शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
2
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
3
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
4
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
5
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
6
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
7
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
8
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
9
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
10
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
11
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
12
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
13
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
14
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
15
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
16
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
17
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
18
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
19
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
20
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं

देशभरात नवीन हजार ई-बाजार समित्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:25 IST

नाशिक : केंद्रीय कृषी मंत्रालय आणि शेतकरी कल्याणच्या वतीने देशभरात एक हजार नवीन ई-बाजार समित्या स्थापित करण्यात आल्या आहेत. ...

नाशिक : केंद्रीय कृषी मंत्रालय आणि शेतकरी कल्याणच्या वतीने देशभरात एक हजार नवीन ई-बाजार समित्या स्थापित करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय कृषी बाजार अर्थात ई-नामच्या वतीने या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे. त्यानुसार देशभरातील १८ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून या ई-बाजार समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला कोणत्या बाजार समितीत किती भाव मिळेल, ते समजू शकणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जिथे अधिक भाव मिळेल, तिथे त्यांचा माल विकणे शक्य होणार आहे. आतापर्यंत देशभरातील १ कोटी ६९ लाख शेतकरी आणि १ कोटी ५५ लाख व्यापाऱ्यांनी या ई-नामवर नोंदणी केली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट पैसे मिळण्याचीदेखील सुविधा मिळणार असल्याने त्यांची आर्थिक फसवणूक होण्याचा संभाव्य धोकादेखील त्यातून टाळण्यात आलेला आहे. या ई-बाजार समित्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता नजीकच्या भविष्यात अजून १ हजार ई-बाजार समित्या स्थापन करण्याची घोषणादेखील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात केलेली आहे.