शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

हजारो हेक्टर कांदा पाण्याअभावी जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 18:29 IST

येवला : ह्यमहावितरणकडून सततच्या भारनियमनामुळे व वीज पुरवठा खंडित केल्याने कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होऊन जिल्ह्यातील हजारो हेक्टर कांदा ...

ठळक मुद्देभारत दिघोळे : येवल्यातील ठाणगावी शेतकऱ्यांशी संवाद

येवला : ह्यमहावितरणकडून सततच्या भारनियमनामुळे व वीज पुरवठा खंडित केल्याने कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होऊन जिल्ह्यातील हजारो हेक्टर कांदा पाण्याअभावी जळून गेल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे शंभर टक्के आर्थिक उत्पन्न बुडत असल्याचा आरोप होताना नाशिक जिल्ह्यात बघावयास मिळत आहे,ह्ण असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केले.तालुक्यातील ठाणगाव येथे रामदास हरिभाऊ गरुडे व सागर शेळके यांच्या शेतात भेटीप्रसंगी दिघोळे शेतकरी वर्गाशी संवाद साधताना बोलत होते. दोनच दिवसांपूर्वी गरुडे यांनी स्वतःच्या शेतातील साडेतीन एकर कांदा पाण्याअभावी जळून गेल्याने ट्रॅक्टरने नांगरून टाकला तर सागर शेळके यांनी आपला कांदा जाळून टाकला होता. या शेतकऱ्यांच्या शेतास दिघोळे यांनी भेट देऊन पाहणी केली.कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशांमध्ये शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जीवावरती शेती व्यवसाय करण्याचे जरी ठरवले तरी आस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतीतून शाश्वत नफा तर दूरच; परंतु उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्कील झाले आहे. देशात शेतमाल सोडून सर्वच गोष्टींचे बाजारभाव वाढलेले असताना कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशात कांद्याची सूत्र पूर्णपणे राज्यकर्त्यांच्या हातात गेले आहे. आता याच राज्यकर्त्यांनी कांद्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शीघ्र गतीने कृती करावी, अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी विरोधी राज्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये धडा शिकवू, असेही दिघोळे शेवटी म्हणाले.याप्रसंगी रवींद्र शेळके, नितीन शेळके, मोहन शेळके, गणपत भवर, महेश शेळके, सागर बोराडे, संपतराव शेळके, रमेश शेळके, राजू शेळके, नवनाथ कोंढरे, किशोर शेळके, किशोर कोंढरे, हृषीकेश भवर, माधव शेळके, प्रमोद भवर, तुषार शेळके, समाधान शेळके, भूषण भवर आदी शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार