शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पावसात रस्त्याचा भराव गेला वाहून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2022 00:17 IST

पिळ्कोस : कळवण तालुक्यातील पिळकोससह परिसरात काल झालेल्या पहिल्या मुसळधार पावसाने राज्य महामार्ग क्र. १७ वरील गिरणा नदीवरील पिळकोस- बगडू पुलाच्या नुकतेच नवीन डांबरीकरण झालेल्या रस्त्याचा उत्तरेकडील बाजूचा रस्ता व पुलाचा भराव पावसाच्या पाण्याने वाहून गेला असून या ठिकाणी लहान मोठे अपघात होऊ लागले आहेत. संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाहनधारक प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देमहामार्ग क्र. १७ वर अपघातात वाढ

पिळ्कोस : कळवण तालुक्यातील पिळकोससह परिसरात काल झालेल्या पहिल्या मुसळधार पावसाने राज्य महामार्ग क्र. १७ वरील गिरणा नदीवरील पिळकोस- बगडू पुलाच्या नुकतेच नवीन डांबरीकरण झालेल्या रस्त्याचा उत्तरेकडील बाजूचा रस्ता व पुलाचा भराव पावसाच्या पाण्याने वाहून गेला असून या ठिकाणी लहान मोठे अपघात होऊ लागले आहेत. संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाहनधारक प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.भगदाड पडण्यास सुरुवातदीड वर्षापासून ह्या रस्त्यावर संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला खोल साईटपट्ट्या कोरून ठेवल्या असून त्या भरल्या नसून,त्या ठिकाणी ही अपघात होत आहेत. शेतकऱ्यांच्या पाईप लाईन तोडल्या व त्या जोडून दिल्या नसल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे. या राज्य महामार्ग क्रमाक १७ च्या रस्त्यावरून पावसाचे पाणी नदीकडे प्रवाहित होत असल्यामुळे पुलाच्या समोरील उतारावरील रस्त्याच्या कडेचा भराव यात वाहून गेला आहे. त्याठिकाणी खोल भाग झाला असून पुलाच्या दोन्ही बाजूला भगदाड पडण्यास सुरुवात झाली आहे. संबंधित विभागाने कायमस्वरूपी टिकाऊ असा भराव करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अशी मागणी वाहनधारकांकडून जोर धरत आहे.शेतकऱ्यांत असमाधानगेल्या आठवड्यात भादवण फाटा ते पिळकोस - बगडू पूल या एक किमी अंतरावर नवीन डांबरीकरण झाले. पहिल्या पावसात त्याचे पितळ उघडे झाल्याने मुसळधार पावसाचे पाणी याच दिशेने वाहून थेट गिरणा नदीवरील पिळकोस झ्रबगडू या पुलावर आले व त्यातच रस्ता खचला. पुलाच्या रस्त्याचा भराव वाहून गेला. संबंधित रस्त्याच्या कामाकडे संबंधित विभागाचे अधिकारी फिरकत नसून झालेल्या कामांची गुणवत्ता व दर्जा याबाबतीत लोकप्रतिनिधी व शेतकरी असमाधानी आहेत.सिमेंट गटारींची मागणीगिरणा नदीवरील पिळकोस झ्रबगडू पुलावर अपघात हे नियमित घडत असतात. संबंधित विभागाने या रस्त्याला कायमस्वरूपी टिकेल असा भराव भरून रस्ता वाहतुकीस योग्य करावा व पुलाच्या दोन्हीही बाजूच्या रस्त्याला पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी सिमेंटच्या गटारी कराव्यात, अशी मागणी उपसरपंच प्रवीण जाधव, योगेश जाधव,राहुल सूर्यवंशी, संदीप जाधव, पंडित जाधव, अशोक जाधव, शिवा जाधव, सुनील जाधव, रोशन जाधव, उत्तम मोरे, ललित वाघ यांसह परिसरातील नागरिकांनी व वाहनधारकांनी केली आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाtalukaतालुका