शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

जाखोडच्या पाण्यावरून तणाव

By admin | Published: November 25, 2015 11:51 PM

पुन्हा पाणी रोखले : संतप्त ग्रामस्थांनी धरणाचा ताबा घेऊन सोडले पाणी

 सटाणा : तहानलेल्या करंजाडी खोऱ्यासाठी जाखोड धरणातून सोडलेले पाणी मंगळवारी मध्यरात्री पुन्हा मुंगसे, पिंगळवाडे येथील ग्रामस्थांनी पोलीस यंत्रणेला न जुमानता रोखून विरोध केला आहे. ग्रामस्थांच्या विरोधामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून, मंगळवारी दुपारी करंजाड ते आनंदपूरपर्यंतच्या सात गावातील चारशे ते पाचशे संतप्त ग्रामस्थांच्या जमावाने हल्लाबोल करत धरणाचा ताबा घेतला आणि धरणाचा दरवाजा उघडून पाणी सोडले. दरम्यान, जाखोडच्या पाण्यावरून गावागावत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. प्रशासनाच्या सूचनेनुसार आनंदपूरपर्यंत आवर्तनाचे पाणी पोहचेपर्यंत धरणावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंगळवारी दुसऱ्यांदा पाणी रोखणाऱ्या ग्रामस्थांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता पुन्हा पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्यात आले. मात्र मध्यरात्री एक वाजेनंतर पोलिसांची पाठ फिरताच दोन्ही गावांच्या ग्रामस्थांनी दुसऱ्यांदा धरणाचे दरवाजे बंद करून पाणी रोखले. धरणखालच्या या दोन्ही गावांच्या भूमिकेमुळे संतापाची लाट उसळून सुमारे चारशे ते पाचशेच्या संतप्त जमावाने मिळेल त्या वाहनाने थेट धरणावर हल्लाबोल करून ताबाच घेतला.यावेळी पाणी सोडून जमावाने घोषणा देत पाणी रोखणाऱ्यांना थेट आव्हान दिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर यांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने शेवटच्या टोकाला पाणी पोहचेपर्यंत धरणावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.यावेळी अभियंता शिवाजी अहिरे, अशोक काकुळते, निकम यांच्यासह माधवराव दिघावकर, अशोक देवरे, संजय देवरे, वसंत पवार, बापू देवरे, राजेंद्र जाधव, बळीराम जाधव, रामभाऊ देवरे, प्रभाकर देवरे, पप्पू पवार, पोपट जाधव, किशोर ह्याळीज, साहेबराव खैरनार, कृष्णा जाधव, दिलीप शेवाळे, राकेश देवरे, विजय देवरे यांच्यासह चारशे ते पाचशे ग्रामस्थ उपस्थित होते.(वार्ताहर)