शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणवेढ्याला बिबट्याचा महिनाभरात तिसरा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 17:26 IST

गाय ठार : परिसरातील शेतकरीवर्गात दहशत

ठळक मुद्देबिबट्याचा लोकवस्तीमध्ये होणारा संचार यामुळे शेतीची कामांना रोख लागला आहे.

चांदोरी : नाशिक तालुक्यातील हिंगणवेढे गावात गेल्या दोन महिन्यांपासून बिबटयाची प्रचंड दहशत निर्माण झाली असून महिनाभरात बिबट्याने तिसऱ्यांदा हल्ला चढवत एका गाईचा बळी घेतला आहे. काही दिवसांपूर्वी गोपालवाडी येथील साहेबराव धात्रक यांचे श्वान बिबटयाने फस्त केले होते तर राम मंदिर परिसरातील किसन मोरे यांची शेळी ठार झाली होती. आता अशोक तुकाराम धात्रक यांच्या दुभत्या गाईवर हल्ला चढवल्याने तिचा मृत्यू झाला आहे.हिंगणवेढे परिसरात वारंवार अशा गंभीर घटना घडत असल्याने संपूर्ण गावात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याचा लोकवस्तीमध्ये होणारा संचार यामुळे शेतीची कामांना रोख लागला आहे. हिंगणवेढे गावात उसाची शेतीचे क्षेत्र जास्त प्रमाणात असल्याने व ऊसाची शेती हे बिबट्यासाठी लपण्याकरीता सुरक्षित जागा असल्याने परिसरात बिबट्यांचे दर्शन वारंवार घडत आले आहे. त्यामुळे शेतमजूर काम करण्यास तयार नाहीत, त्याचा परिणाम सध्या सुरू ऊस तोडी हंगामावर होत आहे. या घटनांची वनविभाग गंभीर दखल घेत नसल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वन विभागाने परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे

टॅग्स :Nashikनाशिक