शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीतील दुषित पाण्याने हजारो मासे मृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 15:44 IST

सायखेडा : मार्च महिन्यात पाण्याची टंचाई जाणवू लागली असतानाच गोदावरी नदीत पाणी कमी झाले होते. नदीला पाणी सोडावी अशी मागणी जोर धरू लागली असतांनाच प्रशासनाने काही दिवसांपुर्वी गंगापुर धरणातुन गोदावरीला पाणी सोडले, मात्र सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी दुथडी भरून वहात असली तरी नदी पात्रातील दुषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून हजारो मासे मृत्युमुखी पडल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

सायखेडा : मार्च महिन्यात पाण्याची टंचाई जाणवू लागली असतानाच गोदावरी नदीत पाणी कमी झाले होते. नदीला पाणी सोडावी अशी मागणी जोर धरू लागली असतांनाच प्रशासनाने काही दिवसांपुर्वी गंगापुर धरणातुन गोदावरीला पाणी सोडले, मात्र सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी दुथडी भरून वहात असली तरी नदी पात्रातील दुषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून हजारो मासे मृत्युमुखी पडल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन गोदावरीला पाणवेलींचा विळखा पडत असल्याने, सुस्तावलेले प्रशासन मात्र कोणतेही हालचाल करत नसल्याने गोदाकाठ भागातील नागरिकांना पाणी असुनही नहाक त्रास सहन करावा लागत आहे. कोरडी पडलेली गोदावरी गंगापुर धरणाच्या आवर्तनाने खळाळली, त्यामुळे गोदाकाठ भागातील पाणी टंचाईचे गडद होत चाललेले संकट तुर्तास टळले आहे. तर नाशिक ते नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यापर्यंत पाणवेलींच्या विळख्यात अडकलेली गोदावरी काही प्रमाणात साफ होत, पुन्हा नाशिक भागातुन पाण्याबरोबर वहात आलेल्या पाणवेली गोदाकाठ भागात पसरल्याने गोदावरीवर पुन्हा गडप झाली आहे. गोदावरी उगमस्थानापासुनच समस्यांच्या विळख्यात अडकली आहे. त्यात नाशिक महानगर पालिका हद्दीतील, औद्योगिक वसाहतींमधील सांडपाणी नदीपात्रात सोडले जात असल्याने, गोदाकाठ भागातील ग्रामस्थांना दुषित पाणी प्यावे लागते. ओढा येथे गोदातिरावर असलेल्या डैमवर अनेक दिवसांपासुन पाणी साचुन होते, हे पाणी आवर्तन आल्याने गोदाकाठ भागात वाहून येत, या भागात पाण्याला दुर्गंधी येत आहे. तर आवर्तन सोडले जाते तेव्हा पाणी पुढे जावे, यासाठी गोदाकाठ भागातील विज पुरवठा खंडित केला जात असल्याने, नेहमीच पाणी असलेल्या गोदाकाठ भागातील शेतकरी, ग्रामस्थांना पाणी असुनही नहाक त्रास सहन करावा लागतो.

टॅग्स :Nashikनाशिक