शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

होम कोरंटाइन असूनही गायब होणारे तीस जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:04 IST

विदेशातून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना होम कोरंटाइन केले जाते. मात्र, त्यानंतरदेखील अनेक जण गायब होतात. त्यामुळे महापालिकेने त्यासाठी चांगली युक्ती शोधली असून, अशा व्यक्तीच्या घरावर ‘हे घर कोरंटाइनमध्ये आहे’, असे स्टिकर्स चिकटवले आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या सजग नागरिकांमुळे महापालिकेला सहजगत्या गायब होणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळत असून, त्या आधारे आत्तापर्यंत सुमारे तीस नागरिकांना प्रशासनाने शोधून ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देमनपाकडून दखल : घरांवर लावले जातात स्टिकर्स

नाशिक : विदेशातून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना होम कोरंटाइन केले जाते. मात्र, त्यानंतरदेखील अनेक जण गायब होतात. त्यामुळे महापालिकेने त्यासाठी चांगली युक्ती शोधली असून, अशा व्यक्तीच्या घरावर ‘हे घर कोरंटाइनमध्ये आहे’, असे स्टिकर्स चिकटवले आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या सजग नागरिकांमुळे महापालिकेला सहजगत्या गायब होणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळत असून, त्या आधारे आत्तापर्यंत सुमारे तीस नागरिकांना प्रशासनाने शोधून ताब्यात घेतले आहे.कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी विदेशातून प्रवास करून आलेल्यांबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे. विशेषत: केंद्र आणि राज्य सरकारने कोरोनाग्रस्त देशांची यादी तयार केली असून, या देशातून जाऊन आलेल्या नागरिकांची माहिती घेतली जाते. तसेच त्यांना घरातच निगराणीखाली ठेवले जाते.चौदा दिवस त्यांना अशाप्रकारे देखरेखीखाली ठेवताना त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली जाते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आहे किंवा नाही याची तत्काळ माहिती मिळते. विशेषत: चीन, इटली, जर्मनी यांसारख्या देशांतून १५ मार्चनंतर प्रवास करून आलेल्यांची विशेष दक्षता घेतली जाते आणि त्यांची तपासणी केली जाते. परंतु त्यानंतरदेखील अनेक जण गायब होतात. संसर्ग टाळण्यासाठी त्यांनी घरातच राहणे आवश्यक असतानादेखील अनेक जण कामाचे निमित्त करून घराबाहेर पडतात. त्यांना संसर्ग असेल तर तो समाजासाठी धोकादायक ठरू शकत असल्याने अखेरीस त्यांचा शोध घेऊन पकडावे लागते.महापालिकेने त्यावर पर्याय शोधला असून, संबंधित सोसायटी किंवा बंगल्यावर हे घर कोरंटाईनमध्ये आहे असे स्टिकर लावले जात आहे.त्यामुळे आजूबाजूचे नागरिक सतर्क होतात आणि समजा त्या घरातील व्यक्ती विशेषत: विदेशातून आलेला सदस्य घराबाहेर पडलाच तर कोणी ना कोणी सजग नागरिक महापालिकेला तत्काळ कळवतात. त्यामुळे महापालिकेला संंबंधितांचा शोध घेणे सोपे जाते.महापालिकेने अशा प्रकारे तीनशे घरांवर स्टिकर्स लावले असून त्यामुळे आत्तापर्यंत तीस जणांना पुन्हा शोधण्यात आले आहे. वारंवार सूचना देऊनही नागरिक ऐकत नसतील तर अशा नागरिकांची मात्र तपोवनातील विशेष विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात येत आहे.महापालिकेने आत्तापर्यंत तीनशे घरांना स्टिकर्स लावले आहेत. निगराणीतून कोणी व्यक्ती बाहेर पडलाच तर स्टिकर्समुळे सजग नागरिक तत्काळ महापालिकेला कळवतात. संबंधित माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवली जातात. आत्तापर्यंत सूचनांचे पालन न करणारे तीस नागरिक ताब्यात घेतले असून पाच जणांना तपोवनातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. - राधाकृष्ण गमे, आयुक्त, महापालिका

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य