शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

दहशतवाद्यांना सोशल मीडियामुळे बळ

By admin | Updated: January 31, 2015 00:55 IST

विजय भटकर : ईएसडीएस आयटी कंपनीच्या भेटीप्रसंगी प्रतिपादन; कायद्याची जरब बसविण्याची गरज

नाशिक : दहशतवादाला लगाम घालण्यासाठी जितके पर्याय समोर येत आहेत, तितक्याच दहशतवादाच्या वाटाही पसरत जात आहेत. त्यामध्ये सोशल मीडिया दहशतवाद्यांना बळ देणारे ठरत असून, या माध्यमातून भारतविरोधी कारवाया गतिमान करणे दहशतवाद्यांना सहज शक्य होत आहे. यावर जर नियंत्रण ठेवायचे असेल तर सोशल मीडियावर भारतीय पॉलिसी व कायद्यांची जरब बसविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन परम संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांनी केले. सातपूर येथील ईएसडीएस आयटी कंपनीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पीयूष सोमानी, विशाल जोशी, नितीन कापडणीस, अविनाश राय, कोमल सोमानी, आशिष कुमार, हर्नाम सिंग आदि उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. भटकर म्हणाले की, फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपसारखी लोकप्रिय माध्यमे विदेशातून हाताळली जातात. त्यामुळे या माध्यमांवर सक्रिय असलेल्या भारतविरोधी शक्तीचा आपणास सहजासहजी विमोड करता येत नाही. शिवाय एकट्या फेसबुकवर ३५ ते ४० टक्के भारतीय यूजर्स असल्याने मोठ्या प्रमाणात भारतीय चलन परदेशात जात आहे. गार्डनर यांच्या सर्व्हेनुसार २०१४ मध्ये व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून एक लाख कोटी रुपयांचा महसूल विदेशात गेला असून, यामध्ये दरवर्षाला ३० टक्क्यांनी वाढ होत आहे, तर हीच माध्यमे भारतात असती तर कोट्यवधी रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला असता. शिवाय भारतविरोधी दहशतवादी कारवायांवर रोख लावण्यातही आपल्याला यश आले असते. व्हॉट्स अ‍ॅप या माध्यमाचे संपूर्ण अधिकार १९ बिलीयन डॉलरला विकले गेले, ऐवढी रक्कम खर्च करण्याची भारतीयांमध्ये क्षमता आहे. मात्र इच्छाशक्ती नसल्याने सोशल मीडियांवरील वाढता दहशतवाद भारतासमोर आवाहन ठरत असल्याचेही डॉ. भटकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा अडवानी यांनी केले.