शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मग महापौरांवर गुन्हा का नाही? 

By श्याम बागुल | Updated: November 26, 2018 16:15 IST

शहरात महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली जितकी चर्चेची ठरली, तितक्याच प्रमाणात त्यांच्या बदलीनंतर महापौरांच्या रामायण या निवासस्थानाबाहेर फोडलेल्या फटाक्यांची चर्चा होत आहे. मुंडे यांच्या कामकाजाबाबत शासन दरबारी तक्रारी झाल्यानेच शासनाने त्यांची बदली केली त्याबाबत समाधान व्यक्त करणा-या महापौरांनी मात्र

श्याम बागुलनाशिक : घराच्या अंगणात कोणा तिºहाईताने कचरा आणून टाकला तर अंगाचा तिळपापड होऊन संबंधितांच्या वाडवडिलांचा उद्धार केला जातो, त्यातही जर कचरा टाकणाऱ्याची ओळख पटली तर प्रसंगी प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचते. अशी समाजाची मानसिकता असताना शहराच्या प्रथम नागरिकाच्या घरासमोरच अज्ञात व्यक्ती फटाक्यांचा कचरा करून पलायन करीत असेल तर त्याची दखल घेणे अधिकच क्रमप्राप्त ठरते. परंतु प्रथम नागरिकानेच या फटाक्यांच्या कचºयाबद्दल मौन पाळणे व कचरा आपण केलेलाच नाही, असा निर्वाळा देणे म्हणजे एकतर त्यांनी जाणूनबुजून या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केले किंवा फोडलेल्या फटाक्यांच्या कचºयाबाबत त्यांची कोणतीही तक्रार नाही, असे मानावे काय?शहरात महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली जितकी चर्चेची ठरली, तितक्याच प्रमाणात त्यांच्या बदलीनंतर महापौरांच्या रामायण या निवासस्थानाबाहेर फोडलेल्या फटाक्यांची चर्चा होत आहे. मुंडे यांच्या कामकाजाबाबत शासन दरबारी तक्रारी झाल्यानेच शासनाने त्यांची बदली केली त्याबाबत समाधान व्यक्त करणाºया महापौरांनी मात्र घरासमोर फोडलेल्या फटाक्यांबाबत अनभिज्ञता दर्शवित, आपण फटाके न फोडल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्याबाबत जे काही नियम, निकष ठरवून दिले ते डावलून ‘रामायण’च्या बाहेर फटाके फोडण्यात आल्याने त्याला जबाबदार धरून महापौरांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी एका सामाजिक संस्थेने करून तशी तक्रार पोलिसांत दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौरांनी दिलेल्या स्पष्टीकरणाला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे रामायण बंगल्याबाहेर फटाके कोणी फोडले हा विषय जितका महत्त्वाचा आहे, तितकाच तो महापौरांनी फटाक्यासारखी जीविताला घातक वस्तू कोणी अज्ञाताने आपल्या निवासस्थानाबाहेर फोडूनही त्याकडे दुर्लक्ष करणे अधिक गंभीर आहे. मुळात शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या उपस्थितीत एखाद्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पायदळी तुडवून फटाके फोडणे हा जसा कायदेशीर गुन्हा आहे, तसाच त्याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात कुचराई करणे हादेखील कायदेशीर गुन्हाच आहे. घटनेत व कायद्यातही एखादे गैरकृत्य होत असताना त्याकडे जाणूनबुजून वा हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणे गुन्हा मानला गेला असताना या संदर्भात पोलिसांची भूमिकाही निश्चितच संशयास्पद आहे. महापौर यांच्या निवासस्थानाबाहेर फटाके फोडून त्यांच्या जीविताला धोका उत्पन्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परंतु इतक्या गंभीर गुन्ह्यात महापौरांनी मौन पाळणे व निवासस्थानाबाहेर फटाके फुटूनही त्याबाबतची माहिती पोलिसांना न दिल्याने त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई होणे तितकेच गरजेचे आहे. शहराचा प्रथम नागरिक आपल्या स्वत:च्या जीविताच्या संरक्षणासाठी इतके अक्षम्य दुर्लक्ष करीत असेल तर शहरातील नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणी घ्यावी? आता खरी कसोटी आहे ती पोलिसांची, फटाके फोडणा-यांविरुद्ध गुन्हा तर दाखल आहेच, पण त्याची माहिती दडविणा-यांबाबत काय?

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक