शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी नुकसानीचा मुद्दा अधिवेशनात प्रभावीपणे मांडू - बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 18:10 IST

बाळासाहेब थोरात यांनी बहादुरी ता. चांदवड यासह परिसरातील गावांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसान झालेल्या द्राक्षबागांची पाहणी केली.

महेश गुजराथी -

चांदवड (नाशिक) : पंचनाम्यांचे निकष लावले तरी आता अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाला शेतकऱ्यांना दिलासा द्यावाच लागणार आहे. हिवाळी अधिवेशनात अवकाळीच्या नुकसानीचा मुद्दा काँग्रेसकडून प्रभावीपणे मांडला जाईल, अशी ग्वाही राज्याचे माजी मंत्री व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी (दि.२९) जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील बहादुरीसह निफाड तालुक्यातील कसबे-सुकेणे येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर दिली.

बाळासाहेब थोरात यांनी बहादुरी ता. चांदवड यासह परिसरातील गावांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसान झालेल्या द्राक्षबागांची पाहणी केली. यावेळी तहसीलदार व अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी आपली कैफीयत त्यांच्यासमोर मांडली. यंदा बँकेकडून पीक कर्ज घेऊन द्राक्षबागांवर केलेला सर्व खर्च वाया गेला आहे. यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता, राज्य सरकार काहीही मदत करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे बँकेचे पीक कर्ज माफ करावे, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली. थोरात यांनी सद्य:स्थितीत शंभर टक्के नुकसान झाल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचे सांगत कृषी विभागाने पंचनामे करताना वस्तुस्थितीदर्शक अहवाल तयार करावा तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो, असे स्पष्ट केले.

काँग्रेस याबाबत राज्य शासनाला दखल घेण्यास भाग पाडेल. त्यासाठी आम्ही राज्यातील सर्व विरोधी पक्षांना बरोबर घेऊन विधिमंडळात त्यावर सरकारचे लक्ष वेधू, असे आश्वासनही थोरात यांनी यावेळी दिले. यावेळी माजी आमदार शिरीष कोतवाल, राजाराम पानगव्हाणे, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, चांदवड बाजार समितीचे सभापती संजय जाधव, रमेश कहांडाळे, भीमराव जेजुरे, बाळासाहेब शिंदे, ज्ञानेश्वर गायकवाड, शिवाजी कासव, उत्तमराव ठोंबरे, अरुण पगार आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन