शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
4
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
5
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
6
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
7
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
8
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
9
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
10
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
11
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
12
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
13
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
14
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
15
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
16
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
17
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
18
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
19
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
20
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
Daily Top 2Weekly Top 5

महामारी काळात संवादाचे महत्त्व अधोरेखित : श्रीधर साळुंके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 01:21 IST

संवाद का गरजेचा असतो, याचे महत्त्व दोन वर्षांतील महामारी काळात पुन्हा एकदा अधोरेखित झाले. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आजपर्यंत सर्वश्रेष्ठ मानला जातो. श्रीकृष्ण तत्त्व समजून घेणे म्हणजे संवाद साधणे होय. इतरांसोबतच व्यक्तीचा स्वत:च्या मनाशी संवाद होणे गरजेचे असते, असे मत श्रीधर साळुंके यांनी मांडले. गोदाकाठावरील य. म. पटांगणावर सुरू असलेल्या नाशिक वसंत व्याख्यानमालेत शुक्रवारी (दि. २०) ते बोलत होते. स्व. माधवराव लिमये स्मृती व्याख्यानात ‘मानवी जीवनात संवादाचे महत्त्व’ विषयावर त्यांना पुष्प गुंफले.

ठळक मुद्दे नाशिक वसंत व्याख्यानमाला

नाशिक : संवाद का गरजेचा असतो, याचे महत्त्व दोन वर्षांतील महामारी काळात पुन्हा एकदा अधोरेखित झाले. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आजपर्यंत सर्वश्रेष्ठ मानला जातो. श्रीकृष्ण तत्त्व समजून घेणे म्हणजे संवाद साधणे होय. इतरांसोबतच व्यक्तीचा स्वत:च्या मनाशी संवाद होणे गरजेचे असते, असे मत श्रीधर साळुंके यांनी मांडले. गोदाकाठावरील य. म. पटांगणावर सुरू असलेल्या नाशिक वसंत व्याख्यानमालेत शुक्रवारी (दि. २०) ते बोलत होते. स्व. माधवराव लिमये स्मृती व्याख्यानात ‘मानवी जीवनात संवादाचे महत्त्व’ विषयावर त्यांना पुष्प गुंफले.

ते म्हणाले, व्यक्तीचा संवाद आजूबाजूच्या व्यक्तींबरोबरच आपल्या मनाशी होणे अपेक्षित असते. ज्या ठिकाणी मने जुळतात तेथे संवादाशिवाय नाते घट्ट होते. मनमोकळेपणाने बोलण्याचे ठिकाण म्हणजे मित्र असतो. मात्र, तो मित्रदेखील जिवाभावाचा असावा लागतो. चुकीच्या मार्गावर नेणारा नसावा. अन्यथा जीवनात मोठे नुकसान होते. आपला संवाद अनेक नात्यांमध्ये असतो. यात पालक व पाल्य यांच्यातील संवाद कमी झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अश्रू जीवनग्रंथाचा पूर्णविराम आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या काळात पालकांनी जागृत असणे गरजेचे आहे. संवाद मनाचा मनाशी होणे गरजेचे आहे. म्हणजे आवाज वाढविण्याची गरज नसते, मने जुळतात तेथे शब्दांशिवाय सर्व काही समजते, असे साळुंके यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक