शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यावर दाटले ढग; शहरात हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:38 IST

नाशिक : आठ-दहा दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असली तरी जिल्ह्यात अपेक्षित पाऊस होऊ शकलेला नाही. घाटमाथ्यावरील इगतपुरी वगळता जिल्ह्याला अद्यापही पावसाने हुलकावणी दिलेली आहे.

ठळक मुद्देइगतपुरीत धोधो : पेठ, त्र्यंबकेश्वरला पावसाच्या सरी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आठ-दहा दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असली तरी जिल्ह्यात अपेक्षित पाऊस होऊ शकलेला नाही. घाटमाथ्यावरील इगतपुरी वगळता जिल्ह्याला अद्यापही पावसाने हुलकावणी दिलेली आहे.आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने धरणांमधून विसर्ग करावा लागल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहिले. जिल्ह्यातील धरणे तृप्त झाल्यामुळे पाण्याचादेखील प्रश्न मिटला. त्यानंतर श्रावणातील पाऊस वगळता पावसाचा पाठशिवणीचा खेळ सुरूच आहे. मुंबईतील पावसानंतर नाशिकमधील घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस मात्र सुरूच आहे. इगतपुरीत बुधवारी ५४ मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसाचा तालुका असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये १२ तर पेठमध्ये १४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. बुधवारी जिल्ह्यातील पावसाची टक्केवारी केवळ ७.५ टक्के नोंद झाली आहे.सर्वाधिक पाऊस हा इगतपुरीमध्ये नोंदविण्यात आला. पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरीत पावसाचा जोर कायम आहे. यंदा पेठवर पावसाची कृपादृष्टी चांगलीच बरसली आहे. त्र्यंबकेश्वरमध्येही चांगला पाऊस झाला. या महिन्यात म्हणजेच १ सप्टेबरपासून ११ तारखेपर्यंत इगतपुरीत ४९४ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. तर पेठमध्ये २८५ मि.मी. पावसाची नोंद झाली. दहा दिवसांत त्र्यंबकेश्वरमध्ये १९९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गंगापूर धरण समूहात होणाऱ्या पावसामुळे धरणांचा पाणीसाठा वाढत आहे. बुधवारी (दि.११) गंगापूर व आळंदी धरणात १००, तर कश्यपीमध्ये ९९ आणि गौतमी गोदावरीत ९८ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे धरणातून गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने विसर्ग सुरू आहे.जल्ह्यातील प्रकल्पांमधील पाण्यासाठी ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. जिल्ह्यात मध्यम आणि मोठ्या धरण प्रकल्पांमध्ये सध्या ९४ टक्के इतका पाणीसाठा आहे. मागीलवर्षी जिल्ह्यातील पाणीसाठ्याची टक्केवारी अवघी ८० टक्के इतकी होती. त्यामुळे पाणी नियोजन आणि पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागली होती. यंदा मात्र समाधानकारक पाऊस आहे. पावसाची टक्केवारीनाशिक ३.२, इगतपुरी ५४.०, दिंडोरी ४.०, पेठ १४.०, त्र्यंबकेश्वर १२.०, मालेगाव शून्य, नांदगाव शून्य, चांदवड २.०, कळवण २.०, सुरगाणा १०.१, देवळा शून्य, निफाड ६.०, सिन्नर ४.०, येवला शून्य याप्रमाणे पावसाची टक्केवारी राहिली.