शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

देणाऱ्याचे हात हजारो..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 23:04 IST

उपेक्षितांच्या मुखी दोन घास पडावेत, त्यांचेही जगणे सुलभ व्हावे, या समाजिक दातृत्वाच्या भावनेतून जिल्ह्यातील अनेक सेवाभावी संस्था, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था मदतीसाठी सरसावल्या आहेत. गरजूंना जीवनावश्यक वस्तूंसह मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे. हा मदतीचा महापूर गोदातीरी भरभरून वाहत असल्याने माणुसकीचा दाटलेला गहिवर सर्वत्र दिसून येत आहे. तर ’देणाºयाचे हात हजारो’ असून कोणत्याही रंजल्यागांजलेल्याची उदरझोळी रिती राहत नसल्याचे आशादायी चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : जिल्हाभरात सामाजिक संघटनांतर्फे गरजूंना साहित्य वाटप

टीम लोकमत ।नाशिक : कोरोनाचे संकट जिल्ह्यात थैमान घालत असल्याने संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणीहोत आहे. यामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे, तर अनेक निराधारांना जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीत उपेक्षितांच्या मुखी दोन घास पडावेत, त्यांचेही जगणे सुलभ व्हावे,या समाजिक दातृत्वाच्या भावनेतून जिल्ह्यातील अनेक सेवाभावी संस्था, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिकव शैक्षणिक संस्था मदतीसाठी सरसावल्या आहेत. गरजूंना जीवनावश्यक वस्तूंसह मास्क आणिसॅनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे. हा मदतीचा महापूर गोदातीरी भरभरून वाहत असल्याने माणुसकीचा दाटलेला गहिवर सर्वत्र दिसून येत आहे. तर ’देणाºयाचे हात हजारो’ असून कोणत्याही रंजल्यागांजलेल्याची उदरझोळी रिती राहत नसल्याचे आशादायी चित्र दिसून येत आहे.मनमाडला शिवा संघटनेतर्फे गरजूंना पोळीभाजीचे वाटपमनमाड : कोरोनाने देशभरात प्रचंड धुमाकूळ घातला असल्याने अनेकांना जगणे मुश्कील झाले आहे. असंख्य अनाथ लोकांच्या पोटापाण्याचे काय हा प्रश्न गंभीर झाला असताना येथील शिवा संघटना आणि लिंगायत समाज बांधवांकडून गरजूंना पोळीभाजी वाटप करण्यात आले.लॉकडाउन झाल्यापासून शहरात नागरिक घरांमध्ये आहेत आणि संचारबंदी लागू झाल्यामुळे मुक्त संचार करणे अवघड झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर येथील शहरातील अनाथ लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील अनेक सामाजिक संस्था संघटना आणि तरूण पुढे येऊन गोरगरिबांना अन्न-पाणी देण्याचे काम करीत आहेत. या उपक्र मात कैलास वाडकर, शशिकांत काखंडकी, अशोक बिदरी, करण वाडकर, हर्षद कोरपे, नितीन गुळवे, विजू तोडकर, संतोष चिनुके, प्रशांत तक्ते, प्रकाश नाईक, सिद्धेश गुळवे, शुभम सोनवणे, गोरख सोनवणे, सौरभ वाडकर, नितीन चिनुके आदी सहभागी झाले आहेत.विंचूरला गरिबांना धान्य वाटपविंचूर : सध्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असल्याने गोरगरिबांना विविध संघटना, संस्था यासह वैयिक्तक पातळीवर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे.येथे पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, युवा नेते नरेश परदेशी यांनी गरिबांना जीवनावश्यक वस्तू व किराणामालाचे वाटप केले.वैभव शेवाळे, रामदास पुंड या शेतकऱ्यांनी गहू उपलब्ध करून त्याचे वाटप आले. सहायक पोलीस उपनिरीक्षक देवीदास लाड, तलाठी शिर्के, योगेश गायकवाड यांच्याहस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न