शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

दिंडोरीत २० हजार हेक्टर पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 1:14 PM

दिंडोरी : यंदा सलग सुरू असलेल्या पावसाने व गेल्या पंधरवड्यातील परतीच्या पावसाने निम्म्याहून अधिक जवळपास २० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे.

दिंडोरी : यंदा सलग सुरू असलेल्या पावसाने व गेल्या पंधरवड्यातील परतीच्या पावसाने निम्म्याहून अधिक जवळपास २० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे. तालुक्यात १६५०० हेक्टर द्राक्ष, ६५०० हेक्टर टोमॅटो भाजीपाला तर १८५९४ हेक्टर खरीप पिकांची लागवड झालेली आहे. तालुक्यात पूर्व व पश्चिम अशी भौगोलिक रचना असून पश्चिम भागात भात, नागली, वरई, भाजीपाला तर पूर्व भागात द्राक्ष व भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात.यंदा उशिरा का होईना चांगला पाऊस झाल्याने सर्व खरिपाची पिके जोमदार होती मात्र ऐन काढणीच्या वेळी आलेल्या पावसाने पिकांची शेतातच नासाडी झाली आहे. भात, नागली, सोयाबीन पीक शेतात आडवे होत त्यावर पाणी साचून पिकांना कोंब फुटले आहेत. द्राक्ष छाटणीचा हंगाम सप्टेंबरच्या मध्यावर सुरू होतो. त्यानंतर सातत्याने पडणाऱ्या पावसाने द्राक्ष फुटीवर परिणाम होत घड जिरण्याचे प्रमाण वाढत उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत असतानाच विविध बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावणे शेतकरी त्रस्त आहेत. दररोज महागडे औषधें फवारणी करीत पीक वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. द्राक्ष बागांमध्ये गाळात फवारणीचे ट्रॅक्टर अडकण्याचे प्रकार वाढत ट्रॅक्टरचेही मोठे नुकसान झाले आहे. तरीही शेतकऱ्यांनी पीक वाचविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. परंतु गेल्या आठवड्यात रात्रभर झालेल्या पावसाने अनेक द्राक्षबागांमध्ये घडकुज मनीगळ होत अतोनात नुकसान झाले आहे. लाखो रु पये खर्च होऊन डोळ्यासमोर झालेले नुकसान बघून शेतकरी हताश झाले आहेत. टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, मिरची, कोथंबीर आदी भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले असून उत्पादन कमालीचे घटले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक