शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

जिल्ह्यावर दाटले ढग; शहरात हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:38 IST

नाशिक : आठ-दहा दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असली तरी जिल्ह्यात अपेक्षित पाऊस होऊ शकलेला नाही. घाटमाथ्यावरील इगतपुरी वगळता जिल्ह्याला अद्यापही पावसाने हुलकावणी दिलेली आहे.

ठळक मुद्देइगतपुरीत धोधो : पेठ, त्र्यंबकेश्वरला पावसाच्या सरी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आठ-दहा दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असली तरी जिल्ह्यात अपेक्षित पाऊस होऊ शकलेला नाही. घाटमाथ्यावरील इगतपुरी वगळता जिल्ह्याला अद्यापही पावसाने हुलकावणी दिलेली आहे.आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने धरणांमधून विसर्ग करावा लागल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहिले. जिल्ह्यातील धरणे तृप्त झाल्यामुळे पाण्याचादेखील प्रश्न मिटला. त्यानंतर श्रावणातील पाऊस वगळता पावसाचा पाठशिवणीचा खेळ सुरूच आहे. मुंबईतील पावसानंतर नाशिकमधील घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस मात्र सुरूच आहे. इगतपुरीत बुधवारी ५४ मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसाचा तालुका असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये १२ तर पेठमध्ये १४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. बुधवारी जिल्ह्यातील पावसाची टक्केवारी केवळ ७.५ टक्के नोंद झाली आहे.सर्वाधिक पाऊस हा इगतपुरीमध्ये नोंदविण्यात आला. पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरीत पावसाचा जोर कायम आहे. यंदा पेठवर पावसाची कृपादृष्टी चांगलीच बरसली आहे. त्र्यंबकेश्वरमध्येही चांगला पाऊस झाला. या महिन्यात म्हणजेच १ सप्टेबरपासून ११ तारखेपर्यंत इगतपुरीत ४९४ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. तर पेठमध्ये २८५ मि.मी. पावसाची नोंद झाली. दहा दिवसांत त्र्यंबकेश्वरमध्ये १९९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गंगापूर धरण समूहात होणाऱ्या पावसामुळे धरणांचा पाणीसाठा वाढत आहे. बुधवारी (दि.११) गंगापूर व आळंदी धरणात १००, तर कश्यपीमध्ये ९९ आणि गौतमी गोदावरीत ९८ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे धरणातून गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने विसर्ग सुरू आहे.जल्ह्यातील प्रकल्पांमधील पाण्यासाठी ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. जिल्ह्यात मध्यम आणि मोठ्या धरण प्रकल्पांमध्ये सध्या ९४ टक्के इतका पाणीसाठा आहे. मागीलवर्षी जिल्ह्यातील पाणीसाठ्याची टक्केवारी अवघी ८० टक्के इतकी होती. त्यामुळे पाणी नियोजन आणि पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागली होती. यंदा मात्र समाधानकारक पाऊस आहे. पावसाची टक्केवारीनाशिक ३.२, इगतपुरी ५४.०, दिंडोरी ४.०, पेठ १४.०, त्र्यंबकेश्वर १२.०, मालेगाव शून्य, नांदगाव शून्य, चांदवड २.०, कळवण २.०, सुरगाणा १०.१, देवळा शून्य, निफाड ६.०, सिन्नर ४.०, येवला शून्य याप्रमाणे पावसाची टक्केवारी राहिली.