शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटला नाशिकचे विशेष सरकारी अभियोक्ता मिसर चालविणार

By अझहर शेख | Updated: May 15, 2023 22:00 IST

राज्य शासनाकडून नियुक्ती

अझहर शेख, नाशिक: मुंबईत २०११साली झालेल्या तीन शक्तीशाली बॉम्बस्फोटमध्ये २७ लोक मृत्युमुखी व १२७ जखमी झाले होते. या साखळी बॉम्बस्फोटचा तपास दहशतवादी विरोधी पथक, मुंबईकडे सोपविण्यात आला होता. यामध्ये पथकाने ११ संशयित आरोपींना अटक करून दोषारोपपत्र दाखल केले आहे. हा खटला चालविण्यासाठी नाशिकचे सरकारी अभियोक्ता अजय मिसर यांची शासनाकडून विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईत १३ जुलै २०११ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटमध्ये ऑपेरा हाऊस येथे १५ लोक, झवेरी बाजारमध्ये ११ आणि दादरच्या कबुतर खान्यात १ असे २७ लोक मृत्यूमुखी पडले होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने तपास करत हे बॉम्बस्फोट घडवून आणण्यामागे इंडियन मुजाहिदिन संघटनेचा हात असल्याचे तपासात निष्पन्न केले होते. पोलिसांनी अकरा आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता. संशयित आरोपींनी बॉम्बस्फोटासाठी वापरलेल्या वाहनांचा तपशील, बॉम्ब बनविण्यासाठी केलेली कार्यवाही, कटकारस्थान, सिमकार्ड, हवालातून आलेली रक्कम, सीसीटीव्ही फुटेज, इंडियन मुजाहिदिन या दहशतवादी संघटनेची कार्यप्रणाली आदींचा सखोल तपास करण्यात आला. या सर्व आरोपींना वेगवेगळ्या तुरूंगात ठेवण्यात आले आहेत.

दहशतवादविरोधी पथकाकडून शिफारस

मुंबई दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या शिफारसीवरून शनिवारी (दि.९) काढण्यात अलेल्या अधिसूचनेनुसार ॲड. अजय मिसर यांची या खटल्यात विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वीही मिसर यांनी छोटा राजनशी संबंधित पाकमोडीया स्ट्रीट फायरिंग खटला, २००८साली मालेगाव बॉम्बस्फोट खटला, २६/११च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अबु जुंदाल खटला, तसेच लष्कर-ए-तोयबाचा आरोपी बिलाल शेख, हिमायत बेग यांनी पोलिस अकदमी नाशिकची केलेली रेकी आदी खटल्यांचे कामकाज चालविले आहे.

साखळी बॉम्बस्फोट खटला हा इंडियन मुजाहिदीन दहशतवादी संघटनेने घडवून आणला आहे. या खटल्याकामी प्रचंड मोठा प्रत्यक्ष, परिस्थितीजन्य व तांत्रिक पुरावा न्यायालयासमोर मांडण्याचे मोठे आव्हान आहे. एटीएसकडून चांगला तपास करण्यात आला आहे. प्रचंड मोठा कागदोपत्री पुरावा सिद्ध करण्याची जबाबदारी असून ती प्रभावीपणे पार पाडण्यात येईल. -ॲड. अजय मिसर, सरकारी वकिल, नाशिक

टॅग्स :Mumbai Bomb Blastमुंबई बॉम्बस्फोटNashikनाशिक