक्क हिरावून शरियतमध्ये हस्तक्षेप होत असताना कोणीही आवाज उठवला नाही. मात्र केंद्रातील मोदी सरकारने मुस्लीम महिलांवरील अन्यायकारक तीन तलाकविरोधी कायदा केल्याने मुस्लीम शरियतमध्ये हस्तक्षेप होत असल्याची ओरड करण्यात आली. अशी ओरड करणारे जम्मू-काश्मीरमध्ये ३५ अ लादले जात असताना गप्प का होते, असा सवाल माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता शाहनवाज हुसेन यांनी केला आहे.

नाशिक : महिलांना वारसा हक्काने आई-वडिलांच्या मालमत्तेचा अधिकार सर्वप्रथम इस्लाम धर्मानेच दिला आहे. परंतु, जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० सोबतच लादण्यात आलेल्या ‘३५ अ’मुळे महिलांचा हा हक्क हिरावून शरियतमध्ये हस्तक्षेप होत असताना कोणीही आवाज उठवला नाही. मात्र केंद्रातील मोदी सरकारने मुस्लीम महिलांवरील अन्यायकारक तीन तलाकविरोधी कायदा केल्याने मुस्लीम शरियतमध्ये हस्तक्षेप होत असल्याची ओरड करण्यात आली. अशी ओरड करणारे जम्मू-काश्मीरमध्ये ३५ अ लादले जात असताना गप्प का होते, असा सवाल माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता शाहनवाज हुसेन यांनी केला आहे.नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय एकता अभियानांतर्गत रावसाहेब थोरात सभागृहात सोमवारी (दि.३०) शाहनवाज हुसेन यांनी ‘एक देश- एक संविधान’ विषयावर बोलताना काश्मीर कलम ३७० /३५ अ रद्द करण्यामागील पार्श्वभूमी उपस्थितांसमोर उलगडून सांगितली. ते म्हणाले, काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत देशातील जनतेने तीन तलाक आणि कलम ३७० व ३५ अ रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. जगभरातील १९ देशांमध्ये तीन तलाकवर बंदी असताना देशातील काही मोजक्या लोकांमुळे मुस्लीम महिलांवर अन्याय सुरू होता. त्यामुळे सरकारने या अन्यायाविरोधात कायदा केला. त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये ३५ अ मुळे महिलांवर अन्याय होत असताना कलम ३७० मुळे सरकारच्या कोणत्याही योजना काश्मिरी जनतपर्यंत पोहोचत नसल्याने सरकारने हे पाऊल उचलून सरदार पटेल यांचे अखंड भारताचे स्वप्न पूर्ण केले. आता पाकव्याप्त काश्मीरही भारतात आणल्यशिवाय सरकार शांत बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले.  

सीमेपलीकडील लोकांचे अस्तित्व धोक्यात शाहनवाज हुसेन यांनी पाकिस्तान आाणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीकेची झोड उठविली. तसेच देशाची विभागणी होत असताना ज्यांना भारताविषयी प्रेम होते ते माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, इंद्रकुमार गुजराल व लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखे नेते देशाच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचले. परंतु, ज्यांनी सीमेपर्यंत येऊन सीमा ओलांडली नाही त्यांना आता पाकिस्तानात कोणतेही अधिकार उरलेले नसून त्यांचे अस्तित्वही धोक्यात आल्याचे शाहनवाज हुसेन यांनी यावेळी नमूद के ले.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरNashikनाशिकBJPभाजपाPoliticsराजकारण