शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
8
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
9
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
10
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
11
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
12
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
13
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
14
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
15
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
16
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
17
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
18
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
19
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
20
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल

‘त्या’ शेतकऱ्यांनी घरोघरी जाऊन विकली द्राक्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 00:24 IST

योगेश सगर। लोकमत न्यूज नेटवर्क कसबे सुकेणे : कोणी म्हणे बेदाणा करा.. कोणी म्हणे दहा रुपये किलोने व्यापाºयाला द्या.. अनेकांनी तर द्राक्षबाग तोडायचे सल्ले दिले.. द्राक्षांचे करायचे काय? तीन लाख रुपये कर्ज कसे फेडायचे ? त्यादिवशी रात्रभर झोप नाही.. असा विचार करताना एक कल्पना सुचली. इतर शेतकऱ्यांच्या मदतीने आपणच आपली द्राक्षे विकली तर ? आणि सकाळी उठलो.. इतरांनाही कल्पना पटली.. आणि मजूर, व्यापारी, हातविक्री, किरकोळ व्यावसायिकांच्या भूमिकेत थेट नाशिक गाठले. गल्लोगल्ली जाऊन ‘नाशिकची गोड.. द्राक्ष.. घ्या.. शेतकºयाला मदत करा..’ असं म्हणत म्हणत आमची दोन तासात तब्बल दहा क्विंंटल द्राक्ष हातोहात संपली...

योगेश सगर।लोकमत न्यूज नेटवर्ककसबे सुकेणे : कोणी म्हणे बेदाणा करा.. कोणी म्हणे दहा रुपये किलोने व्यापाºयाला द्या.. अनेकांनी तर द्राक्षबाग तोडायचे सल्ले दिले.. द्राक्षांचे करायचे काय? तीन लाख रुपये कर्ज कसे फेडायचे ? त्यादिवशी रात्रभर झोप नाही.. असा विचार करताना एक कल्पना सुचली. इतर शेतकऱ्यांच्या मदतीने आपणच आपली द्राक्षे विकली तर ? आणि सकाळी उठलो.. इतरांनाही कल्पना पटली.. आणि मजूर, व्यापारी, हातविक्री, किरकोळ व्यावसायिकांच्या भूमिकेत थेट नाशिक गाठले. गल्लोगल्ली जाऊन ‘नाशिकची गोड.. द्राक्ष.. घ्या.. शेतकºयाला मदत करा..’ असं म्हणत म्हणत आमची दोन तासात तब्बल दहा क्विंंटल द्राक्ष हातोहात संपली...देवपूरचे संतोष शिरसाठ, दात्याणेचे गोरख गुरगुडे, पिंंपळगावचे केशव बनकर आणि उंबरखेडचे विकास आथरे या तरुण शेतकºयांनी कोरोनाच्या लॉकडाउन काळात आलेल्या संकटावर मात करण्याचा असा उपाय शोधला. निफाड तालुक्यातील चार शेतकºयांनी कोरोनामुळे ओढवलेल्या संकटाचा धीराने सामना करत विक्रीच्या कडू-आंबट संघर्षात चांगली कमाई केली. या चार शेतकºयांनी स्वत:च मजूर, व्यापारी बनत आपल्या बागेतील द्राक्ष पॅकिंंग करून महाराष्ट्रातल्या विविध बाजारपेठांमध्ये विक्री सुरू केली आहे.कोणत्याही परिस्थितीत हार न मानता दारोदारी जाऊन घरपोहोच द्राक्ष विक्री सुरू केली आहे आणि किरकोळ व्यापारातून दोन पैसेही हातात पडू लागले. याकामी त्यांना जिल्हा प्रशासनानेही सहकार्य केले. कोरोनाच्या मंदीमधून संधी शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यापुढेही आपण याच व्यवस्थेत काम करून उत्पादक ते ग्राहक ही थेट वितरणव्यवस्था निर्माण करून ग्राहकाला दर्जेदार माल देत मधल्या दलालांच्या साखळीतून ही वितरणप्रणाली मुक्त करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असे हे तरुण शेतकरी सांगतात.

टॅग्स :Nashikनाशिक