शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

दहशतवाद्यांना सोशल मीडियामुळे बळ

By admin | Updated: January 31, 2015 00:55 IST

विजय भटकर : ईएसडीएस आयटी कंपनीच्या भेटीप्रसंगी प्रतिपादन; कायद्याची जरब बसविण्याची गरज

नाशिक : दहशतवादाला लगाम घालण्यासाठी जितके पर्याय समोर येत आहेत, तितक्याच दहशतवादाच्या वाटाही पसरत जात आहेत. त्यामध्ये सोशल मीडिया दहशतवाद्यांना बळ देणारे ठरत असून, या माध्यमातून भारतविरोधी कारवाया गतिमान करणे दहशतवाद्यांना सहज शक्य होत आहे. यावर जर नियंत्रण ठेवायचे असेल तर सोशल मीडियावर भारतीय पॉलिसी व कायद्यांची जरब बसविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन परम संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांनी केले. सातपूर येथील ईएसडीएस आयटी कंपनीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पीयूष सोमानी, विशाल जोशी, नितीन कापडणीस, अविनाश राय, कोमल सोमानी, आशिष कुमार, हर्नाम सिंग आदि उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. भटकर म्हणाले की, फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपसारखी लोकप्रिय माध्यमे विदेशातून हाताळली जातात. त्यामुळे या माध्यमांवर सक्रिय असलेल्या भारतविरोधी शक्तीचा आपणास सहजासहजी विमोड करता येत नाही. शिवाय एकट्या फेसबुकवर ३५ ते ४० टक्के भारतीय यूजर्स असल्याने मोठ्या प्रमाणात भारतीय चलन परदेशात जात आहे. गार्डनर यांच्या सर्व्हेनुसार २०१४ मध्ये व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून एक लाख कोटी रुपयांचा महसूल विदेशात गेला असून, यामध्ये दरवर्षाला ३० टक्क्यांनी वाढ होत आहे, तर हीच माध्यमे भारतात असती तर कोट्यवधी रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला असता. शिवाय भारतविरोधी दहशतवादी कारवायांवर रोख लावण्यातही आपल्याला यश आले असते. व्हॉट्स अ‍ॅप या माध्यमाचे संपूर्ण अधिकार १९ बिलीयन डॉलरला विकले गेले, ऐवढी रक्कम खर्च करण्याची भारतीयांमध्ये क्षमता आहे. मात्र इच्छाशक्ती नसल्याने सोशल मीडियांवरील वाढता दहशतवाद भारतासमोर आवाहन ठरत असल्याचेही डॉ. भटकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा अडवानी यांनी केले.