शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

यंदा हजार शिक्षकांच्या होणार बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:13 IST

शिक्षकांच्या दरवर्षीच बदल्या करण्याचे शासनाचे धोरण आहे. यंदाही मे महिन्यातच या बदल्या करण्यात याव्यात, अशी सूचना देण्यात आली असून, ...

शिक्षकांच्या दरवर्षीच बदल्या करण्याचे शासनाचे धोरण आहे. यंदाही मे महिन्यातच या बदल्या करण्यात याव्यात, अशी सूचना देण्यात आली असून, या बदल्या पारदर्शीपणे व्हाव्यात, यासाठी शासनस्तरावरूनच ऑनलाईन या बदल्या केल्या जाणार असल्या तरी, गाव, तालुका, जिल्हा पातळीवर असलेल्या शिक्षकांची मंजूर पदे, रिक्त पदांचा मेळ घालूनच या बदल्या करण्यात येणार असून, कोणतीही शाळा शिक्षकांविना राहू नये, असे धोरण आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, शाळा कधी सुरू होतील त्याविषयी अनिश्चितता असली तरी, शाळा सुरू होण्यापर्वीच बदल्यांची कार्यवाही पूर्ण केली जावी, अशा सूचना आहेत.

------

दिव्यांग, आजारी, विधवा शिक्षकांना प्राधान्य

शासनाच्या बदल्यांच्या धोरणात दिव्यांग, गंभीर आजारी असलेले, विधवा, परित्यक्ता हृदयरोगी, कॅन्सर, किडनी आजार असलेल्या शिक्षकांना या बदल्यांमध्ये प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यासाठी मात्र अशा शिक्षकांना आपल्या आजाराविषयीचे प्रमाणपत्रे सादर करावे लागणार आहे.

-------------

बदलीपात्र शिक्षकांचे निकष निश्चित

शिक्षकांच्या बदल्या करताना त्यासाठी शासनाने निकष ठरवून दिले आहेत. एकाच ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बदल्या केल्या जाणार असून, त्यातही त्या त्या शाळेतील शिक्षकांची सेवाज्येष्ठता गृहीत धरली जाणार आहे. जेणेकरून एकाच सोयीच्या ठिकाणी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्यांना अन्यत्र नेमणूक दिली जाणार आहे.

----------------

या बदल्यांमध्ये आंतरजिल्हा बदली करून येणाऱ्या शिक्षकांनाही संधी देण्यात आली आहे. आहे त्या ठिकाणाहून अन्य जिल्ह्यात बदली करून जाणाऱ्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी चार जिल्ह्यांचा पर्याय सुचवावा लागणार आहे. त्यातही त्यांनी प्राधान्यक्रम देणे क्रमप्राप्त आहे. त्या त्या जिल्ह्यातील रिक्त पदे व तेथून बदलून जाण्यास इच्छूक असलेल्या शिक्षकांच्या संख्येत या बदल्या केल्या जातील.

------------

सध्याची कोरोनाची भयावह परिस्थीती पाहता, यंदा शासनाने शिक्षकांच्या बदल्या टाळणेच योग्य होते. शासनाने कोरोनाचा पूर्णपणे नायनाट करण्यावर लक्ष केंद्रीत करावयास हवे. सारे स्थिरस्थावर झाल्यावर बदल्यांचा विचार करता येऊ शकतो. गेल्या वर्षीदेखील शासनाने बदल्या टाळल्या होत्या. फक्त आंतरजिल्हा बदल्यांमध्ये ज्यांची गैरसोय होत आहे. अशा शिक्षकांच्या बदल्या करण्यास हरकत नाही. मात्र, प्रशासकीय बदल्यांना महत्व नको.

- वैभव उपासनी, सहचिटणीस राज्य प्राथमिक शिक्षक संघ