शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

हिंगणवेढ्याला बिबट्याचा महिनाभरात तिसरा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 17:26 IST

गाय ठार : परिसरातील शेतकरीवर्गात दहशत

ठळक मुद्देबिबट्याचा लोकवस्तीमध्ये होणारा संचार यामुळे शेतीची कामांना रोख लागला आहे.

चांदोरी : नाशिक तालुक्यातील हिंगणवेढे गावात गेल्या दोन महिन्यांपासून बिबटयाची प्रचंड दहशत निर्माण झाली असून महिनाभरात बिबट्याने तिसऱ्यांदा हल्ला चढवत एका गाईचा बळी घेतला आहे. काही दिवसांपूर्वी गोपालवाडी येथील साहेबराव धात्रक यांचे श्वान बिबटयाने फस्त केले होते तर राम मंदिर परिसरातील किसन मोरे यांची शेळी ठार झाली होती. आता अशोक तुकाराम धात्रक यांच्या दुभत्या गाईवर हल्ला चढवल्याने तिचा मृत्यू झाला आहे.हिंगणवेढे परिसरात वारंवार अशा गंभीर घटना घडत असल्याने संपूर्ण गावात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याचा लोकवस्तीमध्ये होणारा संचार यामुळे शेतीची कामांना रोख लागला आहे. हिंगणवेढे गावात उसाची शेतीचे क्षेत्र जास्त प्रमाणात असल्याने व ऊसाची शेती हे बिबट्यासाठी लपण्याकरीता सुरक्षित जागा असल्याने परिसरात बिबट्यांचे दर्शन वारंवार घडत आले आहे. त्यामुळे शेतमजूर काम करण्यास तयार नाहीत, त्याचा परिणाम सध्या सुरू ऊस तोडी हंगामावर होत आहे. या घटनांची वनविभाग गंभीर दखल घेत नसल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वन विभागाने परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे

टॅग्स :Nashikनाशिक