शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

शिवसेनेचे खूपच आस्ते कदम!

By किरण अग्रवाल | Updated: September 30, 2018 00:46 IST

अलीकडच्या काळात काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष लोकांचे प्रश्न हाती घेऊन रस्त्यावर उतरत असताना शिवसेना मात्र आवाज हरविल्यागत आस्ते कदम टाकताना दिसत आहे. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष असूनही या पक्षाची आक्रमकता नजरेस पडत नाही. संघटनात्मक पदाधिकारीही सुस्त असल्याचे दिसते. अशाने या पक्षाला स्वबळ सिद्ध करणे शक्य आहे का, हा प्रश्नच ठरावा.

ठळक मुद्देमहापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष असूनही या पक्षाची आक्रमकता नजरेस पडत नाही.संघटनात्मक पदाधिकारीही सुस्त स्वबळाची घोषणा करून बसलेल्या शिवसेनेत मात्र स्वस्थता‘जम्बो’ स्वरूपात सर्वांनाच संधी देऊनही नाराजी

अलीकडच्या काळात काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष लोकांचे प्रश्न हाती घेऊन रस्त्यावर उतरत असताना शिवसेना मात्र आवाज हरविल्यागत आस्ते कदम टाकताना दिसत आहे. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष असूनही या पक्षाची आक्रमकता नजरेस पडत नाही. संघटनात्मक पदाधिकारीही सुस्त असल्याचे दिसते. अशाने या पक्षाला स्वबळ सिद्ध करणे शक्य आहे का, हा प्रश्नच ठरावा.येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादीसह साऱ्या राजकीय पक्षांची सक्रियता वाढून गेली असताना स्वबळाची घोषणा करून बसलेल्या शिवसेनेत मात्र स्वस्थता दिसून यावी हे आश्चर्याचेच म्हणता यावे. विशेषत: संघटनात्मक पातळीवरील खांदेपालटानंतर नवीन पदाधिकारी जोमाने कामाला लागतात हा सार्वत्रिक अनुभव आहे; परंतु शिवसेनेत तसेही काही होताना दिसत नाही. उलट अलीकडेच केल्या गेलेल्या काही निवड-नियुक्त्यांवरून नाराजीचा पोळा फुटून गेला आहे. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात प्रभावी विरोधी पक्ष म्हणून पुढे आलेल्या शिवसेनेला नेमके झालेय काय, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरून गेले आहे.नाशिक महापालिकेच्या गेल्या निवडणुकीपूर्वी राजकीय सक्रियतेत शिवसेना आघाडीवर होती. दर आठवड्या-पंधरवड्यात कसल्या न कसल्या मुद्द्यावरून आंदोलन, निवेदन वगैरे सुरू असे; परंतु महापालिकेतील सत्तेत जाता न आल्यामुळे गेल्या वर्षभरात या पक्षात सुस्ती आली. विशेष म्हणजे, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून बाकी सारे पक्ष कामाला लागलेले दिसत आहेत. यासंदर्भाने शिवसेनेने स्वत:हून स्वबळाची घोषणाही करून झाली आहे; परंतु ते सिद्ध करण्यासाठी पक्ष-संघटनात्मक पातळीवर जी सिद्धता असायला हवी, ती काही दिसून येत नाही. आक्रमकता हा तर या पक्षाचा स्थायिभाव राहिला आहे; परंतु तो पुरता लोपल्याचे चित्र आहे. मध्यंतरी सहाएक महिन्यांपूर्वी पक्षाने महानगरप्रमुख पदांवरील व्यक्तींचा खांदेपालट केला. मूळ व निष्ठावान म्हणविणाºया सचिन मराठे यांना व त्यांच्या जोडीला महेश बडवे यांच्याकडे नेतृत्व सोपविण्यात आले. त्यामुळे पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत होते. नव्या-जुन्यांची सांगड घालून पक्ष बैठका होताना दिसत होत्या. परंतु लोकांसमोर येण्यासाठी लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणे जे अपेक्षित असते, ते काही दिसून येऊ शकले नाही.