शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नाशकात वाढला थंडीचा कडाका; ११.१अंश या हंगामातील नीचांकी तापमान

By अझहर शेख | Updated: January 15, 2024 15:40 IST

भारतीय हवामान खात्याकडून सोमवारपासून पुढे आठवडाभर राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक : शहर व परिसरात सोमवारी (दि.१५) अचानकपणे थंडीचा कडाका वाढला. किमान तापमानात वेगाने घसरण झाल्याने या हंगामातील सर्वात नीचांकी११.१अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. आतापर्यंत किमान तापमान १२अंशापेक्षा खाली घसरले नव्हते. मागील तीन दिवसांत थेट सहा अंशांनी तापमान घसरल्याने थंडीचा कडाका नाशिककरांना आता जाणवत आहे.

भारतीय हवामान खात्याकडून सोमवारपासून पुढे आठवडाभर राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यानुसार रविवारी रात्रीपासूनच थंडी नागरिकांना जाणवू लागली होती. रात्री थंड वारे वेगाने वाहू लागल्याने सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमान थेट ११.१अंशापर्यंत खाली आले. या हंंगामात पहिल्यांदाच इतके कमी किमान तापमान नोंदविले गेले. थंडीचा कडाका वाढताच नागरिकांकडून पुन्हा ऊबदार कपड्यांचा वापरावर भर दिला जाऊ लागला आहे. तसेच सकाळी व संध्याकाळी गोदाकाठावर व शहराजवळच्या खेड्यांत तसेच शहरी भागातील गावठाण परिसरातही शेकोट्यांचा आधार रहविाशी घेतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. हा संपुर्ण आठवडा थंडीचा राहणार आहे. यामुळे उबदार कपड्यांना मागणी वाढणार आहे.

आठवडाभरापूर्वी थंडी पुर्ण गायब झाल्याचा अनुभव नागरिक घेत होते. आता मात्र थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. यासोबतच वातावरणात उष्माही आहे. कारण दिवसभर ऊनही कडक पडत असून कमाल तापमान संध्याकाळी ३२ ते ३० अंशाच्या जवळपास स्थिरावत आहे. आठवडाभरापुर्वी ढगाळ हवामानासह किमान तापमानही १७.७अंशापर्यंत वाढलेले होते. या आठवड्यापासून वातावरणाची स्थितीमध्ये अचानक वेगाने बदल होत असून किमान तापमानाचा पारा घसरू लागला असून कमाल तापमानही २अंशांनी खाली आले आहे. आकाश निरभ्र राहत असून थंडीचा कडाका वाढू लागला आहे.