शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

वादळी पावसाने जिल्ह्यात तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 01:57 IST

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये ठिकठिकाणी वादळीवाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तिघांचा मृत्यू झाला असून, वीज पडून मयत झालेल्या इसमाच्या वारसांना तातडीची मदत म्हणून चार लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला आहे. याप्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाला आहे.

नाशिक : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये ठिकठिकाणी वादळीवाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तिघांचा मृत्यू झाला असून, वीज पडून मयत झालेल्या इसमाच्या वारसांना तातडीची मदत म्हणून चार लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला आहे. याप्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाला आहे.नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या तीन ते चार दिवसांपासून वादळ वाºयासह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे जिल्ह्णात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे नांदगाव तालुक्यातील सावरगाव येथील रहिवासी बाळू देवराम सावंत (४७) यांचे अंगावर वीजपडून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना दि. ६ रोजी घडली. त्याचप्रमाणे येवला तालुक्यातील आडगाव चोथवा येथील लताबाई शिवराम अहेर (४५) आणि निफाड तालुक्यातील काथरगाव येथील रहिवासी द्वारकाबाई माणिक रणपीस (५५) या महिलांचा अंगावर भिंत कोसळून मृत्यू झाला.शासानाच्या नियमाप्रमाणे नैसर्गिक आपत्तीत मयत झाल्याने सावंत यांच्या वारसांना तातडीची मदत म्हणून चार लाख रुपयांचा धनादेश नांदगाव तहसीलदारांनी त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द केला आहे. वादळी पावसामुळे दि. ७ रोजी मौजे काथरगाव येथील रहिवासी द्वारकाबाई रणपिसे  यांचा रात्री ११ वाजेच्या सुमारास अंगावर भिंत पडल्याने मृत्यू झाला. सायंकाळपासून सुरू झालेल्या वादळी पावसामुळे घराची भिंत खचल्यामुळे ही दुर्घटना घडली. या घटनेत त्यांचे पती माणिक लक्ष्मण रणपिसे (६०) हेदेखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर निफाड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे दोघे पती-पत्नी या ठिकाणी राहत होते.येवला तहसीलदारांनी लताबाई शिवराम अहेर यांच्या मृत्यू संदर्भातील प्राथमिक अहवाल जिल्हाधिकाºयांकडे सादर केला आहे.नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर आणि वीज अंगावरपडून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना आर्थिक मदतीची तरतूद आहे. भिंत अंगावर पडून मयत झालेल्या दुर्दैवी घटनेबाबत आर्थिक तरतूद नसली तरी शासनाकडून मदत मिळण्यासाठी तसा अहवाल शासनला पाठविण्यात आला आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी