शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

साडे तीन हजार हेक्टर हरभरा पिक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 12:52 IST

पाटोदा :- हवामान बदलाचा फटका रब्बी हंगामातील सर्वच पिकांना बसत असल्याने शेतकरी वर्गाची अवस्था बिकट झाली आहे.यामुळे हरभरा पिकावर मोठया प्रमाणावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने येवला तालुक्यातील सुमारे साडेतीन हजार हेक्टरवरील हरभरा पिक धोक्यात आल्याने उत्पादनात निम्याने घट येणार असल्याची भीती निर्माण झाली आहे.

पाटोदा :- हवामान बदलाचा फटका रब्बी हंगामातील सर्वच पिकांना बसत असल्याने शेतकरी वर्गाची अवस्था बिकट झाली आहे.यामुळे हरभरा पिकावर मोठया प्रमाणावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने येवला तालुक्यातील सुमारे साडेतीन हजार हेक्टरवरील हरभरा पिक धोक्यात आल्याने उत्पादनात निम्याने घट येणार असल्याची भीती निर्माण झाली आहे. केलेला खर्चही वसूल होणार नसल्याने आधीच संकटात सापडलेला शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून तो पूर्णत: हवालदिल झाला आहे. मागील वर्षी आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने ऐन काढणीस आलेल्या खरीप हंगामाचे नुकसान झाले आहे. केलेला संपूर्ण खर्च वाया गेल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला असे असतांनाही शेतकरी वर्गाने नाउमेद न होता रब्बी हंगामासाठी भांडवल उपलब्ध करीत , गहू, हरभरा,ज्वारी आदि पिकांची शेतात मोठया प्रमाणात पेरणी केली. पेरणी केल्यानंतर पिकांची उगवणही चांगली झाली व पिकेही चांगली आली. मात्र त्यानंतर निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या तीन महिन्यापासून वातावरणात सतत बदल होत असल्याने तसेच दव ,थंडी व उष्ण वातावरणामुळे रब्बी हंगामातील सर्व पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी वर्गाने विविध प्रकारची बुरशीनाशके,किटकनाशकांची फवारणी करून पिके वाचविण्यासाठी प्रयत्न केले.आता हरभरा पिकाला फुलोरा लागला असून काही ठिकाणी घाटे लागले आहेत. मात्र हरभरा पिकावर अळीचा व मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.माव्यामुळे पिकाची वाढ खुंटली आहे तर अळी पाने व घाटे कुरतडले आहे.औषध फवारणी करूनही अळी नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी वैतागला आहे. अळी ही घाट्याच्या आतमध्ये जात असल्याने औषध फवारणीचा अळीवर परिणाम होत नाही.तसेच हवामानात दिवसातून तीन ते चार वेळेस बदल होत असल्याने पिकाचा बचाव कसा करावा ? असा यक्ष प्रश्न उत्पादक शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. या अळीमुळे हरभरा उत्पादनात निम्याने घट येणार असल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक