शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

हजारो हेक्टर कांदा पाण्याअभावी जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 18:29 IST

येवला : ह्यमहावितरणकडून सततच्या भारनियमनामुळे व वीज पुरवठा खंडित केल्याने कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होऊन जिल्ह्यातील हजारो हेक्टर कांदा ...

ठळक मुद्देभारत दिघोळे : येवल्यातील ठाणगावी शेतकऱ्यांशी संवाद

येवला : ह्यमहावितरणकडून सततच्या भारनियमनामुळे व वीज पुरवठा खंडित केल्याने कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होऊन जिल्ह्यातील हजारो हेक्टर कांदा पाण्याअभावी जळून गेल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे शंभर टक्के आर्थिक उत्पन्न बुडत असल्याचा आरोप होताना नाशिक जिल्ह्यात बघावयास मिळत आहे,ह्ण असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केले.तालुक्यातील ठाणगाव येथे रामदास हरिभाऊ गरुडे व सागर शेळके यांच्या शेतात भेटीप्रसंगी दिघोळे शेतकरी वर्गाशी संवाद साधताना बोलत होते. दोनच दिवसांपूर्वी गरुडे यांनी स्वतःच्या शेतातील साडेतीन एकर कांदा पाण्याअभावी जळून गेल्याने ट्रॅक्टरने नांगरून टाकला तर सागर शेळके यांनी आपला कांदा जाळून टाकला होता. या शेतकऱ्यांच्या शेतास दिघोळे यांनी भेट देऊन पाहणी केली.कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशांमध्ये शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जीवावरती शेती व्यवसाय करण्याचे जरी ठरवले तरी आस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतीतून शाश्वत नफा तर दूरच; परंतु उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्कील झाले आहे. देशात शेतमाल सोडून सर्वच गोष्टींचे बाजारभाव वाढलेले असताना कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशात कांद्याची सूत्र पूर्णपणे राज्यकर्त्यांच्या हातात गेले आहे. आता याच राज्यकर्त्यांनी कांद्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शीघ्र गतीने कृती करावी, अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी विरोधी राज्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये धडा शिकवू, असेही दिघोळे शेवटी म्हणाले.याप्रसंगी रवींद्र शेळके, नितीन शेळके, मोहन शेळके, गणपत भवर, महेश शेळके, सागर बोराडे, संपतराव शेळके, रमेश शेळके, राजू शेळके, नवनाथ कोंढरे, किशोर शेळके, किशोर कोंढरे, हृषीकेश भवर, माधव शेळके, प्रमोद भवर, तुषार शेळके, समाधान शेळके, भूषण भवर आदी शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार