शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या पर्वणीला कसोटी

By admin | Updated: September 14, 2015 23:29 IST

पुन्हा पेच : शाहीस्नानानंतर तीनही आखाडे रामकुंडावर थांबणार

संदीप झिरवाळ,पंचवटी

 सिंहस्थ कुंभमेळ्यातील शेवटच्या तिसर्‍या पर्वणीला आखाड्याच्या परंपरेनुसार शाहीस्नानाचा क्रम बदलत असल्याने शुक्रवारी (दि.१८) रोजी होणार्‍या तिसर्‍या शाहीस्नानाला प्रथम निर्माेही, मध्यभागी दिगंबर आणि शेवटी निर्वाणी असे आखाडे शाहीस्नान करणार आहेत. शाहीस्नान झाल्यानंतर परतीचा क्रम बदलत असल्याने तीनही आखाडे रामकुंडावर थांबणार असल्याने तिसर्‍या पर्वणीच्या दिवशी प्रशासनाची कसोटी लागणार आहे. आखाड्यांच्या शाहीस्नान परंपरेनुसार शुक्रवारी होणार्‍या तिसर्‍या शाहीस्नानाच्या दिवशी निर्माेही आखाडा अग्रभागी राहील. त्यानंतर दिगंबर आखाडा मिरवणुकीच्या मध्यभागी राहात असल्याने दिगंबर आखाड्याचे महंत रामकुंडावर दाखल झाल्यानंतर दिगंबरचे महंत शाहीस्नान करून तेदेखील रामकुंडावरच थांबतील आणि दिगंबरचे स्नान आटोपल्यानंतर निर्वाणी आखाडा स्नानासाठी रामकुंडावर दाखल होईल आणि परतताना निर्वाणी आखाडा पुढे राहील. त्यानंतर मध्यभागी दिगंबर आणि शेवटी निर्माेही आखाडा राहणार आहे.  दरम्यान, या कालावधीत भाविकांनी स्नानासाठी शिरकाव केल्यास काही गोंधळ होण्याची दाट शक्यता आहे. निर्माेही व दिगंबरचे साधू-महंत हे निर्वाणी आखाड्याचे स्नान होईपावेतो रामकुंडावरच काही काळासाठी थांबणार असल्याने प्रशासनालादेखील भाविकांना तीनही आखाड्यांचे स्नान आटोपत नाही तोपर्यंत सोडण्याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.

थांबण्यासाठी जागा निश्‍चित करावी लागणारशाहीस्नानासाठी मिरवणुकीत अग्रभागी असणार्‍या निर्माेही व मध्यभागी असलेल्या दिगंबर तसेच शेवटी येणार्‍या निर्वाणी आखाडे स्नानानंतर रामकुंडावर काहीकाळ थांबणार असल्याने या वेळेत केवळ आखाड्यांच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांनाच स्नान करता येईल. त्यामुळे गेल्या दोन पर्वणीत ज्याप्रमाणे भाविकांनी मिरवणुकीत शिरकाव केला होता तसा शिरकाव भाविकांनी करू नये यासाठी प्रशासनाला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. सुरुवातीला निर्माेही व दिगंबर आखाड्यांचे स्नान झाल्यानंतर आखाड्यांचे महंत, हनुमान निशाण, मंत्री, पदाधिकारी, वाद्यपथक, रामकुंडावर थांबून राहणार असल्याने साधू-महंतांना थांबण्यासाठी जागा निश्‍चित करावी लागणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यातील दोन शाहीस्नानाच्या पर्वण्या शांततेत पार पडल्या. परंतु शाहीस्नानापूर्वी समन्वय साधण्यासाठी मेळा व पोलीस प्रशासनाने साधू-महंतांची बैठक घेऊन चर्चा करणे गरजेचे होते. दोन पर्वण्या झाल्या तरी प्रशासनाने बैठक घेतली नाही. तिसर्‍या पर्वणीला प्रशासनाची कसोटी लागणार असल्याने समन्वय साधण्यासाठी किमान तिसर्‍या पर्वणीपूर्वी बैठक घेणे गरजेचे ठरणार आहे.- महंत राजेंद्रदास, निर्माेही आखाडा