बरे, प्रश्न किंवा समस्या काही कमी आहेत, अशातलाही भाग नाही. शिवसेनेसाठी तसे पाहता आजघडीला भाजपा हा क्रमांक एकचा प्रतिस्पर्धी आहे. या भाजपाचीच नाशिक महापालिकेत सत्ता आहे. तेथे करवाढ व शहर बससेवा ताब्यात घेण्यासारखे विषय असताना त्याबाबत हवी तशी आक्रमकता दिसली नाही. नाशिकच्या विमानसेवेसाठी शिवसेनेचेच खासदार दिल्लीत आंदोलन करतात; परंतु गावातील बससेवेच्या विषयाबाबत गटनेत्यांच्या भूमिकेखेरीज पक्षाची म्हणून कसली बाजू समोर येत नाही. स्वाइन फ्लूमुळे गेल्या दोन महिन्यात सुमारे ३० जणांचा बळी गेला. डेंग्यूच्या तापाने शेकडो फणफणले असून, यावर्षी म्हणजे जानेवारी ते आतापर्यंतच्या नऊ महिन्यात जवळपास ५०० जणांना डेंग्यूचे निदान झाले आहे. पण, महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून बसणाºया शिवसेनेचा जणू घसा बसला आहे.महत्त्वाचे म्हणजे, राष्ट्रवादीचे एकवेळ ठीक; पण काँग्रेसची ताकद तर नाशकात तशी मर्यादित आहे, मात्र अलीकडे इंधन दरवाढ असो, की राफेल विमान खरेदीचा घोटाळा; काँगे्रसने मोर्चे आदी उपक्रमशीलता दाखवून जनमानसात वेगाने आपल्याबद्दलची विश्वासार्हता निर्माण करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. पुढच्या आठवड्यात त्यांची संघर्ष यात्राही येऊ घातली आहे. भुजबळ जामिनावर बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीनेही महापालिकेवर मोर्चा नेऊन मध्यंतरी गेलेले आपले अवसान पुन्हा आणण्याची धडपड केली. स्वाइन फ्लू व डेंग्यूच्या वाढत्या प्रसाराकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी औषध फवारणीची गांधीगिरीही केली. गेला बाजार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वंदे गुजरात चॅनलवरून शिक्षकांची शिकवणी घेण्यावरून गरबा खेळून आंदोलन केले. पण, शिवसेना कुठे हरवली? खरेच स्वबळ आजमावयाचे आहे, की अखेरीस भाजपासोबतच जावे लागेल म्हणून द्विधामन:स्थितीतून ही सुस्तता व शांतता ओढवली आहे, अशी शंका घेण्यास त्यामुळेच संधी मिळून गेली आहे.आश्चर्याची बाब अशी की, जनतेच्या प्रश्नांसाठी अन्य पक्ष रस्त्यावर उतरू लागले असताना आक्रमकतेचे ‘पेटंट’ असलेली शिवसेना ‘व्हॉइस आॅफ नाशिक’सारखे कार्यक्रम घेण्यात दंग दिसली. युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आरोग्य व स्वसंरक्षण शिबिरांच्या माध्यमातून सामाजिक भान दर्शविले; परंतु त्याव्यतिरिक्त लोकांचा व्हॉइस ठरणाºया शिवसेनेचा आवाज मात्र हरवलेला दिसतोय. लोकांचेही जाऊ द्या, प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी करण्याचेही स्थानिक पदाधिकाºयांना सुचले नाही. पक्ष सभासद नोंदणीचे अर्जही पडून आहेत म्हणे. एका विधानसभा मतदारसंघातील, म्हणजे मध्य नाशिकमधील पक्ष पदाधिकारी नेमले गेले तर त्याबाबत आरडा-ओरड सुरू आहे. ‘जम्बो’ स्वरूपात सर्वांनाच संधी देऊनही नाराजी घडून आली. त्यामुळे वाटचाल जणू थबकून गेली. तेव्हा, पक्षप्रमुखांचे स्वबळाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारायचे असेल तर अशा सुस्ततेने कसे चालेल?

टॅग्स :Politicsराजकारण