शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

हजारो हेक्टर कांदा पाण्याअभावी जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 18:29 IST

येवला : ह्यमहावितरणकडून सततच्या भारनियमनामुळे व वीज पुरवठा खंडित केल्याने कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होऊन जिल्ह्यातील हजारो हेक्टर कांदा ...

ठळक मुद्देभारत दिघोळे : येवल्यातील ठाणगावी शेतकऱ्यांशी संवाद

येवला : ह्यमहावितरणकडून सततच्या भारनियमनामुळे व वीज पुरवठा खंडित केल्याने कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होऊन जिल्ह्यातील हजारो हेक्टर कांदा पाण्याअभावी जळून गेल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे शंभर टक्के आर्थिक उत्पन्न बुडत असल्याचा आरोप होताना नाशिक जिल्ह्यात बघावयास मिळत आहे,ह्ण असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केले.तालुक्यातील ठाणगाव येथे रामदास हरिभाऊ गरुडे व सागर शेळके यांच्या शेतात भेटीप्रसंगी दिघोळे शेतकरी वर्गाशी संवाद साधताना बोलत होते. दोनच दिवसांपूर्वी गरुडे यांनी स्वतःच्या शेतातील साडेतीन एकर कांदा पाण्याअभावी जळून गेल्याने ट्रॅक्टरने नांगरून टाकला तर सागर शेळके यांनी आपला कांदा जाळून टाकला होता. या शेतकऱ्यांच्या शेतास दिघोळे यांनी भेट देऊन पाहणी केली.कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशांमध्ये शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जीवावरती शेती व्यवसाय करण्याचे जरी ठरवले तरी आस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतीतून शाश्वत नफा तर दूरच; परंतु उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्कील झाले आहे. देशात शेतमाल सोडून सर्वच गोष्टींचे बाजारभाव वाढलेले असताना कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशात कांद्याची सूत्र पूर्णपणे राज्यकर्त्यांच्या हातात गेले आहे. आता याच राज्यकर्त्यांनी कांद्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शीघ्र गतीने कृती करावी, अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी विरोधी राज्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये धडा शिकवू, असेही दिघोळे शेवटी म्हणाले.याप्रसंगी रवींद्र शेळके, नितीन शेळके, मोहन शेळके, गणपत भवर, महेश शेळके, सागर बोराडे, संपतराव शेळके, रमेश शेळके, राजू शेळके, नवनाथ कोंढरे, किशोर शेळके, किशोर कोंढरे, हृषीकेश भवर, माधव शेळके, प्रमोद भवर, तुषार शेळके, समाधान शेळके, भूषण भवर आदी शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार