शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

गोदावरीतील दुषित पाण्याने हजारो मासे मृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 15:44 IST

सायखेडा : मार्च महिन्यात पाण्याची टंचाई जाणवू लागली असतानाच गोदावरी नदीत पाणी कमी झाले होते. नदीला पाणी सोडावी अशी मागणी जोर धरू लागली असतांनाच प्रशासनाने काही दिवसांपुर्वी गंगापुर धरणातुन गोदावरीला पाणी सोडले, मात्र सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी दुथडी भरून वहात असली तरी नदी पात्रातील दुषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून हजारो मासे मृत्युमुखी पडल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

सायखेडा : मार्च महिन्यात पाण्याची टंचाई जाणवू लागली असतानाच गोदावरी नदीत पाणी कमी झाले होते. नदीला पाणी सोडावी अशी मागणी जोर धरू लागली असतांनाच प्रशासनाने काही दिवसांपुर्वी गंगापुर धरणातुन गोदावरीला पाणी सोडले, मात्र सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी दुथडी भरून वहात असली तरी नदी पात्रातील दुषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून हजारो मासे मृत्युमुखी पडल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन गोदावरीला पाणवेलींचा विळखा पडत असल्याने, सुस्तावलेले प्रशासन मात्र कोणतेही हालचाल करत नसल्याने गोदाकाठ भागातील नागरिकांना पाणी असुनही नहाक त्रास सहन करावा लागत आहे. कोरडी पडलेली गोदावरी गंगापुर धरणाच्या आवर्तनाने खळाळली, त्यामुळे गोदाकाठ भागातील पाणी टंचाईचे गडद होत चाललेले संकट तुर्तास टळले आहे. तर नाशिक ते नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यापर्यंत पाणवेलींच्या विळख्यात अडकलेली गोदावरी काही प्रमाणात साफ होत, पुन्हा नाशिक भागातुन पाण्याबरोबर वहात आलेल्या पाणवेली गोदाकाठ भागात पसरल्याने गोदावरीवर पुन्हा गडप झाली आहे. गोदावरी उगमस्थानापासुनच समस्यांच्या विळख्यात अडकली आहे. त्यात नाशिक महानगर पालिका हद्दीतील, औद्योगिक वसाहतींमधील सांडपाणी नदीपात्रात सोडले जात असल्याने, गोदाकाठ भागातील ग्रामस्थांना दुषित पाणी प्यावे लागते. ओढा येथे गोदातिरावर असलेल्या डैमवर अनेक दिवसांपासुन पाणी साचुन होते, हे पाणी आवर्तन आल्याने गोदाकाठ भागात वाहून येत, या भागात पाण्याला दुर्गंधी येत आहे. तर आवर्तन सोडले जाते तेव्हा पाणी पुढे जावे, यासाठी गोदाकाठ भागातील विज पुरवठा खंडित केला जात असल्याने, नेहमीच पाणी असलेल्या गोदाकाठ भागातील शेतकरी, ग्रामस्थांना पाणी असुनही नहाक त्रास सहन करावा लागतो.

टॅग्स :Nashikनाशिक