शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा ठिय्या

By admin | Updated: January 13, 2016 22:47 IST

विंचूर-प्रकाशा राज्यमार्ग साडेतीन तास ठप्प : हरणबारी डाव्या कालव्याचे काम त्वरित मार्गी लावण्याची मागणी

 सटाणा : अनेक वर्षांपासून प्रलंबित हरणबारी डाव्या कालव्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी लाभक्षेत्रातील असंख्य महिला, पुरु ष शेतकऱ्यांनी आज दुसऱ्यांदा मांगीतुंगी फाट्यावर साडेतीन तास ठिय्या दिला. यामुळे विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.जिल्हाधिकारी, खासदार, आमदार आल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. मात्र सर्वांनीच या आंदोलनाकडे पाठ फिरविल्याने आंदोलकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलीस यंत्रणेने बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला असता, आंदोलनकर्त्यांनी नमते घेत नाशिक येथे जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देत आंदोलन मागे घेण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. त्यानंतर रोखून धरलेल्या राज्यमार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.मांगीतुंगी येथील सोहळ्यासाठी पंतप्रधान येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आता या भागातील शेतकऱ्यांनी साखळी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून बुधवारी स. १० वाजेपासून विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावरील मांगीतुंगी फाट्यावर शेकडोच्या संख्येने शेतकऱ्यांनी ठिय्या दिला. मात्र, साडेतीन तास उलटूनही एकही अधिकारी आंदोलनकर्त्यांना सामोरे गेला नाही. आंदोलनात शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुभाष नंदन, प्रदीप कांकरिया, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया, प्रवीण पवार, भाऊसाहेब अहिरे, जगदीश पवार, आबा बच्छाव, पंकज भामरे, नितीन भामरे, केवळ भामरे, सुनंदा पवार, यांच्यासह लाभक्षेत्रातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.(वार्ताहर)