शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

...तर शेतकरी जशास तसे उत्तर देतील: राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 01:44 IST

महावितरणने सहकार्याचे धोरण राबवून वीजदेयकात सुधारणा करावी. शेतकऱ्यांना वाजवी वीज बिले व त्यात ५० टक्के सूट द्यावी. तरच शेतकरी त्यांचे वीज बिल भरू शकतील. शेतकऱ्यांना जेरीस आणून डी.पी. बंद करण्याचा मार्ग अवलंबला तर शेतकरीही जशास तसे उत्तर देतील, असा सज्जड इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.

ठळक मुद्दे: खेडलेझुंगेत शेतकरी संवाद मेळावा

खेडलेझुंगे : महावितरणने सहकार्याचे धोरण राबवून वीजदेयकात सुधारणा करावी. शेतकऱ्यांना वाजवी वीज बिले व त्यात ५० टक्के सूट द्यावी. तरच शेतकरी त्यांचे वीज बिल भरू शकतील. शेतकऱ्यांना जेरीस आणून डी.पी. बंद करण्याचा मार्ग अवलंबला तर शेतकरीही जशास तसे उत्तर देतील, असा सज्जड इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.

खेडलेझुंगे येथे शेतकरी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शेट्टी बोलत होते. यावेळी उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस निवृत्ती गारे, जिल्हा अध्यक्ष सुधाकर मोगल, पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे उपस्थित होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळणे, शासनाच्या दर पडण्याच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झालेली आर्थिक अवनती, उत्पादन खर्चाच्या आधारावर मका आणि सोयाबीनची हमीभाव मागणी आणि सक्तीची वीज बिल वसुली करून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक या शेतकरी प्रश्नाबाबत यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी सुनीता माळी, माधव महाराज घोटेकर, भाऊसाहेब भवर, शिवनाथ सदाफळ, ऋषिकेश नागरे, आनंद घोटेकर, विजय गिते, दिनकर गिते, ज्ञानेश्वर साबळे, केदारनाथ घोटेकर, संजय बर्डे, प्रमोद गिते, कैलास हागोटे, अशोक घोटेकर, योगेश घोटेकर, प्रतीक घोटेकर यासह रुई, कोळगाव, करंजी, सारोळे, नांदूर मध्यमेश्वर येथील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

इन्फो

लढा उभारण्याची मागणी

यावेळी शेट्टी यांनी खेडलेझुंगे येथील ग्रामदैवत योगिराज तुकाराम बाबा समाधीस पुष्पहार अर्पण करून अभय वरद हनुमानजी यांच्या १११ फूट उंच भव्य मूर्तीचे दर्शन घेऊन उपस्थित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सरपंच मायाताई सदाफळ यांनी राजू शेट्टी यांचे औक्षण करत त्यांचा सत्कार केला. शेतकऱ्यांच्या वतीने धर्मराज घोटेकर, रामदास गोरडे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभा करण्याची मागणी केली.

टॅग्स :NashikनाशिकRaju Shettyराजू शेट्टी