शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

दिंडोरीत २० हजार हेक्टर पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 13:14 IST

दिंडोरी : यंदा सलग सुरू असलेल्या पावसाने व गेल्या पंधरवड्यातील परतीच्या पावसाने निम्म्याहून अधिक जवळपास २० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे.

दिंडोरी : यंदा सलग सुरू असलेल्या पावसाने व गेल्या पंधरवड्यातील परतीच्या पावसाने निम्म्याहून अधिक जवळपास २० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे. तालुक्यात १६५०० हेक्टर द्राक्ष, ६५०० हेक्टर टोमॅटो भाजीपाला तर १८५९४ हेक्टर खरीप पिकांची लागवड झालेली आहे. तालुक्यात पूर्व व पश्चिम अशी भौगोलिक रचना असून पश्चिम भागात भात, नागली, वरई, भाजीपाला तर पूर्व भागात द्राक्ष व भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात.यंदा उशिरा का होईना चांगला पाऊस झाल्याने सर्व खरिपाची पिके जोमदार होती मात्र ऐन काढणीच्या वेळी आलेल्या पावसाने पिकांची शेतातच नासाडी झाली आहे. भात, नागली, सोयाबीन पीक शेतात आडवे होत त्यावर पाणी साचून पिकांना कोंब फुटले आहेत. द्राक्ष छाटणीचा हंगाम सप्टेंबरच्या मध्यावर सुरू होतो. त्यानंतर सातत्याने पडणाऱ्या पावसाने द्राक्ष फुटीवर परिणाम होत घड जिरण्याचे प्रमाण वाढत उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत असतानाच विविध बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावणे शेतकरी त्रस्त आहेत. दररोज महागडे औषधें फवारणी करीत पीक वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. द्राक्ष बागांमध्ये गाळात फवारणीचे ट्रॅक्टर अडकण्याचे प्रकार वाढत ट्रॅक्टरचेही मोठे नुकसान झाले आहे. तरीही शेतकऱ्यांनी पीक वाचविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. परंतु गेल्या आठवड्यात रात्रभर झालेल्या पावसाने अनेक द्राक्षबागांमध्ये घडकुज मनीगळ होत अतोनात नुकसान झाले आहे. लाखो रु पये खर्च होऊन डोळ्यासमोर झालेले नुकसान बघून शेतकरी हताश झाले आहेत. टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, मिरची, कोथंबीर आदी भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले असून उत्पादन कमालीचे घटले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक