शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मग महापौरांवर गुन्हा का नाही? 

By श्याम बागुल | Updated: November 26, 2018 16:15 IST

शहरात महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली जितकी चर्चेची ठरली, तितक्याच प्रमाणात त्यांच्या बदलीनंतर महापौरांच्या रामायण या निवासस्थानाबाहेर फोडलेल्या फटाक्यांची चर्चा होत आहे. मुंडे यांच्या कामकाजाबाबत शासन दरबारी तक्रारी झाल्यानेच शासनाने त्यांची बदली केली त्याबाबत समाधान व्यक्त करणा-या महापौरांनी मात्र

श्याम बागुलनाशिक : घराच्या अंगणात कोणा तिºहाईताने कचरा आणून टाकला तर अंगाचा तिळपापड होऊन संबंधितांच्या वाडवडिलांचा उद्धार केला जातो, त्यातही जर कचरा टाकणाऱ्याची ओळख पटली तर प्रसंगी प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचते. अशी समाजाची मानसिकता असताना शहराच्या प्रथम नागरिकाच्या घरासमोरच अज्ञात व्यक्ती फटाक्यांचा कचरा करून पलायन करीत असेल तर त्याची दखल घेणे अधिकच क्रमप्राप्त ठरते. परंतु प्रथम नागरिकानेच या फटाक्यांच्या कचºयाबद्दल मौन पाळणे व कचरा आपण केलेलाच नाही, असा निर्वाळा देणे म्हणजे एकतर त्यांनी जाणूनबुजून या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केले किंवा फोडलेल्या फटाक्यांच्या कचºयाबाबत त्यांची कोणतीही तक्रार नाही, असे मानावे काय?शहरात महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली जितकी चर्चेची ठरली, तितक्याच प्रमाणात त्यांच्या बदलीनंतर महापौरांच्या रामायण या निवासस्थानाबाहेर फोडलेल्या फटाक्यांची चर्चा होत आहे. मुंडे यांच्या कामकाजाबाबत शासन दरबारी तक्रारी झाल्यानेच शासनाने त्यांची बदली केली त्याबाबत समाधान व्यक्त करणाºया महापौरांनी मात्र घरासमोर फोडलेल्या फटाक्यांबाबत अनभिज्ञता दर्शवित, आपण फटाके न फोडल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्याबाबत जे काही नियम, निकष ठरवून दिले ते डावलून ‘रामायण’च्या बाहेर फटाके फोडण्यात आल्याने त्याला जबाबदार धरून महापौरांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी एका सामाजिक संस्थेने करून तशी तक्रार पोलिसांत दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौरांनी दिलेल्या स्पष्टीकरणाला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे रामायण बंगल्याबाहेर फटाके कोणी फोडले हा विषय जितका महत्त्वाचा आहे, तितकाच तो महापौरांनी फटाक्यासारखी जीविताला घातक वस्तू कोणी अज्ञाताने आपल्या निवासस्थानाबाहेर फोडूनही त्याकडे दुर्लक्ष करणे अधिक गंभीर आहे. मुळात शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या उपस्थितीत एखाद्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पायदळी तुडवून फटाके फोडणे हा जसा कायदेशीर गुन्हा आहे, तसाच त्याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात कुचराई करणे हादेखील कायदेशीर गुन्हाच आहे. घटनेत व कायद्यातही एखादे गैरकृत्य होत असताना त्याकडे जाणूनबुजून वा हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणे गुन्हा मानला गेला असताना या संदर्भात पोलिसांची भूमिकाही निश्चितच संशयास्पद आहे. महापौर यांच्या निवासस्थानाबाहेर फटाके फोडून त्यांच्या जीविताला धोका उत्पन्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परंतु इतक्या गंभीर गुन्ह्यात महापौरांनी मौन पाळणे व निवासस्थानाबाहेर फटाके फुटूनही त्याबाबतची माहिती पोलिसांना न दिल्याने त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई होणे तितकेच गरजेचे आहे. शहराचा प्रथम नागरिक आपल्या स्वत:च्या जीविताच्या संरक्षणासाठी इतके अक्षम्य दुर्लक्ष करीत असेल तर शहरातील नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणी घ्यावी? आता खरी कसोटी आहे ती पोलिसांची, फटाके फोडणा-यांविरुद्ध गुन्हा तर दाखल आहेच, पण त्याची माहिती दडविणा-यांबाबत काय?

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक