शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

टँकर सुरू होत नसल्याने संताप

By admin | Updated: March 7, 2017 00:30 IST

सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागातील फुुलेनगर (माळवाडी) येथे गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाई जाणवत असून, मागणी करूनही टॅँकर सुरू होत नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

 सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागातील फुुलेनगर (माळवाडी) येथे गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाई जाणवत असून, मागणी करूनही टॅँकर सुरू होत नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. टँकर सुरू करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.जानेवारी महिन्यापासूनच फुलेनगर येथे पाणीटंचाई जाणवू लागली होती. जानेवारी महिन्यात ग्रामपंचायतीने ठराव करून पंचायत समितीकडे पिण्याच्या पाण्याच्या टॅँकरची मागणी सुरू करण्याची मागणी केली होती. फेबु्रवारी महिन्यात ग्रामपंचायतीने पुन्हा ठराव करून फुलेनगर (माळवाडी)चा समावेश वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेत करण्याची मागणी केली होती. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना न झाल्याने सरपंच आशा लोंढे, उपसरपंच रवि पठाडे, ग्रामपंचायत सदस्य किरण अत्रे, रंजना ढमाले, नूतन गलांडे यांच्यासह पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार, माजी सरपंच संपत पठाडे, पोपट लोंढे, दत्तात्रय आनप, संभाजी ढमाले, सयाजी लोंढे यांच्यासह ग्रामस्थांनी नायब तहसीलदार दत्ता वायचळे यांनी भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन दिले. (वार्ताहर)