शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

‘आरम’वर दोन बंधाऱ्यांची भूगर्भ चाचणी

By admin | Updated: April 23, 2017 01:35 IST

सटाणा : शहरवासीयांना दीड ते दोन तपांपासून ज्या आश्वासनाची प्रतीक्षा होती त्याची लवकरच अपेक्षापूर्ती होणार आहे.

 सटाणा : शहरवासीयांना दीड ते दोन तपांपासून ज्या आश्वासनाची प्रतीक्षा होती त्याची लवकरच अपेक्षापूर्ती होणार आहे. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी शाश्वत जलस्रोत निर्माण होण्यासाठी शहराजवळ आरम नदीवर बंधारे बांधण्यास मान्यता मिळाली आहे. शुक्रवारी स्थानिक स्तर विभागाकडून नदीपात्रात भूगर्भ चाचणी करण्यात आली. पाणीटंचाईतून कायमस्वरूपी सुटका होण्यासाठी हे दोन बंधारे संजीवनी ठरणार असल्याने शहरवासीयांमधून समाधान व्यक्त होत आहे.उन्हाळ्यात परिसरात पाण्याची भयावह स्थिती उद्भवते. पाणीटंचाईतून नागरिकांची सुटका करण्यासाठी आरम नदीवर बंधारे बांधण्याचे आश्वासन प्रत्येक निवडणुकीत इच्छुक उमेदवारांकडून हमखास दिले जात होते. परंतु राजकीय इच्छाशक्तीअभावी प्रत्यक्ष आश्वासनपूर्ती एक दिवास्वप्न ठरले होते. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रयत्नांतून केंद्र शासनाने पाच एमसेफिटक पाणी अडविण्यास परवानगी दिल्यानंतर मार्ग मोकळा झाला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत डॉ. भामरे यांनी भाजपाच्या वतीने तर विद्यमान नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी शहर विकास आघाडीच्या वतीने नदीवर बंधारे साकारण्याचे आश्वासन दिले होते. शहरवासीयांनी एकत्रित येऊन सत्ता स्थापनेचा कौल दिल्याने मोरे, उपनगराध्यक्ष निर्मला भदाणे, गटनेते संदीप सोनवणे आणि सर्व नगरसेवक तसेच डॉ. शेषराव पाटील यांनीही बंधाऱ्यांच्या कामाबाबत प्राधान्याने पाठपुरावा केला. संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गास तातडीने अपेक्षित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार राज्याचे उपसचिव एस. ए. टाटू यांनी जलसंपदा विभागाला ना हरकत प्रमाणपत्र देत साठवण बंधारे बांधण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी स्थानिक स्तर विभागाकडून नदीपात्रात भूगर्भ चाचणी करण्यात आली. (वार्ताहर)