नाशिक : नांदगाव तालुक्यातील गंगाधरी गावातील ज्ञानेश्वर सोमासे यांच्या शेतातून रात्रीच्या वेळेस गाय चोरून नेली. याबाबत नांदगाव पोलीस ठाण्याकडून कुठलीही कार्यवाही होत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. देशात जेथे गायीला देव मानले जाते, तेथेच गायींची भरदिवसा सर्वांसमोर कत्तल केली जाते ही बाब निंदनीय आहे. याबाबत पोलिसांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. याबाबत योग्य कार्यवाही न झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांचा दुग्ध व शेती व्यवसाय संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर गायींची चोरी करणाऱ्यांबरोबरच दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)