शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

संवादाअभावी मुले होताहेत बेदरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:29 IST

चामरलेणीवर अडकलेली सिडकोतील चार शाळकरी मुले व त्यांच्या सुटकेसाठी यंत्रणेने केलेले शर्थीचे प्रयत्न या प्रकरणामुळे मुलांचा अतिधाडसीपणा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शाळेतली जीवघेणी स्पर्धा, विभक्त कुटुंबामुळे घरातील संस्काराचा अभाव, भावनिकतेचे कमी होत चाललेले महत्त्व, पालकांकडून मिळणारे अवाजवी स्वातंत्र्य, सोशल मीडियाद्वारे मिळणारे अर्धवट ज्ञान यामुळे हल्लीची किशोरवयीन मुले अतिधाडसी, उद्धट होत चालली आहे.

नाशिक : चामरलेणीवर अडकलेली सिडकोतील चार शाळकरी मुले व त्यांच्या सुटकेसाठी यंत्रणेने केलेले शर्थीचे प्रयत्न या प्रकरणामुळे मुलांचा अतिधाडसीपणा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  शाळेतली जीवघेणी स्पर्धा, विभक्त कुटुंबामुळे घरातील संस्काराचा अभाव, भावनिकतेचे कमी होत चाललेले महत्त्व, पालकांकडून मिळणारे अवाजवी स्वातंत्र्य, सोशल मीडियाद्वारे मिळणारे अर्धवट ज्ञान यामुळे हल्लीची किशोरवयीन मुले अतिधाडसी, उद्धट होत चालली आहे. शिक्षक, पालक, नातेवाईक यांनी मुलांचा विश्वास संपादन करून त्यांच्यात आदरयुक्त धाक निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे.  वेळीच हा धोका ओळखून पालक-शिक्षकांनी पावले उचलली नाही तर मुलांचा धाडसीपणा वाढत जाऊन पुढची पिढी बेजबाबदार व दुराग्रही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पिढीला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून परावृत्त करण्याची जबाबदारी मोठ्यांची असून, ती त्यांना पार पाडावीच लागेल, असे मत मानसोपचारतज्ज्ञ, बालरोगत्ज्ज्ज्ञ, अभ्यासक यांनी व्यक्त केले आहे. मुले ऐकत नाहीत, उलट उत्तरे देतात. त्यामुळे पालक म्हणून हल्ली रोज पोटात भीतीचा गोळा उठतो. महागाई पाहता नोकरी करण्यावाचून पर्याय नाही. मुले म्हातारपणाची काठी होतील ही अपेक्षा तर केव्हाच सोडून दिली आहे. पण मोठेपणी ते आदर्श नागरिक होतील का, समाजात स्वत:चे चांगले स्थान निर्माण करतील का, दोन पैसे कमवून किमान स्वत:चे पोट भरू शकतील का याचीही शाश्वती वाटत नाही.  - मंगला किणीकर, पालक, कॉलेजरोड पालकांचा धाक न वाटणे, उद्धटपणा वाढणे याला असंख्य गोष्टी कारणीभूत आहेत. गुणांच्या जीवघेण्या स्पर्धेमुळे मुले सैरभैर झाली आहेत. त्यामुळे समजत असूनही ते चुकीच्या गोष्टी करत आहेत. पालक कधी खूप मोकळीक देतात, तर कधी अतिधाक दाखवतात. विभक्त कुटुंबामुळे मुले एकटी पडतात. मुलांमध्ये भावनिक बांधिलकी उरलेली नाही. कुटुंब, पालक, मित्र यांच्याशी कोरडी, कामचलाऊ मैत्री करण्यावर ते भर देत आहेत.  - शामा कुलकर्णी, बालरोगतज्ज्ञ सोशल मीडिया, मोबाइल, पैशांची समृद्धी या साºयामुळे हल्लीची किशोरवयीन पिढी उद्धट होत चालली आहे. याला मुले जितकी कारणीभूत आहेत, तितकेच पालकही कारणीभूत आहेत. एकीकडे मुले अभ्यासात मागे पडताच शिक्षकांवर दबाव आणला जातो, तर दुसरीकडे शाळेने थोडी जरी कडक भूमिका घेतली तरी लगेच शाळा गाठत जाब विचारला जात आहे.  - रमादेवी रेड्डी, प्राचार्य, स्कॅटिश अकॅडमी

टॅग्स :docterडॉक्टरNashikनाशिक