शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

तिसऱ्या पर्वणीला कसोटी

By admin | Updated: September 14, 2015 23:29 IST

पुन्हा पेच : शाहीस्नानानंतर तीनही आखाडे रामकुंडावर थांबणार

संदीप झिरवाळ,पंचवटी

 सिंहस्थ कुंभमेळ्यातील शेवटच्या तिसर्‍या पर्वणीला आखाड्याच्या परंपरेनुसार शाहीस्नानाचा क्रम बदलत असल्याने शुक्रवारी (दि.१८) रोजी होणार्‍या तिसर्‍या शाहीस्नानाला प्रथम निर्माेही, मध्यभागी दिगंबर आणि शेवटी निर्वाणी असे आखाडे शाहीस्नान करणार आहेत. शाहीस्नान झाल्यानंतर परतीचा क्रम बदलत असल्याने तीनही आखाडे रामकुंडावर थांबणार असल्याने तिसर्‍या पर्वणीच्या दिवशी प्रशासनाची कसोटी लागणार आहे. आखाड्यांच्या शाहीस्नान परंपरेनुसार शुक्रवारी होणार्‍या तिसर्‍या शाहीस्नानाच्या दिवशी निर्माेही आखाडा अग्रभागी राहील. त्यानंतर दिगंबर आखाडा मिरवणुकीच्या मध्यभागी राहात असल्याने दिगंबर आखाड्याचे महंत रामकुंडावर दाखल झाल्यानंतर दिगंबरचे महंत शाहीस्नान करून तेदेखील रामकुंडावरच थांबतील आणि दिगंबरचे स्नान आटोपल्यानंतर निर्वाणी आखाडा स्नानासाठी रामकुंडावर दाखल होईल आणि परतताना निर्वाणी आखाडा पुढे राहील. त्यानंतर मध्यभागी दिगंबर आणि शेवटी निर्माेही आखाडा राहणार आहे.  दरम्यान, या कालावधीत भाविकांनी स्नानासाठी शिरकाव केल्यास काही गोंधळ होण्याची दाट शक्यता आहे. निर्माेही व दिगंबरचे साधू-महंत हे निर्वाणी आखाड्याचे स्नान होईपावेतो रामकुंडावरच काही काळासाठी थांबणार असल्याने प्रशासनालादेखील भाविकांना तीनही आखाड्यांचे स्नान आटोपत नाही तोपर्यंत सोडण्याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.

थांबण्यासाठी जागा निश्‍चित करावी लागणारशाहीस्नानासाठी मिरवणुकीत अग्रभागी असणार्‍या निर्माेही व मध्यभागी असलेल्या दिगंबर तसेच शेवटी येणार्‍या निर्वाणी आखाडे स्नानानंतर रामकुंडावर काहीकाळ थांबणार असल्याने या वेळेत केवळ आखाड्यांच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांनाच स्नान करता येईल. त्यामुळे गेल्या दोन पर्वणीत ज्याप्रमाणे भाविकांनी मिरवणुकीत शिरकाव केला होता तसा शिरकाव भाविकांनी करू नये यासाठी प्रशासनाला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. सुरुवातीला निर्माेही व दिगंबर आखाड्यांचे स्नान झाल्यानंतर आखाड्यांचे महंत, हनुमान निशाण, मंत्री, पदाधिकारी, वाद्यपथक, रामकुंडावर थांबून राहणार असल्याने साधू-महंतांना थांबण्यासाठी जागा निश्‍चित करावी लागणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यातील दोन शाहीस्नानाच्या पर्वण्या शांततेत पार पडल्या. परंतु शाहीस्नानापूर्वी समन्वय साधण्यासाठी मेळा व पोलीस प्रशासनाने साधू-महंतांची बैठक घेऊन चर्चा करणे गरजेचे होते. दोन पर्वण्या झाल्या तरी प्रशासनाने बैठक घेतली नाही. तिसर्‍या पर्वणीला प्रशासनाची कसोटी लागणार असल्याने समन्वय साधण्यासाठी किमान तिसर्‍या पर्वणीपूर्वी बैठक घेणे गरजेचे ठरणार आहे.- महंत राजेंद्रदास, निर्माेही आखाडा