शहरं
Join us  
Trending Stories
1
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
2
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
3
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
4
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
5
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
6
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
7
ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
8
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
9
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
10
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
11
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
12
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
13
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
14
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
15
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
16
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
17
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
18
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
19
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
20
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!

ट्रॅव्हल्सवर दोन चालक असावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:32 IST

नाशिक : रात्री दहा ते सकाळी सहा या कालावधीत सर्वाधिक रस्ते अपघात होत असून, याचे प्रमुख कारण चालकास लागणारी डुलकी असल्याचे समोर आले आहे़ मात्र, खासगी बसवरील चालक रात्रं-दिवस वाहन चालवितात़ रात्रीचे अपघात कमी करण्यासाठी एसटीप्रमाणेच खासगी बसेसवरही दोन चालक ठेवणे बंधनकारक करावेत, असा प्रस्ताव नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी ६ जुलै २०१८ रोजी शासनाकडे पाठविला आहे़ यामुळे रोजगारनिर्मिती व प्रवासी सुरक्षितता असे हेतू साध्य होण्यास मदत होणार आहे़

ठळक मुद्देशासनाकडे प्रस्ताव सादर : प्रवासी सुरक्षिततेसाठी उपाययोजना

विजय मोरे ।नाशिक : रात्री दहा ते सकाळी सहा या कालावधीत सर्वाधिक रस्ते अपघात होत असून, याचे प्रमुख कारण चालकास लागणारी डुलकी असल्याचे समोर आले आहे़ मात्र, खासगी बसवरील चालक रात्रं-दिवस वाहन चालवितात़ रात्रीचे अपघात कमी करण्यासाठी एसटीप्रमाणेच खासगी बसेसवरही दोन चालक ठेवणे बंधनकारक करावेत, असा प्रस्ताव नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी ६ जुलै २०१८ रोजी शासनाकडे पाठविला आहे़ यामुळे रोजगारनिर्मिती व प्रवासी सुरक्षितता असे हेतू साध्य होण्यास मदत होणार आहे़गत महिन्यात ७ जून रोजी मुंबई-आग्रा महामार्गावर अपघातात दहा ठार तर १३ जण जखमी झाले होते़ विशेष म्हणजे या बसवर एकच चालक होता. त्यास पहाटे डुलकी लागल्याने नादुरुस्त ट्रकवर जाऊन त्याचे वाहन आदळल्याचे तपासणीत समोर आले़राज्य परिवहन महामंडळातील चालक हे सहा तासांहून अधिक वाहन चालवित नाही.  तसेच ठराविक अंतरानंतर चालक बदलला जात असल्याने अपघातांची संख्या कमी आहे़ त्या तुलनेत खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अपघात व जीवितहानी अधिक आहे़ त्यामुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी कळसकर यांनी आपल्या अधिकाºयांद्वारे बसेसवरील चालकांबाबत सर्वेक्षण केल्यानंतर रात्रीच्या वेळी एकच चालक असल्याचे तसेच अंतर कापण्यासाठी सर्रास वेगमर्यादेचे उल्लंघन व त्यातून अपघात असे चक्र समोर आले़राष्ट्रीय व राज्य परवाना असलेल्या वाहनांवर दोन चालक असावेत, असा नियम आहे़ त्याप्रमाणेच रात्रीच्या वेळी खासगी प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांवर दोन चालक असावेत, असा नियम केल्यास अपघातांना बºयापैकी आळा बसण्यास मदत होईल़ अर्थात, यासाठी मोटार परिवहन कायद्यात बदल वा अध्यादेश काढावा लागेल़ दोन चालक असल्याशिवाय वाहनांची तपासणी केली जाणार नाही, असा दंडक कायद्यानुसार केल्यास नक्कीच बदल होईल़प्रस्तावापूर्वी सर्वेक्षणशासनाकडे प्रस्ताव पाठविण्यापूर्वी प्रादेशिक परिवहन अधिकारी कळसकर यांनी आरटीओ अधिकाºयांच्या पथकास विभागातील खासगी प्रवासी वाहतूक करणाºया बसेसवरील चालकांबाबत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार आरटीओच्या पथकाने सुमारे महिनाभर वाहनांवरील चालकांची तपासणी करून त्याचा अहवाल तयार केला़ त्यानुसार रात्रीच्या वेळी प्रवास करणाºया खासगी बसेसवर एकच चालक असल्याचे समोर आले़सुरक्षिततेबरोबरच रोजगाराचीही निर्मितीएसटीप्रमाणेच खासगी ट्रॅव्हल्सवरही दोन चालक असल्यास एकास झोप येत असल्यास दुसरा चालक वाहन चालवेल़ यामुळे अपघात कमी होण्यास तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेत वाढ होईल़ याबरोबरच दोन चालक ठेवावे लागणार असल्याने आपोआपच रोजगाराचीही निर्मिती होईल़ थोडक्यात, वाहनमालकास दुसºया चालकासाठी दरमहा पंधरा हजार रुपयांचा खर्च करावे लागतील असे गृहीत धरल्यास प्रतिदिन ५०० रुपये खर्च येईल़ हाच खर्च पन्नास प्रवाशांमध्ये विभागला तर प्रतिप्रवासी अवघा दहा रुपये येतो़किमान २४ तासांमध्ये सहा तास झोप अनिवार्य आहे, मात्र वाहनांवरील चालक हे सतत दोन - तीन दिवस वाहन चालवित असतात़ रात्रीच्या व पहाटेच्या वेळी चालकाची अपूर्ण झोप झाल्यामुळे त्याास डुलकी येणे स्वाभाविक आहे़ यामुळे अपघात घडतात व जीवितहानी होते़ हे टाळण्यासाठी नाशिक विभागातील वाहनांवरील चालकांबाबत सर्वेक्षण केल्यानंतर एसटी, नॅशनल तसेच स्टेट परमिट असलेल्या वाहनांप्रमाणे खासगी प्रवासी वाहतूक करणाºया बसमध्ये दोन चालक असल्यास अपघातात नक्कीच आळा बसेल़ त्यानुसार शासनाकडे हा प्रस्ताव पाठविला आहे़- भरत कळसकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक