शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

स्वच्छतेच्या सादरीकरणासाठी गावे सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:25 IST

जळगाव नेऊर : भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत ग्रामीण भागात देशातील सर्वात मोठे स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यात येत आहे. सर्व जिल्ह्यांच्या स्वच्छतेबाबत गुणांकन ठरविण्यासाठी गुणात्मक आणि संख्यात्मक मानांकाच्या आधारे देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्र म सुरू झाला असून, या सर्वेक्षणात सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेबाबतच्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या जिल्ह्यांना राष्ट्रीय स्तरावरून २ आॅक्टोबर रोजी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देगावा गावात स्वच्छता मोहीम सुरू

जळगाव नेऊर : भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत ग्रामीण भागात देशातील सर्वात मोठे स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यात येत आहे. सर्व जिल्ह्यांच्या स्वच्छतेबाबत गुणांकन ठरविण्यासाठी गुणात्मक आणि संख्यात्मक मानांकाच्या आधारे देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्र म सुरू झाला असून, या सर्वेक्षणात सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेबाबतच्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या जिल्ह्यांना राष्ट्रीय स्तरावरून २ आॅक्टोबर रोजी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.आपण केलेल्या स्वच्छतेच्या कामाचे सादरीकरण करण्यासाठी गावे सरसावली असून, प्रभातफेरी, गाव स्वच्छता, प्लॅस्टिकमुक्त अभियानाने सुरुवात झाली असून, नागरिकांनी आपल्या गावाला व जिल्ह्याला सन्मान देण्यासाठी या स्वच्छता मोहिमेतसक्रि य सहभाग नोंदविण्यासाठी गावा गावात स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे.गावोगावी सार्वजनिक ठिकाणांवरील स्वच्छता, प्रभावी व्यक्तींची मते व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रि या घेतल्या जाणार आहेत. या सर्वेक्षणासाठी एसएसजी १८ हे मोबाइल अ‍ॅप केंद्र शासनाकडून गूगल प्ले स्टोअरवरती उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील जास्तीत जास्त लोकांनी ते डाउनलोड करून प्रतिक्रि या नोंदविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचे आवाहन केले जात आहे. येवला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती यात आपला सहभाग वाढविण्यासाठी कार्यरत असल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात दिसून येत आहे.स्वछ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ च्या दृष्टीने प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असून जिल्ह्याचा सन्मान वाढविण्यासाठी योगदान देण्याची हीच योग्य वेळ आहे. यात गावातील प्रभावशाली व्यक्ती व ग्रामस्थ यांच्या प्रतिक्रि या व आॅनलाइन अभिप्राय फार महत्त्वाचा आहे. सर्वांनी यात आपला सहभाग नोंदवावा. - बाळासाहेब बोराडे, ग्रामसेवक, जळगाव नेऊर

टॅग्स :Nashikनाशिक