शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगार भरतीसाठी हजारो रुपयांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 00:04 IST

नाशिक : शहरात ठेकेदारामार्फत सफाई कामगार भरती करण्यासाठी १५ हजार रुपये वसूल केले जात असल्याचा मुद्दा नगरसेवकांनी उचलून धरला असताना काही राजकीय नेतेदेखील हात धुवून घेत असल्याचे वृत्त आहे.

नाशिक : शहरात ठेकेदारामार्फत सफाई कामगार भरती करण्यासाठी १५ हजार रुपये वसूल केले जात असल्याचा मुद्दा नगरसेवकांनी उचलून धरला असताना काही राजकीय नेतेदेखील हात धुवून घेत असल्याचे वृत्त आहे. सदरचा ठेका तीन वर्षांसाठी असल्याने ही मुदत संपताच महापालिकेत या सफाई कामगारांना कायम करण्यात येईल, असे आश्वासन देऊन ही चाळीस हजार रुपयांपासून दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम वसूल केली जात आहे. विशेष म्हणजे त्याला अनेक नगरसेवकांनी वाचा फोडली आहे.शहरातील सफाई कामगारांची संख्या कमी असल्याने महापालिकेने आउटसोर्सिंगद्वारे सातशे सफाई कामगार नियुक्त करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी ७७ कोटी रुपयांचा ठेका तीन वर्षांसाठी वॉटर ग्रेस कंपनीला दिला आहे. त्यावर बरेच वाद झाल्यानंतरदेखील उच्च न्यायालयानेदेखील या ठेक्याचा मार्ग मोकळा केला. सध्या ठेकेदारामार्फत कामगारांची भरती सुरू असून, त्यासाठी एका उमेदवाराकडून पंधरा हजार रुपये आकारत असल्याच्या तक्रारी आहेत. अर्थात, ही रक्कम अधिकृतरीत्या घेतली जात असल्याचा दावा कंपनीचे संचालक चेतन बोरा यांनी केला असून, त्यांनी त्यासाठी कारणेदेखील दिले आहेत. दरम्यान, एकीकडे ठेकेदार पंधरा हजार रुपये गोळा करीत असताना दुसरीकडे मात्र अनेक राजकीय नेत्यांनीदेखील हात मारण्यास सुरुवात केली आहे. ठेकेदारामार्फत कामगार भरण्यासाठी चाळीस हजार ते दोन लाख रुपयांच्या रकमेची मागणी केली जात असल्याचा भाव फुटला असून, त्यामुळे याच उमेदवारांना भरती करून घेण्यासाठी ठेकेदार कंपनीवरदेखील दबाव वाढविला जात आहे. महापालिकेत सध्या सफाई कामगार आणि अन्य सर्व प्रकारची भरती बंद आहे. अशावेळी ठेकेदारामार्फत तीन वर्षांसाठी कामगारांना भरती करून नंतर याच कामगारांना पाठीमागील दाराने महापालिकेच्या सेवेत घेण्याचे घाटत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तीन वर्षांचा कंत्राट संपला की, या कंत्राटी कामगारांनी तीन वर्षे शहराची सेवा केल्याचे सांगून या कामगारांना महापालिकेत कायम करण्यासाठी ठराव करण्याची तयारी असल्याचे सांगितले जात आहे.-------------------१२४०चा पॅटर्नमहापालिकेत यापूर्वी दुसऱ्या पंचवार्षिक कारकिर्दीत प्लेगच्या साथीचे निमित्त करून अशाच प्रकारे तत्कालीन ८७ नगरसेवकांचे प्रत्येकी दोन उमेदवार भरण्यात आले होते. नंतर ही संख्या इतकी वाढत गेली की, ती बाराशेवर पोहोचली. २००२-०३ मध्ये या १२४० हंगामी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले. त्यानंतर पुन्हा तोच कित्ता गिरवला जाण्याची शक्यता आहे. अर्थात, त्यावेळीदेखील मोठे अर्थकारण झाले होते.

टॅग्स :Nashikनाशिक