शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

तूर्तास पाणीकपात नाही

By admin | Updated: September 11, 2015 00:55 IST

पालकमंत्र्यांचे सूतोवाच : नाशिककरांना दिलासा

नाशिक : जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर असून, धरणांच्या पाणीसाठ्यातही आवश्यक पाणी नाही. मात्र तूर्तास नाशिक शहरासाठी पाणी कपातीचे कोणतेही नियोजन नाही. परिस्थिती पाहून याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.दुष्काळी परिस्थिती व टंचाईच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीनंतर महाजन बोलत होते. जिल्ह्यातील धरणात ४२ टक्के पाणी साठा आहे. गेल्यावर्षी ८२ टक्केइतका साठा होता. त्यामुळे आता शेतीसाठी पाण्याचे आवर्तन देणे मुश्किल आहे. अजून दहा महिने काढायची आहेत. जिल्ह्णात जनावरांना पाणी व चारा नियोजन करण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आलेले आहेत. सर्व खातेप्रमुखांना मुख्यालयी थांबण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. बागा वाचवायच्या की माणसे हा विचार आधी करणे महत्त्वाचे आहे. पाऊस येण्याची शक्यता आहे. पाऊस आलाच आणि धरणात पाणीसाठा आवश्यक झाला, तर शेतीच्या पाण्यासाठी आवर्तन सोडले जाईल. नाशिककरांचीच पाण्याची मुबलक प्रमाणात सोय नाही. तेव्हा मराठवाड्याला पाणी सोडण्याचा विषयच येत नाही. माणुसकीच्या दृष्टिकोनातून मराठवाड्याला पाणी सोडणे आवश्यक असले तरी जिल्ह्यातील धरणात पाणीसाठा नसल्याने पाणी सोडणार तरी कोठून, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही केली जाईल, न्यायालयाने आदेश दिले तर पाणी सोडले जाईल. (प्रतिनिधी)