शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

संवादाअभावी मुले होताहेत बेदरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:29 IST

चामरलेणीवर अडकलेली सिडकोतील चार शाळकरी मुले व त्यांच्या सुटकेसाठी यंत्रणेने केलेले शर्थीचे प्रयत्न या प्रकरणामुळे मुलांचा अतिधाडसीपणा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शाळेतली जीवघेणी स्पर्धा, विभक्त कुटुंबामुळे घरातील संस्काराचा अभाव, भावनिकतेचे कमी होत चाललेले महत्त्व, पालकांकडून मिळणारे अवाजवी स्वातंत्र्य, सोशल मीडियाद्वारे मिळणारे अर्धवट ज्ञान यामुळे हल्लीची किशोरवयीन मुले अतिधाडसी, उद्धट होत चालली आहे.

नाशिक : चामरलेणीवर अडकलेली सिडकोतील चार शाळकरी मुले व त्यांच्या सुटकेसाठी यंत्रणेने केलेले शर्थीचे प्रयत्न या प्रकरणामुळे मुलांचा अतिधाडसीपणा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  शाळेतली जीवघेणी स्पर्धा, विभक्त कुटुंबामुळे घरातील संस्काराचा अभाव, भावनिकतेचे कमी होत चाललेले महत्त्व, पालकांकडून मिळणारे अवाजवी स्वातंत्र्य, सोशल मीडियाद्वारे मिळणारे अर्धवट ज्ञान यामुळे हल्लीची किशोरवयीन मुले अतिधाडसी, उद्धट होत चालली आहे. शिक्षक, पालक, नातेवाईक यांनी मुलांचा विश्वास संपादन करून त्यांच्यात आदरयुक्त धाक निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे.  वेळीच हा धोका ओळखून पालक-शिक्षकांनी पावले उचलली नाही तर मुलांचा धाडसीपणा वाढत जाऊन पुढची पिढी बेजबाबदार व दुराग्रही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पिढीला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून परावृत्त करण्याची जबाबदारी मोठ्यांची असून, ती त्यांना पार पाडावीच लागेल, असे मत मानसोपचारतज्ज्ञ, बालरोगत्ज्ज्ज्ञ, अभ्यासक यांनी व्यक्त केले आहे. मुले ऐकत नाहीत, उलट उत्तरे देतात. त्यामुळे पालक म्हणून हल्ली रोज पोटात भीतीचा गोळा उठतो. महागाई पाहता नोकरी करण्यावाचून पर्याय नाही. मुले म्हातारपणाची काठी होतील ही अपेक्षा तर केव्हाच सोडून दिली आहे. पण मोठेपणी ते आदर्श नागरिक होतील का, समाजात स्वत:चे चांगले स्थान निर्माण करतील का, दोन पैसे कमवून किमान स्वत:चे पोट भरू शकतील का याचीही शाश्वती वाटत नाही.  - मंगला किणीकर, पालक, कॉलेजरोड पालकांचा धाक न वाटणे, उद्धटपणा वाढणे याला असंख्य गोष्टी कारणीभूत आहेत. गुणांच्या जीवघेण्या स्पर्धेमुळे मुले सैरभैर झाली आहेत. त्यामुळे समजत असूनही ते चुकीच्या गोष्टी करत आहेत. पालक कधी खूप मोकळीक देतात, तर कधी अतिधाक दाखवतात. विभक्त कुटुंबामुळे मुले एकटी पडतात. मुलांमध्ये भावनिक बांधिलकी उरलेली नाही. कुटुंब, पालक, मित्र यांच्याशी कोरडी, कामचलाऊ मैत्री करण्यावर ते भर देत आहेत.  - शामा कुलकर्णी, बालरोगतज्ज्ञ सोशल मीडिया, मोबाइल, पैशांची समृद्धी या साºयामुळे हल्लीची किशोरवयीन पिढी उद्धट होत चालली आहे. याला मुले जितकी कारणीभूत आहेत, तितकेच पालकही कारणीभूत आहेत. एकीकडे मुले अभ्यासात मागे पडताच शिक्षकांवर दबाव आणला जातो, तर दुसरीकडे शाळेने थोडी जरी कडक भूमिका घेतली तरी लगेच शाळा गाठत जाब विचारला जात आहे.  - रमादेवी रेड्डी, प्राचार्य, स्कॅटिश अकॅडमी

टॅग्स :docterडॉक्टरNashikनाशिक