शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

दहशतवाद्यांना सोशल मीडियामुळे बळ

By admin | Updated: January 31, 2015 00:55 IST

विजय भटकर : ईएसडीएस आयटी कंपनीच्या भेटीप्रसंगी प्रतिपादन; कायद्याची जरब बसविण्याची गरज

नाशिक : दहशतवादाला लगाम घालण्यासाठी जितके पर्याय समोर येत आहेत, तितक्याच दहशतवादाच्या वाटाही पसरत जात आहेत. त्यामध्ये सोशल मीडिया दहशतवाद्यांना बळ देणारे ठरत असून, या माध्यमातून भारतविरोधी कारवाया गतिमान करणे दहशतवाद्यांना सहज शक्य होत आहे. यावर जर नियंत्रण ठेवायचे असेल तर सोशल मीडियावर भारतीय पॉलिसी व कायद्यांची जरब बसविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन परम संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांनी केले. सातपूर येथील ईएसडीएस आयटी कंपनीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पीयूष सोमानी, विशाल जोशी, नितीन कापडणीस, अविनाश राय, कोमल सोमानी, आशिष कुमार, हर्नाम सिंग आदि उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. भटकर म्हणाले की, फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपसारखी लोकप्रिय माध्यमे विदेशातून हाताळली जातात. त्यामुळे या माध्यमांवर सक्रिय असलेल्या भारतविरोधी शक्तीचा आपणास सहजासहजी विमोड करता येत नाही. शिवाय एकट्या फेसबुकवर ३५ ते ४० टक्के भारतीय यूजर्स असल्याने मोठ्या प्रमाणात भारतीय चलन परदेशात जात आहे. गार्डनर यांच्या सर्व्हेनुसार २०१४ मध्ये व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून एक लाख कोटी रुपयांचा महसूल विदेशात गेला असून, यामध्ये दरवर्षाला ३० टक्क्यांनी वाढ होत आहे, तर हीच माध्यमे भारतात असती तर कोट्यवधी रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला असता. शिवाय भारतविरोधी दहशतवादी कारवायांवर रोख लावण्यातही आपल्याला यश आले असते. व्हॉट्स अ‍ॅप या माध्यमाचे संपूर्ण अधिकार १९ बिलीयन डॉलरला विकले गेले, ऐवढी रक्कम खर्च करण्याची भारतीयांमध्ये क्षमता आहे. मात्र इच्छाशक्ती नसल्याने सोशल मीडियांवरील वाढता दहशतवाद भारतासमोर आवाहन ठरत असल्याचेही डॉ. भटकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा अडवानी यांनी केले.