शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

वादळी पावसाने जिल्ह्यात तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 01:57 IST

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये ठिकठिकाणी वादळीवाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तिघांचा मृत्यू झाला असून, वीज पडून मयत झालेल्या इसमाच्या वारसांना तातडीची मदत म्हणून चार लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला आहे. याप्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाला आहे.

नाशिक : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये ठिकठिकाणी वादळीवाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तिघांचा मृत्यू झाला असून, वीज पडून मयत झालेल्या इसमाच्या वारसांना तातडीची मदत म्हणून चार लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला आहे. याप्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाला आहे.नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या तीन ते चार दिवसांपासून वादळ वाºयासह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे जिल्ह्णात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे नांदगाव तालुक्यातील सावरगाव येथील रहिवासी बाळू देवराम सावंत (४७) यांचे अंगावर वीजपडून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना दि. ६ रोजी घडली. त्याचप्रमाणे येवला तालुक्यातील आडगाव चोथवा येथील लताबाई शिवराम अहेर (४५) आणि निफाड तालुक्यातील काथरगाव येथील रहिवासी द्वारकाबाई माणिक रणपीस (५५) या महिलांचा अंगावर भिंत कोसळून मृत्यू झाला.शासानाच्या नियमाप्रमाणे नैसर्गिक आपत्तीत मयत झाल्याने सावंत यांच्या वारसांना तातडीची मदत म्हणून चार लाख रुपयांचा धनादेश नांदगाव तहसीलदारांनी त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द केला आहे. वादळी पावसामुळे दि. ७ रोजी मौजे काथरगाव येथील रहिवासी द्वारकाबाई रणपिसे  यांचा रात्री ११ वाजेच्या सुमारास अंगावर भिंत पडल्याने मृत्यू झाला. सायंकाळपासून सुरू झालेल्या वादळी पावसामुळे घराची भिंत खचल्यामुळे ही दुर्घटना घडली. या घटनेत त्यांचे पती माणिक लक्ष्मण रणपिसे (६०) हेदेखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर निफाड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे दोघे पती-पत्नी या ठिकाणी राहत होते.येवला तहसीलदारांनी लताबाई शिवराम अहेर यांच्या मृत्यू संदर्भातील प्राथमिक अहवाल जिल्हाधिकाºयांकडे सादर केला आहे.नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर आणि वीज अंगावरपडून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना आर्थिक मदतीची तरतूद आहे. भिंत अंगावर पडून मयत झालेल्या दुर्दैवी घटनेबाबत आर्थिक तरतूद नसली तरी शासनाकडून मदत मिळण्यासाठी तसा अहवाल शासनला पाठविण्यात आला आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी