शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

ओबीसी आरक्षणाबाबत येणाऱ्या निवडणुकीत विचार : बाळासाहेब थोरात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 01:33 IST

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसींना आरक्षण देण्यात राज्य सरकार कमी पडले नाही, मात्र सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या जागांना स्थगिती दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक थांबवण्याची विनंती करून सगळ्या निवडणूक एकत्र घ्याव्यात असा आमचा आग्रह आहे. परंतु तरीही निवडणूक होत असेल तर सामोरे जावे लागेल. मात्र आगामी काळातील महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सरकार म्हणून काही तरी भूमिका घ्यावी लागेल असे सूतोवाच राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

ठळक मुद्देएकत्रित निवडणूक घेण्यासाठी आग्रही

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसींना आरक्षण देण्यात राज्य सरकार कमी पडले नाही, मात्र सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या जागांना स्थगिती दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक थांबवण्याची विनंती करून सगळ्या निवडणूक एकत्र घ्याव्यात असा आमचा आग्रह आहे. परंतु तरीही निवडणूक होत असेल तर सामोरे जावे लागेल. मात्र आगामी काळातील महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सरकार म्हणून काही तरी भूमिका घ्यावी लागेल असे सूतोवाच राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.नाशिक जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभांना उपस्थित राहण्यासाठी बाळासाहेब थोरात दौऱ्यावर आले असता त्यांनी शुक्रवारी (दि.१७) माध्यमांशी संपर्क साधला. राज्यातील परीक्षा घोटाळ्यातील दोषींवर कारवाई केली जाईल. मात्र परीक्षा घेणाऱ्या संस्था या पूर्वीच्या सरकारने नेमल्या असून, ज्या संस्था परीक्षा घेतात आमचा त्यावरच आक्षेप आहे, त्या संस्था बदलल्या पाहिजे उच्च दर्जाच्या संस्था निवडल्या पाहिजे असेही थोरात म्हणाले. महाविकास आघाडी सरकारकडून काँग्रेसला अपुरा निधी दिला जात असल्याच्या तक्रारीबाबत थोरात यांनी निधी वाटपात कोणतीही असमानता नाही, विभागानुसार निधी वाटप केला जातो, त्यामुळे काँग्रेसच्या सदस्यांनाही निधी मिळत असल्याचे सांगितले. काँग्रेस आहे म्हणून महाविकास आघाडी सरकार आहे या अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावर ते काहीच चुकीचे बोलले नाहीत, राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे व त्यात काँग्रेसचे महत्व असल्याचे ते म्हणाले.

बांगलादेश मुक्तीच्या कार्यक्रमात इंदिरा गांधीचे नाव टाळण्यात आले, पण प्रत्येकाच्या मनात इंदिरा गांधीचे नाव होते. अटलजींचे मोठे मन होते, आता दुर्दैवाने तसे दिसत नाही असा टोलाही थोरात यांनी भाजपला लगावला. चंद्रकांत पाटील यांना रात्री स्वप्न पडतात आणि सकाळी ते बोलत असतात, त्यामुळे सत्तेत येण्याचे स्वप्न पडत असतात असे सांगून थोरात यांनी चंद्रकांत पाटील यांनी काही गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे, शिवाजी महाराज साऱ्यांचेच श्रद्धास्थान आहेत, त्यांना मर्यादित करू नये, ते व्यापक होते, रयतेचे राजे होते असा सल्लाही दिला आहे.

टॅग्स :NashikनाशिकOBC Reservationओबीसी आरक्षणBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात