शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्सवर दोन चालक असावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:32 IST

नाशिक : रात्री दहा ते सकाळी सहा या कालावधीत सर्वाधिक रस्ते अपघात होत असून, याचे प्रमुख कारण चालकास लागणारी डुलकी असल्याचे समोर आले आहे़ मात्र, खासगी बसवरील चालक रात्रं-दिवस वाहन चालवितात़ रात्रीचे अपघात कमी करण्यासाठी एसटीप्रमाणेच खासगी बसेसवरही दोन चालक ठेवणे बंधनकारक करावेत, असा प्रस्ताव नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी ६ जुलै २०१८ रोजी शासनाकडे पाठविला आहे़ यामुळे रोजगारनिर्मिती व प्रवासी सुरक्षितता असे हेतू साध्य होण्यास मदत होणार आहे़

ठळक मुद्देशासनाकडे प्रस्ताव सादर : प्रवासी सुरक्षिततेसाठी उपाययोजना

विजय मोरे ।नाशिक : रात्री दहा ते सकाळी सहा या कालावधीत सर्वाधिक रस्ते अपघात होत असून, याचे प्रमुख कारण चालकास लागणारी डुलकी असल्याचे समोर आले आहे़ मात्र, खासगी बसवरील चालक रात्रं-दिवस वाहन चालवितात़ रात्रीचे अपघात कमी करण्यासाठी एसटीप्रमाणेच खासगी बसेसवरही दोन चालक ठेवणे बंधनकारक करावेत, असा प्रस्ताव नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी ६ जुलै २०१८ रोजी शासनाकडे पाठविला आहे़ यामुळे रोजगारनिर्मिती व प्रवासी सुरक्षितता असे हेतू साध्य होण्यास मदत होणार आहे़गत महिन्यात ७ जून रोजी मुंबई-आग्रा महामार्गावर अपघातात दहा ठार तर १३ जण जखमी झाले होते़ विशेष म्हणजे या बसवर एकच चालक होता. त्यास पहाटे डुलकी लागल्याने नादुरुस्त ट्रकवर जाऊन त्याचे वाहन आदळल्याचे तपासणीत समोर आले़राज्य परिवहन महामंडळातील चालक हे सहा तासांहून अधिक वाहन चालवित नाही.  तसेच ठराविक अंतरानंतर चालक बदलला जात असल्याने अपघातांची संख्या कमी आहे़ त्या तुलनेत खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अपघात व जीवितहानी अधिक आहे़ त्यामुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी कळसकर यांनी आपल्या अधिकाºयांद्वारे बसेसवरील चालकांबाबत सर्वेक्षण केल्यानंतर रात्रीच्या वेळी एकच चालक असल्याचे तसेच अंतर कापण्यासाठी सर्रास वेगमर्यादेचे उल्लंघन व त्यातून अपघात असे चक्र समोर आले़राष्ट्रीय व राज्य परवाना असलेल्या वाहनांवर दोन चालक असावेत, असा नियम आहे़ त्याप्रमाणेच रात्रीच्या वेळी खासगी प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांवर दोन चालक असावेत, असा नियम केल्यास अपघातांना बºयापैकी आळा बसण्यास मदत होईल़ अर्थात, यासाठी मोटार परिवहन कायद्यात बदल वा अध्यादेश काढावा लागेल़ दोन चालक असल्याशिवाय वाहनांची तपासणी केली जाणार नाही, असा दंडक कायद्यानुसार केल्यास नक्कीच बदल होईल़प्रस्तावापूर्वी सर्वेक्षणशासनाकडे प्रस्ताव पाठविण्यापूर्वी प्रादेशिक परिवहन अधिकारी कळसकर यांनी आरटीओ अधिकाºयांच्या पथकास विभागातील खासगी प्रवासी वाहतूक करणाºया बसेसवरील चालकांबाबत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार आरटीओच्या पथकाने सुमारे महिनाभर वाहनांवरील चालकांची तपासणी करून त्याचा अहवाल तयार केला़ त्यानुसार रात्रीच्या वेळी प्रवास करणाºया खासगी बसेसवर एकच चालक असल्याचे समोर आले़सुरक्षिततेबरोबरच रोजगाराचीही निर्मितीएसटीप्रमाणेच खासगी ट्रॅव्हल्सवरही दोन चालक असल्यास एकास झोप येत असल्यास दुसरा चालक वाहन चालवेल़ यामुळे अपघात कमी होण्यास तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेत वाढ होईल़ याबरोबरच दोन चालक ठेवावे लागणार असल्याने आपोआपच रोजगाराचीही निर्मिती होईल़ थोडक्यात, वाहनमालकास दुसºया चालकासाठी दरमहा पंधरा हजार रुपयांचा खर्च करावे लागतील असे गृहीत धरल्यास प्रतिदिन ५०० रुपये खर्च येईल़ हाच खर्च पन्नास प्रवाशांमध्ये विभागला तर प्रतिप्रवासी अवघा दहा रुपये येतो़किमान २४ तासांमध्ये सहा तास झोप अनिवार्य आहे, मात्र वाहनांवरील चालक हे सतत दोन - तीन दिवस वाहन चालवित असतात़ रात्रीच्या व पहाटेच्या वेळी चालकाची अपूर्ण झोप झाल्यामुळे त्याास डुलकी येणे स्वाभाविक आहे़ यामुळे अपघात घडतात व जीवितहानी होते़ हे टाळण्यासाठी नाशिक विभागातील वाहनांवरील चालकांबाबत सर्वेक्षण केल्यानंतर एसटी, नॅशनल तसेच स्टेट परमिट असलेल्या वाहनांप्रमाणे खासगी प्रवासी वाहतूक करणाºया बसमध्ये दोन चालक असल्यास अपघातात नक्कीच आळा बसेल़ त्यानुसार शासनाकडे हा प्रस्ताव पाठविला आहे़- भरत कळसकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक