शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गोदावरी नदीत दूषित पाणीहजारो मासे पडले मृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 15:16 IST

सायखेडा : तामसवाडी परिसरात गोदावरी नदीच्या पात्रात दूषित पाणी आल्याने नदीच्या पात्रावर केमिकल युक्त पाण्याचा तरंग आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे ...

ठळक मुद्देकूपनलीकेद्वारे पाणी पुरवठा असणाऱ्या गावांना आरोग्याचा धोका

सायखेडा : तामसवाडी परिसरात गोदावरी नदीच्या पात्रात दूषित पाणी आल्याने नदीच्या पात्रावर केमिकल युक्त पाण्याचा तरंग आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर या दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत झाले असून नदीच्या काठावरआल्यामुळे सर्वत्र दुर्गन्धी पसरली आहे.गोदावरी नदीच्या काठावरून अनेक गावांना कूपनलिकेद्वारे पाईपलाईन करुन पाणी पुरवठा केला आहे. जवळपासच्या अनेक गावांना येथून पिण्यासाठी पाणी पुरविले जाते तर शेतीला सुद्धा हेच पाणी असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे.नाशिक शहरातील अनेक केमिकल युक्त औषध, कीटकनाशक कंपन्यामधून गोदावरी नदीच्या पात्रात सोडले जाते. गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या गावातील सांडपाणी याच नदीत येऊन मिळते, त्यामुळे पाणी वारंवार दूषित होते. चाटोरीपासून तर करंजगावपर्यत जवळपास वीस किलोमीटर अंतर पानवेलीने व्यापून टाकले आहे. या भागात नदी आहे की हिरवा गालीच्या हेच लक्षात येत नाही, त्यामुळे पानवेल खराब होण्याची शक्यता अधिक आहे.केमिकल युक्त पाणी की पानवेल सडल्यामुळे पाणी दूषित झाले याचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी आज मात्र लाखो मासे मरण पावले, तर मानवी आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन दोषीवर कारवाई करावी, नागरिक आणि मुके प्राणी यांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेजबाबदार लोकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहेचौकट...तामसवाडी शिवारात गोदावरी नदीत दूषित पाणी आले असून केमिकल युक्त पाणी असल्यामुळे अनेक मासे मृत झाले तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधित दोषी यांच्यावर कारवाई करावी- दत्ता आरोटे, जिल्हाध्यक्ष, प्रहार संगटना.(१६ सायखेडा)तामसवाडी शिवारात दूषित झालेले पाणी आणि मृत मासे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणgodavariगोदावरी