शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

अवकाळी नुकसानीचा मुद्दा अधिवेशनात प्रभावीपणे मांडू - बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 18:10 IST

बाळासाहेब थोरात यांनी बहादुरी ता. चांदवड यासह परिसरातील गावांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसान झालेल्या द्राक्षबागांची पाहणी केली.

महेश गुजराथी -

चांदवड (नाशिक) : पंचनाम्यांचे निकष लावले तरी आता अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाला शेतकऱ्यांना दिलासा द्यावाच लागणार आहे. हिवाळी अधिवेशनात अवकाळीच्या नुकसानीचा मुद्दा काँग्रेसकडून प्रभावीपणे मांडला जाईल, अशी ग्वाही राज्याचे माजी मंत्री व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी (दि.२९) जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील बहादुरीसह निफाड तालुक्यातील कसबे-सुकेणे येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर दिली.

बाळासाहेब थोरात यांनी बहादुरी ता. चांदवड यासह परिसरातील गावांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसान झालेल्या द्राक्षबागांची पाहणी केली. यावेळी तहसीलदार व अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी आपली कैफीयत त्यांच्यासमोर मांडली. यंदा बँकेकडून पीक कर्ज घेऊन द्राक्षबागांवर केलेला सर्व खर्च वाया गेला आहे. यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता, राज्य सरकार काहीही मदत करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे बँकेचे पीक कर्ज माफ करावे, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली. थोरात यांनी सद्य:स्थितीत शंभर टक्के नुकसान झाल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचे सांगत कृषी विभागाने पंचनामे करताना वस्तुस्थितीदर्शक अहवाल तयार करावा तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो, असे स्पष्ट केले.

काँग्रेस याबाबत राज्य शासनाला दखल घेण्यास भाग पाडेल. त्यासाठी आम्ही राज्यातील सर्व विरोधी पक्षांना बरोबर घेऊन विधिमंडळात त्यावर सरकारचे लक्ष वेधू, असे आश्वासनही थोरात यांनी यावेळी दिले. यावेळी माजी आमदार शिरीष कोतवाल, राजाराम पानगव्हाणे, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, चांदवड बाजार समितीचे सभापती संजय जाधव, रमेश कहांडाळे, भीमराव जेजुरे, बाळासाहेब शिंदे, ज्ञानेश्वर गायकवाड, शिवाजी कासव, उत्तमराव ठोंबरे, अरुण पगार आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन