शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

जिल्ह्यावर दाटले ढग; शहरात हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:38 IST

नाशिक : आठ-दहा दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असली तरी जिल्ह्यात अपेक्षित पाऊस होऊ शकलेला नाही. घाटमाथ्यावरील इगतपुरी वगळता जिल्ह्याला अद्यापही पावसाने हुलकावणी दिलेली आहे.

ठळक मुद्देइगतपुरीत धोधो : पेठ, त्र्यंबकेश्वरला पावसाच्या सरी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आठ-दहा दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असली तरी जिल्ह्यात अपेक्षित पाऊस होऊ शकलेला नाही. घाटमाथ्यावरील इगतपुरी वगळता जिल्ह्याला अद्यापही पावसाने हुलकावणी दिलेली आहे.आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने धरणांमधून विसर्ग करावा लागल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहिले. जिल्ह्यातील धरणे तृप्त झाल्यामुळे पाण्याचादेखील प्रश्न मिटला. त्यानंतर श्रावणातील पाऊस वगळता पावसाचा पाठशिवणीचा खेळ सुरूच आहे. मुंबईतील पावसानंतर नाशिकमधील घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस मात्र सुरूच आहे. इगतपुरीत बुधवारी ५४ मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसाचा तालुका असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये १२ तर पेठमध्ये १४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. बुधवारी जिल्ह्यातील पावसाची टक्केवारी केवळ ७.५ टक्के नोंद झाली आहे.सर्वाधिक पाऊस हा इगतपुरीमध्ये नोंदविण्यात आला. पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरीत पावसाचा जोर कायम आहे. यंदा पेठवर पावसाची कृपादृष्टी चांगलीच बरसली आहे. त्र्यंबकेश्वरमध्येही चांगला पाऊस झाला. या महिन्यात म्हणजेच १ सप्टेबरपासून ११ तारखेपर्यंत इगतपुरीत ४९४ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. तर पेठमध्ये २८५ मि.मी. पावसाची नोंद झाली. दहा दिवसांत त्र्यंबकेश्वरमध्ये १९९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गंगापूर धरण समूहात होणाऱ्या पावसामुळे धरणांचा पाणीसाठा वाढत आहे. बुधवारी (दि.११) गंगापूर व आळंदी धरणात १००, तर कश्यपीमध्ये ९९ आणि गौतमी गोदावरीत ९८ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे धरणातून गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने विसर्ग सुरू आहे.जल्ह्यातील प्रकल्पांमधील पाण्यासाठी ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. जिल्ह्यात मध्यम आणि मोठ्या धरण प्रकल्पांमध्ये सध्या ९४ टक्के इतका पाणीसाठा आहे. मागीलवर्षी जिल्ह्यातील पाणीसाठ्याची टक्केवारी अवघी ८० टक्के इतकी होती. त्यामुळे पाणी नियोजन आणि पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागली होती. यंदा मात्र समाधानकारक पाऊस आहे. पावसाची टक्केवारीनाशिक ३.२, इगतपुरी ५४.०, दिंडोरी ४.०, पेठ १४.०, त्र्यंबकेश्वर १२.०, मालेगाव शून्य, नांदगाव शून्य, चांदवड २.०, कळवण २.०, सुरगाणा १०.१, देवळा शून्य, निफाड ६.०, सिन्नर ४.०, येवला शून्य याप्रमाणे पावसाची टक्केवारी राहिली.