शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

तीस अधिकारी वेतनापासून वंचित

By admin | Updated: January 11, 2017 00:58 IST

पालकमंत्र्यांना साकडे : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची अवस्था

नाशिक : जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील कार्यरत सुमारे ३० अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून थकल्याचे वृत्त आहे. केंद्राचे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व पालकमंत्री गिरीश महाजन यांना साकडे घालूनही अद्याप या कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. नुकत्याच झालेल्या २८ डिसेंबरच्या दक्षता समितीच्या बैठकीत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना या ३० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेतनाबाबत साकडे घातले आहे. इतकेच नव्हे तर संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनाही या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले. मात्र तरीही याबाबत तीन महिन्यांपासून अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नसल्याचे चित्र आहे. सहायक प्रकल्प अधिकारी उपअभियंता, कक्ष अधिकारी, वरिष्ठ व कनिष्ठ सहायक, लिपिक, परिचर यांसह सुमारे ३० अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून रखडल्याने कर्मचारी व अधिकारी हवालदिल झाले आहेत. तीन महिन्यांपासून वेतन नसल्याने या कर्मचाऱ्यांना दैनंदिन किराणा सोडाच गृहकर्जाचे हप्तेही वेळेवर भरता येत नसल्याने त्यांना बॅँकेकडून नोटिसा प्राप्त होत आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा वाटा ६० टक्के केंद्र सरकार व ४० टक्के राज्य सरकार उचलत असते. वेतनासाठी १ कोटी निधींची मागणी केली असता फक्त १४ ते १५ लाख रुपये देऊन या कर्मचारी व अधिकाऱ्यांची बोळवण करण्यात येते. याबाबत मंगळवारी (दि. १०) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना भेटून निवेदन दिले. तसेच ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनाही निवेदन पाठविले आहे. एकीकडे केंद्र सरकारच्या पंतप्रधान घरकुल आवास योजनेसाठी रात्रंदिवस कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुसरीकडे मासिक वेतनासाठी मात्र केंद्र व राज्य सरकारकडे हात पसरण्याची वेळ आली आहे. निवेदनावर उपअभियंता डी. एस. परदेशी, लेखाधिकारी उदय लोकापल्ली, सहायक प्रकल्प अधिकारी पी. आर. पांडे, बी. एन. तागड, कनिष्ठ प्रशासन अधिकारी संजय कुमावत, विस्तार अधिकारी एस. व्ही. बिरारी यांच्यासह २१ कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)