शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

राज्य आणि केंद्रातही मंत्रिपद हवे

By admin | Updated: November 24, 2015 23:07 IST

रामदास आठवले : आमीर खान देश सोडून गेलेच तर परत आणू

नाशिक : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत असून, त्यात ठरल्याप्रमाणे आरपीआयला स्थान दिलेच गेले पाहिजे. आपल्याला राज्यात परतण्याची इच्छा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शब्द दिल्याप्रमाणे आपल्याला केंद्रात मंत्री करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोेलताना केली.नाशिक दौऱ्यावर आल्यावर शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २६ व २७ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त संसदेचे दोनदिवसीय विशेष हिवाळी अधिवेशन बोलविण्यात आले असून, त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेविषयी आणि संविधानावर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यघटनेचे महत्त्व कळाल्यामुळेच त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा दिली. लंडनचे घर विकत घेतले. ते भाजपा व संघाचे नसून देशाचे पंतप्रधान आहेत, म्हणून ते त्यांच्या पक्षाचा रंग तिरंगा सांगत असल्याचे यावेळी खासदार रामदास आठवले यांनी सांगितले. मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून, भाजपाचा सर्वात मोठा मित्रपक्ष म्हणून आरपीआय असून मंत्रिमंडळात आरपीआयला जागा मिळाली पाहिजे. आपल्या पत्नीला आपण मंत्री करणार असल्याच्या चर्चा सुरू असून, त्या निरर्थक आहेत. मंत्रिमंडळात आपण पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाच संधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याकडे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांची यादीच तयार असून, त्यातून आपण प्रत्येकाला संधी देणार आहोत. कोणाला मंत्रिपद, तर कोणाला महामंडळावर संधी देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आरपीआयचे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी लवकरच आपण जिल्हानिहाय दौरे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष नगरसेवक प्रकाश लोंढे, पवन क्षीरसागर, सुनील वाघ, दीपक डोके आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)