शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

टँकर सुरू होत नसल्याने संताप

By admin | Updated: March 7, 2017 00:30 IST

सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागातील फुुलेनगर (माळवाडी) येथे गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाई जाणवत असून, मागणी करूनही टॅँकर सुरू होत नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

 सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागातील फुुलेनगर (माळवाडी) येथे गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाई जाणवत असून, मागणी करूनही टॅँकर सुरू होत नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. टँकर सुरू करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.जानेवारी महिन्यापासूनच फुलेनगर येथे पाणीटंचाई जाणवू लागली होती. जानेवारी महिन्यात ग्रामपंचायतीने ठराव करून पंचायत समितीकडे पिण्याच्या पाण्याच्या टॅँकरची मागणी सुरू करण्याची मागणी केली होती. फेबु्रवारी महिन्यात ग्रामपंचायतीने पुन्हा ठराव करून फुलेनगर (माळवाडी)चा समावेश वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेत करण्याची मागणी केली होती. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना न झाल्याने सरपंच आशा लोंढे, उपसरपंच रवि पठाडे, ग्रामपंचायत सदस्य किरण अत्रे, रंजना ढमाले, नूतन गलांडे यांच्यासह पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार, माजी सरपंच संपत पठाडे, पोपट लोंढे, दत्तात्रय आनप, संभाजी ढमाले, सयाजी लोंढे यांच्यासह ग्रामस्थांनी नायब तहसीलदार दत्ता वायचळे यांनी भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन दिले. (वार्ताहर)