शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

गोदावरी नदीत दूषित पाणीहजारो मासे पडले मृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 15:16 IST

सायखेडा : तामसवाडी परिसरात गोदावरी नदीच्या पात्रात दूषित पाणी आल्याने नदीच्या पात्रावर केमिकल युक्त पाण्याचा तरंग आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे ...

ठळक मुद्देकूपनलीकेद्वारे पाणी पुरवठा असणाऱ्या गावांना आरोग्याचा धोका

सायखेडा : तामसवाडी परिसरात गोदावरी नदीच्या पात्रात दूषित पाणी आल्याने नदीच्या पात्रावर केमिकल युक्त पाण्याचा तरंग आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर या दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत झाले असून नदीच्या काठावरआल्यामुळे सर्वत्र दुर्गन्धी पसरली आहे.गोदावरी नदीच्या काठावरून अनेक गावांना कूपनलिकेद्वारे पाईपलाईन करुन पाणी पुरवठा केला आहे. जवळपासच्या अनेक गावांना येथून पिण्यासाठी पाणी पुरविले जाते तर शेतीला सुद्धा हेच पाणी असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे.नाशिक शहरातील अनेक केमिकल युक्त औषध, कीटकनाशक कंपन्यामधून गोदावरी नदीच्या पात्रात सोडले जाते. गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या गावातील सांडपाणी याच नदीत येऊन मिळते, त्यामुळे पाणी वारंवार दूषित होते. चाटोरीपासून तर करंजगावपर्यत जवळपास वीस किलोमीटर अंतर पानवेलीने व्यापून टाकले आहे. या भागात नदी आहे की हिरवा गालीच्या हेच लक्षात येत नाही, त्यामुळे पानवेल खराब होण्याची शक्यता अधिक आहे.केमिकल युक्त पाणी की पानवेल सडल्यामुळे पाणी दूषित झाले याचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी आज मात्र लाखो मासे मरण पावले, तर मानवी आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन दोषीवर कारवाई करावी, नागरिक आणि मुके प्राणी यांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेजबाबदार लोकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहेचौकट...तामसवाडी शिवारात गोदावरी नदीत दूषित पाणी आले असून केमिकल युक्त पाणी असल्यामुळे अनेक मासे मृत झाले तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधित दोषी यांच्यावर कारवाई करावी- दत्ता आरोटे, जिल्हाध्यक्ष, प्रहार संगटना.(१६ सायखेडा)तामसवाडी शिवारात दूषित झालेले पाणी आणि मृत मासे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणgodavariगोदावरी