शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दहावीच्या परीक्षा केंद्रावर चक्क तोतया भरारी पथक जेलरोड अभिनव शाळा केंद्रावरील प्रकार : दक्ष पालकामुळे प्रकार उघडकीस; संशयितांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 02:19 IST

नाशिकरोड : दहावीच्या परीक्षेत तोतया विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. परंतु चक्क तोतया भरारी पथकाने दहावीच्या परीक्षा केंद्राचा ताबा घेतल्याचा प्रकार घडला आहे.

ठळक मुद्देचाणाक्ष पालकामुळे सदर प्रकार उघडकीसदहावीचा मराठीचा पहिला पेपर होता

नाशिकरोड : दहावीच्या परीक्षेत तोतया विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडलेल्या आहेत. परंतु चक्क तोतया भरारी पथकाने दहावीच्या परीक्षा केंद्राचा ताबा घेतल्याचा प्रकार नाशिकरोड येथील अभिनव शाळा केंद्रावर घडल्याने परीक्षा केंद्राच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुढे आला आहे. एका चाणाक्ष पालकामुळे सदर प्रकार उघडकीस आला असला, तरी संशयित पसार झाल्याने संशयितांच्या उद्देशाविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. इयत्ता दहावीच्या पहिल्याच पेपरला तोतया भरारी पथक बनून आलेल्या दोघा भामट्यांमुळे संपूर्ण यंत्रणेची धावपळ उडाली असून, परीक्षा केंद्रेच असुरक्षित असल्याची बाब यामुळे समोर आली आहे. जेलरोड नारायणबापू चौकाजवळील अभिनव मराठी शाळेत गुरुवारी दहावीचा मराठीचा पहिला पेपर होता. यामुळे परीक्षार्थी व पालकांची शाळेत सकाळपासून गर्दी होती. पेपर सुरू होण्यास तासाभराचा अवधी असताना ३०-३२ वयोगटातील दोन युवक शाळेत आले. त्यांनी मुख्याध्यापक ऊर्मिला भालके व केंद्र संचालक जयश्री ठाकरे यांची भेट घेऊन आपण बोर्डाच्या भरारी पथकाचे सदस्य असल्याचे सांगत बोर्डाची झेराक्स कागदपत्रे तसेच खोटे ओळखपत्र दाखवले. खात्रीसाठी काही शिक्षकांच्या ओळखीही सांगितल्या. कॉपीमुक्त अभियानासाठी काही शिक्षकांशीही बोलायचे असल्याची त्यांनी बतावणी केली. याच शाळेतील परीक्षा केंद्रावर दोन वर्षांपूर्वी हेच तोतया भरारी पथकाचे सदस्य बनून आले होते, अशी आठवण येथील शिक्षकांना यावेळी झाली. सदर तरुण हे भरारी पथकाचे सदस्य नसल्याचे उघडकीस आल्यानंतर दोन वर्षांपूर्वीच्या घटनेची अनेकांना आठवण झाली. अनेकांनी त्यावेळी अधिकारी म्हणून आलेले हेच ते दोन्ही युवक असल्याचे ठामपणे सांगितले. दोन वर्षांपूर्वींचे तोतया हेच असतील तर मग त्यांचा याच केंद्रावर वारंवार येण्याचा उद्देश काय, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विभागीय मंडळाचे भरारी पथक असल्याचे सांगून शाळेत प्रवेश करणाºया तोतया इसमांनी विद्यार्थ्यांची अंगझडती घेतली. मात्र त्यानंतर आपले बिंग फुटण्याचा संशय आल्याने त्यांनी आपली कारवाई आटोपती घेत मुख्याध्यापकांकडे शेरा पुस्तिका मागितली. या तोतयांनी शेरा पुस्तिकेत ‘कॉपीमुक्त केंद्र’ असा शेरा मारून चव्हाण आणि सय्यद अशा नावाने स्वाक्षरीही केली. शिवाय आपला भ्रमणध्वनी क्रमांकही लिहिला. याच भ्रमणध्वनी क्रमांकांवर नंतर मुख्याध्यापकांनी संपर्क साधला असता सदर क्रमांक संकेत चव्हाण असल्याचे उत्तर पलीकडून देण्यात आले. मात्र संशयितांनी भ्रमणध्वनी ‘स्वीच आॅफ’ केला.