शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटला नाशिकचे विशेष सरकारी अभियोक्ता मिसर चालविणार

By अझहर शेख | Updated: May 15, 2023 22:00 IST

राज्य शासनाकडून नियुक्ती

अझहर शेख, नाशिक: मुंबईत २०११साली झालेल्या तीन शक्तीशाली बॉम्बस्फोटमध्ये २७ लोक मृत्युमुखी व १२७ जखमी झाले होते. या साखळी बॉम्बस्फोटचा तपास दहशतवादी विरोधी पथक, मुंबईकडे सोपविण्यात आला होता. यामध्ये पथकाने ११ संशयित आरोपींना अटक करून दोषारोपपत्र दाखल केले आहे. हा खटला चालविण्यासाठी नाशिकचे सरकारी अभियोक्ता अजय मिसर यांची शासनाकडून विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईत १३ जुलै २०११ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटमध्ये ऑपेरा हाऊस येथे १५ लोक, झवेरी बाजारमध्ये ११ आणि दादरच्या कबुतर खान्यात १ असे २७ लोक मृत्यूमुखी पडले होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने तपास करत हे बॉम्बस्फोट घडवून आणण्यामागे इंडियन मुजाहिदिन संघटनेचा हात असल्याचे तपासात निष्पन्न केले होते. पोलिसांनी अकरा आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता. संशयित आरोपींनी बॉम्बस्फोटासाठी वापरलेल्या वाहनांचा तपशील, बॉम्ब बनविण्यासाठी केलेली कार्यवाही, कटकारस्थान, सिमकार्ड, हवालातून आलेली रक्कम, सीसीटीव्ही फुटेज, इंडियन मुजाहिदिन या दहशतवादी संघटनेची कार्यप्रणाली आदींचा सखोल तपास करण्यात आला. या सर्व आरोपींना वेगवेगळ्या तुरूंगात ठेवण्यात आले आहेत.

दहशतवादविरोधी पथकाकडून शिफारस

मुंबई दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या शिफारसीवरून शनिवारी (दि.९) काढण्यात अलेल्या अधिसूचनेनुसार ॲड. अजय मिसर यांची या खटल्यात विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वीही मिसर यांनी छोटा राजनशी संबंधित पाकमोडीया स्ट्रीट फायरिंग खटला, २००८साली मालेगाव बॉम्बस्फोट खटला, २६/११च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अबु जुंदाल खटला, तसेच लष्कर-ए-तोयबाचा आरोपी बिलाल शेख, हिमायत बेग यांनी पोलिस अकदमी नाशिकची केलेली रेकी आदी खटल्यांचे कामकाज चालविले आहे.

साखळी बॉम्बस्फोट खटला हा इंडियन मुजाहिदीन दहशतवादी संघटनेने घडवून आणला आहे. या खटल्याकामी प्रचंड मोठा प्रत्यक्ष, परिस्थितीजन्य व तांत्रिक पुरावा न्यायालयासमोर मांडण्याचे मोठे आव्हान आहे. एटीएसकडून चांगला तपास करण्यात आला आहे. प्रचंड मोठा कागदोपत्री पुरावा सिद्ध करण्याची जबाबदारी असून ती प्रभावीपणे पार पाडण्यात येईल. -ॲड. अजय मिसर, सरकारी वकिल, नाशिक

टॅग्स :Mumbai Bomb Blastमुंबई बॉम्बस्फोटNashikनाशिक