शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

..तर स्मार्ट सिटीची कामे नागरिकच रोखतील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST

शहराशी आपुलकी आणि बांधिलकी नसलेली स्मार्ट सिटी कंपनी नाशिककरांचा केवळ विध्वंस करण्यासाठी व शेकडो कोटी रुपयांच्या लोकनिधीचा अपव्यय करण्यासाठीच ...

शहराशी आपुलकी आणि बांधिलकी नसलेली स्मार्ट सिटी कंपनी नाशिककरांचा केवळ विध्वंस करण्यासाठी व शेकडो कोटी रुपयांच्या लोकनिधीचा अपव्यय करण्यासाठीच स्थापण्यात आली आहे, काय अशी शंका यावी अशा प्रकारचे कंपनीचे कामकाज दिसून आले आहे. या कामांना सर्वच स्थरातून सतत विरोध असूनही चुकीची कामे रेटून नेण्याची कंपनीची आग्रही वृत्ती ही नागरिकांसाठी अनाकलनीय ठरली आहे.

कलेक्टर कचेरीसमोरील चांगला सुस्थितीत असलेला रस्ता फोडून नवीन रस्त्यासाठी कित्येक कोटी रुपये वाया घालणे, गोदावरी नदीतील गाळ काढण्याचे निमित्त करून केलेला वाळूचा उपसा, पुराच्या पाण्याचा विचार न करता गोदावरी घाटावर लावण्यात आलेल्या फरशा, जुन्या नाशकातील चांगल्या रस्त्यांची तोडफोड, नवीन लावलेले पथदीप आणि खांब उखडून त्या जागी दुसरे बसविणे, एमजी रोडसारखा चांगला रस्ता फोडण्याचा घाट घालणे, रहदारीच्या रस्त्यांवर पार्किंगचे मार्किंग करून रस्ता अरूंद करून त्यावर पे ॲंड पार्कच्या योजना प्रत्येक कामासाठी लागणारा अक्षम्य विलंब व दिरंगाईमुळे कंपनीने जणू संपूर्ण शहरच वेठीस धरले आहे.

हे सर्व बघता स्मार्ट सिटी कंपनीला असे अमर्याद अधिकार सरकारने दिले आहे की काय, कंपनीची मनमानी कोणीही थांबवू शकणार नाही, कंपनीच्या सल्लागार समितीत असलेले लोकप्रतिनिधी हे केवळ नामधारी आहेत, असेच त्यांचे म्हणणे आहे.

मध्यंतरी कंपनीच्या वाईट कारभाराला कंटाळून स्मार्ट सिटी कंपनी बरखास्त करावी ही मागणीही महापालिकेतील लोकप्रतिनिधींनी केली होती. हे रास्तच होते. नाशिक महापालिकेतील प्रशासन यापेक्षा कितीतरी पटीने चांगले प्रकल्प राबवत होते, याची प्रचिती प्रत्येकवेळी येते. भीक नको, पण कुत्रा आवर अशी अवस्था नाशिककरांची झाली आहे. कुणालाही न जुमानता असेच चुकीचे प्रकल्प राबवणे कंपनीने यापुढेही सुरूच राहिले तर लोकांना बघ्याची भूमिका सोडून रस्त्यावर येऊन थांबवणे हाच पर्याय उपलब्ध असेल.

- अरुण काबरे, वास्तुविशारद

210721\21nsk_42_21072021_13.jpg

अरूण काबरे