शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

यंदा हजार शिक्षकांच्या होणार बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:13 IST

शिक्षकांच्या दरवर्षीच बदल्या करण्याचे शासनाचे धोरण आहे. यंदाही मे महिन्यातच या बदल्या करण्यात याव्यात, अशी सूचना देण्यात आली असून, ...

शिक्षकांच्या दरवर्षीच बदल्या करण्याचे शासनाचे धोरण आहे. यंदाही मे महिन्यातच या बदल्या करण्यात याव्यात, अशी सूचना देण्यात आली असून, या बदल्या पारदर्शीपणे व्हाव्यात, यासाठी शासनस्तरावरूनच ऑनलाईन या बदल्या केल्या जाणार असल्या तरी, गाव, तालुका, जिल्हा पातळीवर असलेल्या शिक्षकांची मंजूर पदे, रिक्त पदांचा मेळ घालूनच या बदल्या करण्यात येणार असून, कोणतीही शाळा शिक्षकांविना राहू नये, असे धोरण आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, शाळा कधी सुरू होतील त्याविषयी अनिश्चितता असली तरी, शाळा सुरू होण्यापर्वीच बदल्यांची कार्यवाही पूर्ण केली जावी, अशा सूचना आहेत.

------

दिव्यांग, आजारी, विधवा शिक्षकांना प्राधान्य

शासनाच्या बदल्यांच्या धोरणात दिव्यांग, गंभीर आजारी असलेले, विधवा, परित्यक्ता हृदयरोगी, कॅन्सर, किडनी आजार असलेल्या शिक्षकांना या बदल्यांमध्ये प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यासाठी मात्र अशा शिक्षकांना आपल्या आजाराविषयीचे प्रमाणपत्रे सादर करावे लागणार आहे.

-------------

बदलीपात्र शिक्षकांचे निकष निश्चित

शिक्षकांच्या बदल्या करताना त्यासाठी शासनाने निकष ठरवून दिले आहेत. एकाच ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बदल्या केल्या जाणार असून, त्यातही त्या त्या शाळेतील शिक्षकांची सेवाज्येष्ठता गृहीत धरली जाणार आहे. जेणेकरून एकाच सोयीच्या ठिकाणी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्यांना अन्यत्र नेमणूक दिली जाणार आहे.

----------------

या बदल्यांमध्ये आंतरजिल्हा बदली करून येणाऱ्या शिक्षकांनाही संधी देण्यात आली आहे. आहे त्या ठिकाणाहून अन्य जिल्ह्यात बदली करून जाणाऱ्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी चार जिल्ह्यांचा पर्याय सुचवावा लागणार आहे. त्यातही त्यांनी प्राधान्यक्रम देणे क्रमप्राप्त आहे. त्या त्या जिल्ह्यातील रिक्त पदे व तेथून बदलून जाण्यास इच्छूक असलेल्या शिक्षकांच्या संख्येत या बदल्या केल्या जातील.

------------

सध्याची कोरोनाची भयावह परिस्थीती पाहता, यंदा शासनाने शिक्षकांच्या बदल्या टाळणेच योग्य होते. शासनाने कोरोनाचा पूर्णपणे नायनाट करण्यावर लक्ष केंद्रीत करावयास हवे. सारे स्थिरस्थावर झाल्यावर बदल्यांचा विचार करता येऊ शकतो. गेल्या वर्षीदेखील शासनाने बदल्या टाळल्या होत्या. फक्त आंतरजिल्हा बदल्यांमध्ये ज्यांची गैरसोय होत आहे. अशा शिक्षकांच्या बदल्या करण्यास हरकत नाही. मात्र, प्रशासकीय बदल्यांना महत्व नको.

- वैभव उपासनी, सहचिटणीस राज्य प्राथमिक शिक्षक संघ